Ratnagiri Water Supply : रत्नागिरीत एप्रिलपासून दर सोमवारी होणार पाणीपुरवठा बंद!

रत्नागिरी : उन्हाळी मोसमाला सुरुवात झाली असून यावेळी ऐन उन्हाळ्यात रत्नागिरीकरांना पाणीटंचाईला (Water Shortage) सामोरे जावे लागणार आहे. रत्नागिरी शहरात येतक्या एप्रिलपासून दर सोमवारी पाणीपुरवठा बंद (Water supply cut off) ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. (Ratnagiri Water Supply)



रत्नागिरी शहराला केला जाणारा पाणीपुरवठा २४ मार्चपासून दर सोमवारी देखभाल आणि दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण रमजान ईद व गुढीपाडवा या सणांमुळे एप्रिलपासून पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शीळ धरणात गतवर्षापेक्षा दुप्पट पाणीसाठा आहे. मात्र वाढता उष्मा व १५ जूनपर्यंत नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट येऊ नये, यासाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Ratnagiri Water Supply)


धरणातील सध्याचा पाणीसाठा पावसाळा नियमित होईपर्यंत पुरणार आहे. परंतु पाण्याचे बाष्पीभवनाने पाणीसाठा कमी होण्याची शक्यता आहे. तो धोका ओळखून पाण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यासाठीच दर सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Comments
Add Comment

जयंत पाटील, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अनपेक्षित बातमी समोर आली असून, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे

'होय मीच माझ्या पत्नीचा खून केलाय'....; सायको पती मृतदेहासोबत थेट पोलीस ठाण्यात

समृध्दी महामार्गावर पत्नीची हत्या करून आरोपी पती पोहचला थेट पोलीस ठाण्यात वाशिम : समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Mahamarg)

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड घटनेनुसारच!

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई : राष्ट्रवादी

Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू

Vadhvan Port News : पॅरिसच्या धर्तीवर वाढवण बंदराजवळ उभारणार आंतरराष्ट्रीय कृषी बाजार

- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत