Mumbai Water : मुंबईतील ७ तलावांत ४२ टक्के पाणीसाठा

मुंबई : मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमध्ये ४२ टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा असल्यामुळे मुंबईकरांना यंदा जुलै अखेरपर्यंत पाण्याची चिंता नाही. या तलावांमधून ठाणे, भिवंडी शहरासह अन्य गावांना पाणीपुरवठा करूनही तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मुंबईकरांना १३० ते १३५ दिवस पुरेल इतके पाणी उपलब्ध होणार आहे.



तलावाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा सुमारे ५७ हजार दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. २०२४ मध्ये २४ मार्चपर्यंत पाणीसाठा ३७ टक्के होता. यंदा ४२ टक्केपेक्षा जास्त आहे. शहराला दररोज १८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात ४२.१३ टक्के म्हणजे ३ लाख २ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मोडक सागर व तानसा तला वगळता अन्य तलावातील पाणीसाठाही ४६ ते ५५ टक्के इतका आहे.


सातही तलावाचा आढावा घेतला असता या तलावामध्ये सुमारे ६ लाख १६ हजार ५४६ दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा आहे. मुंबईला रोज ३९५० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा पाहता, हा साठा १५६ दिवस पुरेल इतका आहे. पण या तलावातील काही पाणी ठाणे व भिवंडीसह काही गावांना दिले जाते. त्यामुळे मुंबईकरांच्या वाट्याला १२० ते १२५ दिवस पाणी येणार आहे. तरीही पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

Comments
Add Comment

आशियातील सर्वात मोठा विकेंद्रीत सौर ऊर्जा कार्यक्रम राबवून महाराष्ट्राने रचली यशोगाथा

सौर ऊर्जेच्या माध्यमातून वर्षअखेरपर्यंत १६ गिगा वॅट वीज निर्मिती – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस : 

मुंबई कोस्टल रोड पूर्ण, सहा महिन्यांनी अभियंत्यांच्या पाठीवर आयुक्तांची कौतुकाची थाप

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेने उभारलेल्या धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई

दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात ‘लॉन्चिंग शाफ्ट’चे खोदकाम जलद गतीने सुरू

मुंबई विशेष प्रतिनिधी) : गोरेगाव - मुलुंड जोड मार्ग प्रकल्प अंतर्गत गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी

रेडिओ क्लब जेट्टीचे काम वेळेत पूर्ण न झाल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार - मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा इशारा

मुंबई : बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबनजीक असलेल्या जेट्टीचे काम निविदेतील कालमर्यादेत करण्यात यावे. जेट्टीचे

जलक्षेत्रांतील जमिनींच्या शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकार आणणार विशेष धोरण - मंत्री नितेश राणे यांनी घेतला ‘लँड मॅनेजमेंट अँड वॉटरफ्रंट युज पॉलिसी’चा आढावा

मुंबई : राज्यातील जलक्षेत्रांलगतच्या जमिनींचा शाश्वत, नियोजनबद्ध आणि पर्यावरणस्नेही विकास साधण्यासाठी

नाहूर–ऐरोली उड्डाणपूल ठरणार गेमचेंजर, केबल-स्टेड रचनेतून ठाणे–मुंबईला नवी गती; जाणून घ्या सविस्तर

मुंबई : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा देणारा गोरेगाव–मुलुंड लिंक रोड प्रकल्प निर्णायक टप्प्यावर