Ratnagiri Water Supply : रत्नागिरीत एप्रिलपासून दर सोमवारी होणार पाणीपुरवठा बंद!

रत्नागिरी : उन्हाळी मोसमाला सुरुवात झाली असून यावेळी ऐन उन्हाळ्यात रत्नागिरीकरांना पाणीटंचाईला (Water Shortage) सामोरे जावे लागणार आहे. रत्नागिरी शहरात येतक्या एप्रिलपासून दर सोमवारी पाणीपुरवठा बंद (Water supply cut off) ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. (Ratnagiri Water Supply)



रत्नागिरी शहराला केला जाणारा पाणीपुरवठा २४ मार्चपासून दर सोमवारी देखभाल आणि दुरुस्तीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण रमजान ईद व गुढीपाडवा या सणांमुळे एप्रिलपासून पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. शीळ धरणात गतवर्षापेक्षा दुप्पट पाणीसाठा आहे. मात्र वाढता उष्मा व १५ जूनपर्यंत नागरिकांवर पाणीटंचाईचे संकट येऊ नये, यासाठी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Ratnagiri Water Supply)


धरणातील सध्याचा पाणीसाठा पावसाळा नियमित होईपर्यंत पुरणार आहे. परंतु पाण्याचे बाष्पीभवनाने पाणीसाठा कमी होण्याची शक्यता आहे. तो धोका ओळखून पाण्याचे नियोजन सुरू केले आहे. त्यासाठीच दर सोमवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Comments
Add Comment

Ashish Shelar on AI : महापालिकेतील निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी एआयचा वापर करा- मंत्री अँड आशिष शेलार

मुंबई : महापालिकेची निविदा प्रक्रिया मानवी हस्तक्षेप शुन्य होऊन ती अधिक पारदर्शक होईल, निवेदेतील व्हेरिएशनवर

Nasarapur : नसरापूर घटनेतील आरोपीकडून संतापजनक कबुली, चिमुकलीचा जीव गेला की नाही हे पाहण्यासाठी चक्क…

Nasarapur Rape Case : पुणे जिल्ह्यामधील भोर तालुक्यातील नसरापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या संतापजनक प्रकार आणि नंतर तिला

सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या 'हिंदी' परीक्षेला स्थगिती

मुंबई : राज्य शासनाच्या राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हिंदी भाषेची परीक्षा देण्याबाबतचा निर्णय शासनाने

Nasarapur case : नसरापूर प्रकरणात आरोपीचा संतापजनक जबाब, 'घटनेच्या दिवशी मी...'

Nasarapur case : पुण्याजवळच्या भोर तालुक्यातल्या नसरापूरमध्ये येथे एका ६५ वर्षांच्या नराधमानं चार वर्षांच्या चिमुकलीवर

SRPF Exam : 'ते' ८५ प्रश्न, विद्यार्थ्यांचा संताप आणि आता SRPF भरतीला ब्रेक; प्रकरण काय ?

SRPF recruitment : राज्य राखीव पोलीस बल (SRPF) गट क्रमांक ५ च्या सशस्त्र पोलीस शिपाई भरती प्रक्रियेला अखेर स्थगिती देण्यात आली

'Agricultural Mall' : राज्यातील टोल नाक्यांवर उभे राहणार 'कृषी मॉल', सार्वजनिक बांधकाम विभागाची योजना

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत