छत्तीसगडमध्ये १५ नक्षलवादी आले शरण

सुकमा : छत्तीसगडमध्ये सुरक्षा पथकांच्या कारवाईत मारले जाण्याच्या भीतीने नक्षलवादी शरण येऊ लागले आहेत. राज्यात एका दिवसात १५ नक्षलवादी शरण आले आहेत. यातील काही नक्षलवाद्यांवर बक्षिस लावण्यात आले होते. या बक्षिसाची एकूण रक्कम ३९ लाख रुपये एवढी आहे. केंद्र सरकारने ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी कठोर पवित्रा घेतला आहे. केंद्राने कठोर पवित्रा घेतल्यापासून शरण येत असलेल्या नक्षलवाद्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. छत्तीसगडमधील सुकमात नऊ आणि दंतेवाडात सहा नक्षलवादी शरण आले आहेत.



सुकमात पूना नर्कोम आणि दंतेवाडात लोन वर्राटू नावाने नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरक्षा पथकांची मोहीम सुरू आहे. ही मोहीम सुरू झाल्यापासून नक्षलवादी शरण येण्याचे प्रमाण वाढले आहे. सुकमात जे नऊ नक्षलवादी शरण आले त्यांच्यातील काही जणांवर बक्षिस लावण्यात आले होते. या बक्षिसाची एकूण रक्कम २६ लाख रुपये एवढी आहे. तसेच दंतेवाडात जे सहा नक्षलवादी शरण आले त्यांच्यातील काही जणांवर बक्षिस लावण्यात आले होते. या बक्षिसाची एकूण रक्कम १३ लाख रुपये एवढी आहे. दंतेवाडात दोन महिला आणि चार पुरुष नक्षलवादी शरण आले आहेत.



पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दंतेवाडात लोन वर्राटू मोहिमेला यश येत आहे. आतापर्यंत दंतेवाडात ९१२ नक्षलवादी शरण आले आहेत. यातील २२१ नक्षलवाद्यांवर वेगवेगळ्या रकमेचे बक्षिस लावलेले होते.
Comments
Add Comment

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची