संतोष देशमुख प्रकरणी १० एप्रिलला आरोप निश्चित होणार ?

बीड : महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी बीडच्या मकोका न्यायालयात सुनावणी झाली. सुरक्षेच्या कारणास्तव वाल्मिक कराडसह सर्व सात आरोपी न्यायालयीन कोठडीतून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणीला उपस्थित होते.



विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी न्यायालयात सुनावणीवेळी गुन्ह्याशी संबधित सर्व घटनाक्रम सांगितला. जगमित्र कार्यालयात वाल्मिक कराडने खंडणी मागितल्याचे त्यांनी सांगितले. संतोष देशमुखांना कायमचा धडा शिकवा असे विष्णू चाटे म्हणाल्याचेही त्यांनी न्यालायाला सांगितले. नोव्हेंबर २०२४ च्या २९ तारखेला विष्णू चाटेच्या कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत सगळे आरोपी हजर होते, असे निकम म्हणाले. यानंतर ८ डिसेंबर रोजी नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगावर विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची बैठक झाली. संतोष देशमुख खंडणी प्रकरणात आडवे येत आहेत अशी चर्चा या बैठकीत झाली. यावर 'त्याला कायमचा धडा शिकवा', असे विष्णू चाटे म्हणाल्याचे उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सांगितले.



विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हे प्रकरण आरोप निश्चितीसाठीसाठी तयार असल्याचे न्यायालयाला सांगितले. मात्र, आरोपींच्या वकिलांनी त्यांना कागदपत्रे न मिळाल्यामुळे आरोप निश्चिती करु नका अशी विनंती न्यायालयाला केली. या युक्तिवादानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या खटल्याची पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी असेल; असे न्यायालयाने सांगितले. यामुळे आरोप निश्चितीची प्रक्रिया १० एप्रिल रोजी होईल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ

एल्फिन्स्टनला मिळणार मुंबईचा पहिला दुमजली रेल्वे पूल

मुंबई: ११० वर्षे जुना एल्फिन्स्टन रोड ओव्हर ब्रिज १२ सप्टेंबर २०२५ रोजी बंद झाल्यानंतर, मध्य मुंबईतील

बनावट नकाशे तयार करणाऱ्यांवर कारवाई करा; 'त्या' अहवालाचा फेरविचार करा!

पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश मुंबई : मुंबई उपनगर मधील विकास आराखडा आरक्षणातील भूमी अभिलेख

मनसे नेते प्रकाश महाजन यांचा पक्षाला रामराम

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते आणि प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी पक्षातून राजीनामा दिला आहे.

राज्यात 'मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना' सुरू होणार; मच्छीमारांना मिळणार दुहेरी लाभ!

मुंबई: महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारच्या 'प्रधानमंत्री

राज्यातील बारव व ऐतिहासिक विहिरींचे फेर सर्वेक्षण करणार : मंत्री ॲड आशिष शेलार

मुंबई : ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या महाराष्ट्रातील बारव व विहीरींचे जिल्हा निहाय सर्वेक्षण