विरोधकांच्या डोक्यात ‘कबर आणि कामरा’; अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला

अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद; सरकारच्या कामाचा दिला आढावा


मुंबई : "विरोधकांच्या डोक्यात फक्त ‘कबर आणि कामरा’ आहे, पण आमच्यासाठी महाराष्ट्रातील १३ कोटी जनता महत्त्वाची आहे," असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समारोपानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारच्या कामाचा आढावा घेतला आणि विरोधकांवर टीकास्त्र सोडले.


मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "आम्ही महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेतले. माथाडी सुधारणा विधेयक आणले, शेतकरी आणि कामगारांसंदर्भात महत्त्वाच्या चर्चा केल्या. जिथे सहा तास काम अपेक्षित असते, तिथे आम्ही रोज नऊ तास सभागृह चालवले. मोठे बहुमत असूनही आम्ही कोणतीही चर्चा टाळली नाही. आमचे सरकार हे केवळ घोषणाबाजी करणारे नव्हे, तर काम करणारे आहे."



या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते.







अधिवेशनातील प्रमुख निर्णय आणि कायदे


१२ महत्त्वाचे कायदे मंजूर झाले.
माथाडी कामगार कायद्यात सुधारणा – बनावट माथाडी कामगार ओळखण्यास मदत होणार.
विनियोजन विधेयक मंजूर – सरकारच्या खर्चासंदर्भात महत्त्वाचा निर्णय.
सर्व प्रश्नांना मंत्र्यांनी उत्तर दिली – फक्त एका दिवशी मंत्र्यांना सभागृहात पोहोचण्यास उशीर झाला, त्यामुळे २० मिनिटांचा वेळ वाया गेला.







धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्रींचे स्पष्टीकरण


धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले, "आम्ही ना नरम आहोत, ना गरम; आम्ही कायद्याने चालणारे आहोत. कायद्याने जे योग्य तेच केले आहे."







विरोधी पक्षनेते निवडीचा मुद्दा ‘अध्यक्षांच्या कोर्टात’


विरोधी पक्षनेता अद्याप निश्चित का झाला नाही, याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, "हा अधिकार आमचा नाही, तो विधीमंडळ अध्यक्षांचा आहे. अध्यक्ष स्वतंत्र आहेत, ते निर्णय घेतील. त्यांनी उद्या निर्णय घेतला तरी आम्हाला हरकत नाही."







अधिवेशनात लक्षवेधी सूचना वाढल्या, पण...


अधिवेशनात लक्षवेधी सूचना मोठ्या प्रमाणावर वाढल्या, मात्र यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "यात काही हरकत नाही, पण अध्यक्ष आणि सभापतींना विनंती आहे की निकषात बसणाऱ्या लक्षवेधी सूचना घेतल्या पाहिजेत."


अधिवेशन संपले असले, तरी सरकारने घेतलेल्या निर्णयांची आणि विरोधकांच्या भूमिकेची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू राहणार आहे.

Comments
Add Comment

SIR in Mumbai : 'मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक'

मुंबई : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह

Illegal Water Connections : बांधकामांच्या ठिकाणच्या १०७ जलजोडण्यावर पालिकेची कारवाई

४१८ अनधिकृत जलजोडण्या खंडित, १०२ बुस्टर जप्त मुंबई : पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १० टक्के

Ghatkopar : घाटकोपर परिसरातील पदपथांवरील ४ अनधिकृत दुकाने आणि ३ वाचनालयांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर परिसरातील संत ज्ञानेश्वर मार्ग, पंतनगर येथील पदपथांवर अडथळा निर्माण करणाऱ्या ४

Mumbai Housing Project : मुंबईतील पुनर्विकास प्रकल्पांना मिळणार गती; झोपडपट्टी पुनर्वसनासाठी धोरणात्मक सुधारणा

सुरक्षित व परवडणाऱ्या घरांसाठी सरकार कटिबद्ध; पुनर्विकास प्रकल्पांना वेग मुंबई : मुंबई आणि उपनगरांतील

Mumbai : मुंबईत पावसाची संततधार, अंधेरी सब वे, मुलुंडसह अनेक भागांमध्ये पाणी साचले

मुंबई : मागील दोन - तीन दिवसांपासून मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मंगळवारीही सकाळपासून पावसाने जोरदार

Chembur School Bus Accident : चेंबूर दुर्घटनेतील विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार करा; आरक्षण उपवर्गीकरणावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – एकनाथ शिंदे

आरक्षण उपवर्गीकरणावर चर्चेतून तोडगा काढणार; संघर्ष समितीला शिंदेंचे आश्वासन मुंबई : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर