Rajkot Fire : राजकोटमधील इमारतीला आग, तिघांचा होरपळून मृत्यू

राजकोट : गुजरातच्या (Gujrat) राजकोट येथे अटलांटिस इमारतीला भीषण आग (Rajkot Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून इतर काही जण आगीत अडकल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राजकोटमधील अटलांटिस इमारतीला भीषण आग लागली. इमारतीतून धुराचे लोट बाहेर पडू लागताच, आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या, त्यानंतर सुमारे ५० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.


दरम्यान, आगीमुळे इमारतीच्या वरच्या मजल्यावरील फ्लॅट्सचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही आग लागल्याचे कारण समोर आले नाही. परंतु, प्राथमिक तपासात ही आग विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.




Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च