Mumbai Water : मुंबईतील ७ तलावांत ४२ टक्के पाणीसाठा

मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये ४२ टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा असल्यामुळे मुंबईकरांना यंदा जुलै अखेरपर्यंत पाण्याची चिंता नाही. या तलावांमधून ठाणे, भिवंडी शहरासह अन्य गावांना पाणीपुरवठा करूनही तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मुंबईकरांना १३० ते १३५ दिवस पुरेल इतके पाणी उपलब्ध होणार आहे.



तलावाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा सुमारे ५७ हजार दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. २०२४ मध्ये २४ मार्चपर्यंत पाणीसाठा ३७ टक्के होता. यंदा ४२ टक्केपेक्षा जास्त आहे. शहराला दररोज १८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात ४२.१३ टक्के म्हणजे ३ लाख २ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मोडक सागर व तानसा तला वगळता अन्य तलावातील पाणीसाठाही ४६ ते ५५ टक्के इतका आहे.


सातही तलावाचा आढावा घेतला असता या तलावामध्ये सुमारे ६ लाख १६ हजार ५४६ दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा आहे. मुंबईला रोज ३९५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा पाहता, हा साठा १५६ दिवस पुरेल इतका आहे. पण या तलावातील काही पाणी ठाणे व भिवंडीसह काही गावांना दिले जाते. त्यामुळे मुंबईकरांच्या वाट्याला १२० ते १२५ दिवस पाणी येणार आहे. तरीही पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

Comments
Add Comment

‘पॉड टॅक्सी’साठी महापालिकांनी आराखडा तयार करावा'

मुंबई : प्रवाशांना घरापासून ते थेट कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून

विरोधी पक्षात बसताच उबाठाच्या नगरसेवकांना आसने टोचू लागली

महापालिका सभागृहातील आसन व्यवस्थेत होणार सुधारणार गटनेत्यांच्या अनौपचारिक बैठकीत प्रशासनाला दिल्या

बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांविरोधात कारवाईला वेग

मुंबई : मुंबई उपनगरचे सहपालक मंत्री गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बांगलादेशी, रोहिंग्या घुसखोरांच्या

मध्य, हार्बरसह पश्चिम रेल्वेवर ब्लॉक

खारबाव येथील नियोजित रात्रकालीन मेगाब्लॉक रद्द मुंबई (प्रतिनिधी) : रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि

कांजूरमार्ग कारशेडच्या जागेबाबत खासगी विकासकांची याचिका फेटाळली

मुंबई : ‘स्वामी समर्थ नगर – विक्रोळी मेट्रो ६’ मार्गिकेच्या कारशेडसाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या कांजूरमार्ग

Water Metro Project: मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार; लवकरच सुरु होणार 'जल मेट्रो प्रकल्प'

मुंबई: मुंबईच्या दैनंदिन वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची लवकरच सुटका होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. खासदार