Mumbai News : मुंबईच्या रस्त्यांवरील डांबराचे सांबर कुणी खाल्ले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे पिता-पुत्रांना टोला


मुंबई : कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल, आम्ही झोपतो खुशाल अशी, यांची अवस्था असून त्यांनी कार्यकर्त्यांना कचरा समजला. त्यामुळे त्यांना आम्ही हायव्होल्टेज शॉक दिला, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत म्हटले. मुंबईच्या रस्त्यांवरून हे प्रश्न विचारतात, एवढी वर्षे डांबराचे सांबर कुणी खाल्ले हे स्पष्ट करावे. आरशात सांगून वारसा सांगता येत नसल्याचे म्हणत शिंदेंनी ठाकरे पिता-पुत्रांना टोला लगावला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. एकनाथ शिंदे म्हणाले की, सध्या काँक्रीटचे रस्ते करणे सुरू आहे. त्यामुळे लोकांना थोडा त्रास होतोय; परंतु त्यानंतर पुढील २५ वर्षे मुंबईत खड्डे दिसणार नाहीत. डांबरात हात काळे करण्याची संधी आता तुम्हाला मिळणार नाही. पोपटाचा जीव पिंजऱ्यात असतो, यांचा जीव मुंबईतील रस्ते आहेत.



एकनाथ शिंदे म्हणाले, ‘मर्चंट नेव्हीच्या अधिकाऱ्याला मारताना कुठे होते तुमच्या हातातले संविधान? प्रदीप मोरेला मारले तेव्हा संविधान कुठे होते? केतकी चितळेला तुरुंगात डांबले, तेव्हा संविधान कुठे होते? मलिष्काच्या गाण्यामुळे तुम्हाला पोटदुखी झाली, तेव्हा संविधान कुठे होते? हनुमान चालिसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला तुरुंगात धाडले, तेव्हा संविधान कुठे होते? खोट्या केसेस करून देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात पाठवण्याचे षडयंत्र रचले, तेव्हा कुठे होते संविधान? उद्योजकाच्या घरासमोर बॉम्ब पेरताना कुठे होते संविधान? वाझे हा काही लादेन नाही म्हणताना संविधान आठवले नाही का? नारायण राणेंना अटक करताना संविधान आठवले नाही का? कंगनाच्या ऑफिसवर बुलडोझर चालवला, तेव्हा कुठे होते संविधान? फडतूस म्हणाले, त्यांच्या पायाशी लोटांगण घालताना संविधान कुठे होते?” असे तिखट प्रश्न उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थित केले आहेत.

Comments
Add Comment

दहिसर नदी प्रदूषण रोखण्यासाठीच्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार

मुंबई : दहिसर नदीतील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे,

घर खरेदीत फसवणूक करणाऱ्या बिल्डरांची मालमत्ता जप्त होणार

मुंबई : राज्यात आपले गृहस्वप्न साकार करू पाहणाऱ्या हजारो सर्वसामान्यांची बिल्डरांकडून होणारी फसवणूक आता राज्य

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ द्या! - भाजप आमदार प्रसाद लाड यांची विधान परिषदेत मागणी

सकारात्मक निर्णय घेण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांचे आश्वासन मुंबई : भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील

मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाचे नामकरण; आता होणार 'पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर' पूल

- मुंबई सेंट्र्ल रेल्वस्थानकाजवळील पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण मुंबई :

अंगणवाडी बांधकामासाठी १५ लाखांचा निधी प्रस्तावित; मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

मुंबई : राज्यातील अंगणवाड्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या 'स्मार्ट किट' खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्तेचा

मराठी भाषेचे संवर्धन ही केवळ सरकारचीच नाही, तर प्रत्येकाची जबाबदारी - मंत्री उदय सामंत

मुंबई : "मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शासन स्तरावर मराठी भाषा विभाग सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र,