मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५च्या फायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडला ४ विकेटनी हरवले. या विजयानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या निवृत्तीबाबत मोठे विधान केले. तो म्हणाला की जसे सुरू आहे तसेच सुरू राहील.
कर्णधार रोहितने हे ही स्पष्ट केले की तो वनडे फॉरमॅट इतक्यात तरी सोडणार नाही. ३७ वर्षीय रोहितला सामन्यानंतर निवृत्तीबाबत विचारणा केली. यावेळेस तो म्हणाला, कोणताही फ्यूचर प्लान नाही. जसे सुरू आहे तसेच सुरू राहील. मी या फॉरमॅटमधून निवृत्ती घेत नाही आहे. कोणत्याही अफवा पसरवू नका.
हिटमॅन रोहितने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये ४१ बॉलमध्ये अर्धशतक झळकावले. सामन्यात रोहितने ८३ बॉलमध्ये ७६ धावा केल्या. त्याने या खेळीदरम्यान ३ षटकार आणि ७ चौकार ठोकले.
केएल राहुल आणि पांड्याचेही केले कौतुक
कर्णधार रोहित फायनलनंतर म्हणाला की, मी त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. येथील गर्दी शानदार होती. हे आमचे घरचे मैदान नाही मात्र तरीही आमचेच मैदान असल्यासारखे वाटत होते. येथे चाहत्यांची गर्दी मोठी होती. जेव्हा तुम्ही अशा पिचवर खेळत असता तेव्हा खूप जास्त अपेक्षा असतात. आम्ही त्यांची ताकद समजतो आणि याचा फायदा उचलतो.
रोहित पुढे म्हणाला, केएल राहुलचे डोके मजबूत आहे. तो कधीही आपल्या आसपास तणाव फिरकू देत नाही. याच कारणामुळे त्याला मधल्या फळीत ठेवायचे आहे. जेव्हा तो फलंदाजी करतो आणि स्थितीच्या हिशेबाने योग्य शॉट खेळतो तेव्हा तो हार्दिक पांड्यासारखा खेळाडूंना खुलेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य देतो.