अवघ्या तीन वर्षात दुसऱ्यांदा पक्षांतर करणार, स्नेहल जगताप राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मुंबई : अवघ्या तीन वर्षात स्नेहल जगताप दुसऱ्यांदा पक्षांतर करणार आहेत. राज्यात तीन वर्षांपूर्वी राजकीय भूकंप झाला. त्यावेळी काँग्रेसमधून उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश केलेल्या स्नेहल जगताप आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर स्नेहल जगताप पक्षांतर करणार आहेत. उद्धव गटात असलेल्या स्नेहल जगताप आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.



विधानसभेसाठी २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत स्नेहल जगताप यांनी उद्धव गटाच्या तिकिटावर, शिवसेना उमेदवार भरत गोगावले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भरत गोगावले विजयी झाले आणि स्नेहल जगताप यांचा पराभव झाला. यानंतर काही दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले, विधान परिषदेतील भाजपाचे नेते प्रवीण दरेकर आणि स्नेहल जगताप हे तिन्ही पक्षांचे नेते पोलादपूर येथील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते. तेव्हापासून स्नेहल जगताप या महायुतीत शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार अशी चर्चा होती. पण स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.



स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यास भरत गोगावले यांच्यासमोर राजकीय आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्नेहल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेसला फायद्याच्या ठरू शकतात; असे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या राजकारणासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्ह्यातील विस्तारासाठी स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश उपयुक्त ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

Prabhakar Shinde : मुंबई पूरमुक्त करण्यासाठी महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनामधील समन्वय आवश्यक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे कल्वर्टच्या भिंतींची दुरुस्ती करून कल्वर्टचे पातमुख विस्तारण्यावर भर द्यावा.

Mayor Ritu Tawde : सुधा पार्क मार्गावरील समस्यांबाबत नागरिकांच्या तक्रारी, महापौरांची Action मोहीम

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर मधील सुधा पार्क रस्त्यावर दुतर्फा अनधिकृतरित्या उभी केली जाणारी वाहने आणि

Maharashtra : राज्यात पेट्रोल, डिझेल, LPG टंचाई नाही

मुंबई : पश्चिम आशियातील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या जलवाहतुकीवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.

Air India : अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचा एअर इंडिया व्यवस्थापनाला दणका

मुंबई : एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या अन्याय, त्रास व

Eknath Shinde : आयुष्मान आरोग्य मंदिर व वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्प लवकरच नागरिकांच्या सेवेत

राज्यातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुष्मान आरोग्य मंदिर आणि वैद्यकीय महाविद्यालय

Healthcare Services : आरोग्य सेवांमध्ये गुणवत्ता व गतीला प्राधान्य द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध