Rajkot Fire : राजकोटमधील इमारतीला आग, तिघांचा होरपळून मृत्यू

राजकोट : गुजरातच्या (Gujrat) राजकोट येथे अटलांटिस इमारतीला भीषण आग (Rajkot Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीमध्ये ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून इतर काही जण आगीत अडकल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन विभाग आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, गुजरात राजकोटमधील अटलांटिस इमारतीला भीषण आग लागली. इमारतीतून धुराचे लोट बाहेर पडू लागताच, आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या, त्यानंतर सुमारे ५० जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. ग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीने पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.


दरम्यान, आगीमुळे इमारतीच्या वरच्या मजल्यावरील फ्लॅट्सचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र अद्यापही आग लागल्याचे कारण समोर आले नाही. परंतु, प्राथमिक तपासात ही आग विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जाते आहे.




Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.