संतोष देशमुख प्रकरणी १० एप्रिलला आरोप निश्चित होणार ?

बीड : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी बीडच्या मकोका न्यायालयात सुनावणी झाली. सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराडसह सर्व सात आरोपी न्यायालयीन कोठडीतून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीला उपस्थित होते.



विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात सुनावणीवेळी गुन्ह्याशी संबधित सर्व घटनाक्रम सांगितला. जगमित्र कार्यालयात वाल्मिक कराडने खंडणी मागितल्याचे त्यांनी सांगितले. संतोष देशमुखांना कायमचा धडा शिकवा असे विष्णू चाटे म्हणाल्याचेही त्यांनी न्यालायाला सांगितले. नोव्हेंबर २०२४ च्या २९ तारखेला विष्णू चाटेच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत सगळे आरोपी हजर होते, असे निकम म्हणाले. यानंतर ८ डिसेंबर रोजी नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगावर विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची बैठक झाली. संतोष देशमुख खंडणी प्रकरणात आडवे येत आहेत अशी चर्चा या बैठकीत झाली. यावर 'त्याला कायमचा धडा शिकवा', असे विष्णू चाटे म्हणाल्याचे उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सांगितले.



विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हे प्रकरण आरोप निश्चितीसाठीसाठी तयार असल्याचे न्यायालयाला सांगितले. मात्र, आरोपींच्या वकिलांनी त्यांना कागदपत्रे न मिळाल्यामुळे आरोप निश्चिती करु नका अशी विनंती न्यायालयाला केली. या युक्तिवादानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्याची पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी असेल; असे न्यायालयाने सांगितले. यामुळे आरोप निश्चितीची प्रक्रिया १० एप्रिल रोजी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

'नाशिकच्या नव्या रिंग रोड आणि साधूग्रामचे काम लवकर पूर्ण करा'

मुंबई : कुंभमेळा हे श्रद्धा, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे प्रतीक आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ

'राज्यातील सर्व संवर्गातील सेवा प्रवेश नियमांत सुधारणा करणार'

मुंबई : राज्य शासनाच्या प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल

ओबीसी महामोर्चा दहा ऑक्टोबरलाच होणार

मुंबई (प्रतिनिधी) : सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी

फास्ट टॅग नसला तरीही नाही भरावा लागणार दुप्पट टोल

मुंबई (प्रतिनिधी) : फास्टटॅग नियमांमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे. १५ नोव्हेंबरपासून, जर तुमच्या वाहनात वैध

कुणबीचे चुकीचे दाखले दिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई

मुंबई (प्रतिनिधी): मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावरून ओबीसी समाजात निर्माण झालेला संभ्रम

महापालिका कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानात यंदाही सरासरी तीन हजारांची वाढ ?

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांना दीपावली २०२५निमित्त प्रत्यक्षात किती