छत्तीसगडमध्ये १५ नक्षलवादी आले शरण

  61

सुकमा : छत्तीसगडमध्ये सुरक्षा पथकांच्या कारवाईत मारले जाण्याच्या भीतीने नक्षलवादी शरण येऊ लागले आहेत. राज्यात एका दिवसात १५ नक्षलवादी शरण आले आहेत. यातील काही नक्षलवाद्यांवर बक्षिस लावण्यात आले होते. या बक्षिसाची एकूण रक्कम ३९ लाख रुपये एवढी आहे. केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी कठोर पवित्रा घेतला आहे. केंद्राने कठोर पवित्रा घेतल्यापासून शरण येत असलेल्या नक्षलवाद्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. छत्तीसगडमधील सुकमात नऊ आणि दंतेवाडात सहा नक्षलवादी शरण आले आहेत.



सुकमात पूना नर्कोम आणि दंतेवाडात लोन वर्राटू नावाने नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा पथकांची मोहीम सुरू आहे. ही मोहीम सुरू झाल्यापासून नक्षलवादी शरण येण्याचे प्रमाण वाढले आहे. सुकमात जे नऊ नक्षलवादी शरण आले त्यांच्यातील काही जणांवर बक्षिस लावण्यात आले होते. या बक्षिसाची एकूण रक्कम २६ लाख रुपये एवढी आहे. तसेच दंतेवाडात जे सहा नक्षलवादी शरण आले त्यांच्यातील काही जणांवर बक्षिस लावण्यात आले होते. या बक्षिसाची एकूण रक्कम १३ लाख रुपये एवढी आहे. दंतेवाडात दोन महिला आणि चार पुरुष नक्षलवादी शरण आले आहेत.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दंतेवाडात लोन वर्राटू मोहिमेला यश येत आहे. आतापर्यंत दंतेवाडात ९१२ नक्षलवादी शरण आले आहेत. यातील २२१ नक्षलवाद्यांवर वेगवेगळ्या रकमेचे बक्षिस लावलेले होते.
Comments
Add Comment

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला

Vande Bharat Express: रेल्वेने वंदे भारत ट्रेनच्या वेळापत्रकात केला बदल, जाणून घ्या आता सेमी हाय स्पीड ट्रेन किती वाजता धावणार?

नवी दिल्ली: वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची सर्वात प्रतिष्ठित आणि आरामदायी ट्रेन मानली जाते, ज्यामध्ये