Devendra Fadnavis : 'माधव नेत्रालय महाराष्ट्रासाठीच नाही तर...'; काय म्हणाले फडणवीस ?

नागपूर : पंतप्रधान मोदींनी नागपूर दौऱ्यात रेशीमबागेतील स्मृती मंदिर, दीक्षाभूमी या ठिकाणांना भेट दिली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सरसंघचालक डॉ. हेडगेवार तसेच सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांना अभिवादन केले. यानंतर पंतप्रधान मोदींनी नागपूरमध्ये माधव नेत्रालयाच्या विस्तारीत इमारतीचे भूमिपजून केले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मोहन भागवत उपस्थित होते.



माधव नेत्रालयाच्या विस्तारीत इमारतीच्या भूमिपजूनावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सर्वांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे की, आज माधव नेत्रालयाचे भूमिपूजन होत आहे. मागील काही वर्षांपासून माधव नेत्रपेढी काम करत आहे. अनेक लोकांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम माधव नेत्रपेढीने केले आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की, दृष्टी ही देवाने दिलेली सर्वात मोठी गोष्ट आहे. ज्यांना दृष्टी नाही त्यांना दृष्टी देणे, यापेक्षा कोणतीही मोठी सेवा नाहीये. आमच्या स्वयंसेवकांनी गेल्या ३० वर्षात निरंतर ही सेवा सुरू ठेवलेली आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, देशामध्ये मोठ्या प्रमाणात नेत्रसेवाची आवश्यकता आहे. विशेष: आता मोठ्या प्रमाणात नेत्रदान होत आहे. लोक फक्त संकल्प घेत नाही तर नेत्रदान देखील करत आहेत. यामुळे हे अत्यंत महत्वाचे आहे.माधव नेत्रालय केवळ नागपूर आणि महाराष्ट्रासाठी नाही तर पूर्ण मध्य भारतासाठी एक महत्वपूर्ण संस्था होणार आहे. यामुळे अनेक लोकांना दृष्टीदोषपासून मुक्ती मिळेल आणि अनेकांना दृष्टी मिळेल. काही लोकांना देवाने दिलेला हा जो आशीर्वाद आहे तो मिळेल. मी माधव नेत्रालयाच्या सर्व संचालकांना खूप शुभेच्छा देतो. कारण देवाचे काम त्यांनी हातात घेतले आहे.
Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे