अवघ्या तीन वर्षात दुसऱ्यांदा पक्षांतर करणार, स्नेहल जगताप राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मुंबई : अवघ्या तीन वर्षात स्नेहल जगताप दुसऱ्यांदा पक्षांतर करणार आहेत. राज्यात तीन वर्षांपूर्वी राजकीय भूकंप झाला. त्यावेळी काँग्रेसमधून उद्धव ठाकरेंच्या गटात प्रवेश केलेल्या स्नेहल जगताप आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर स्नेहल जगताप पक्षांतर करणार आहेत. उद्धव गटात असलेल्या स्नेहल जगताप आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.



विधानसभेसाठी २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत स्नेहल जगताप यांनी उद्धव गटाच्या तिकिटावर, शिवसेना उमेदवार भरत गोगावले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत भरत गोगावले विजयी झाले आणि स्नेहल जगताप यांचा पराभव झाला. यानंतर काही दिवसांपूर्वी मंत्री भरत गोगावले, विधान परिषदेतील भाजपाचे नेते प्रवीण दरेकर आणि स्नेहल जगताप हे तिन्ही पक्षांचे नेते पोलादपूर येथील कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर आले होते. तेव्हापासून स्नेहल जगताप या महायुतीत शिवसेना किंवा भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार अशी चर्चा होती. पण स्नेहल जगताप राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत.



स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यास भरत गोगावले यांच्यासमोर राजकीय आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे. भविष्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्नेहल जगताप या राष्ट्रवादी काँग्रेसला फायद्याच्या ठरू शकतात; असे मत राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्या राजकारणासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या रायगड जिल्ह्यातील विस्तारासाठी स्नेहल जगताप यांचा पक्षप्रवेश उपयुक्त ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Comments
Add Comment

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी

Mumbai Municipal Corporation : मुंबई महापालिका उभारणार नवे सभागृह, ३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था

३५० आसनक्षमता, अधिकारी, पत्रकारांसाठी विशेष व्यवस्था मुंबई  : मुंबई महापालिकेचे सध्याचे ब्रिटिशकालीन सभागृह