छत्तीसगडमध्ये १५ नक्षलवादी आले शरण

सुकमा : छत्तीसगडमध्ये सुरक्षा पथकांच्या कारवाईत मारले जाण्याच्या भीतीने नक्षलवादी शरण येऊ लागले आहेत. राज्यात एका दिवसात १५ नक्षलवादी शरण आले आहेत. यातील काही नक्षलवाद्यांवर बक्षिस लावण्यात आले होते. या बक्षिसाची एकूण रक्कम ३९ लाख रुपये एवढी आहे. केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी कठोर पवित्रा घेतला आहे. केंद्राने कठोर पवित्रा घेतल्यापासून शरण येत असलेल्या नक्षलवाद्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. छत्तीसगडमधील सुकमात नऊ आणि दंतेवाडात सहा नक्षलवादी शरण आले आहेत.



सुकमात पूना नर्कोम आणि दंतेवाडात लोन वर्राटू नावाने नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा पथकांची मोहीम सुरू आहे. ही मोहीम सुरू झाल्यापासून नक्षलवादी शरण येण्याचे प्रमाण वाढले आहे. सुकमात जे नऊ नक्षलवादी शरण आले त्यांच्यातील काही जणांवर बक्षिस लावण्यात आले होते. या बक्षिसाची एकूण रक्कम २६ लाख रुपये एवढी आहे. तसेच दंतेवाडात जे सहा नक्षलवादी शरण आले त्यांच्यातील काही जणांवर बक्षिस लावण्यात आले होते. या बक्षिसाची एकूण रक्कम १३ लाख रुपये एवढी आहे. दंतेवाडात दोन महिला आणि चार पुरुष नक्षलवादी शरण आले आहेत.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दंतेवाडात लोन वर्राटू मोहिमेला यश येत आहे. आतापर्यंत दंतेवाडात ९१२ नक्षलवादी शरण आले आहेत. यातील २२१ नक्षलवाद्यांवर वेगवेगळ्या रकमेचे बक्षिस लावलेले होते.
Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे