Devbag beach : देवबाग समुद्र किनारी १५८ कोटी रुपयांच्या विकास कामांना अर्थसंकल्पात मान्यता

आमदार निलेश राणे यांच्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्याला यश


मालवण : महाराष्ट्र शासन पर्यावरण पूरक आणि संरक्षण व व्यवस्थापन या ४५० कोटी रुपये प्रकल्पांतर्गत देवबाग (Devbag beach) येथे १५८ कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे या प्रक्रियेमुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य अर्थसंकल्पात याबाबत घोषणा केली आहे.


आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राज्य शासनाकडे केलेल्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे. मोठया प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गतिमान विकास सुरूच राहील. असा विश्वास व्यक्त केला जात आहे.



सर्व घटकांना न्याय देणारा परिपूर्ण अर्थसंकल्प : आमदार निलेश राणे


राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्प २०२५-२६ सादर केला. खरोखरच हा अर्थसंकल्प महाराष्ट्रातील प्रत्येक समाजासाठी, प्रत्येक घटकासाठी, प्रशासनाच्या सर्व क्षेत्रांसाठीचे अर्थसंकल्प आहे. महाराष्ट्र पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन विभागाच्या मार्फत ४५० कोटी रुपयांपैकी माझ्या मतदारसंघातील मालवण तालुक्यातील, देवबाग समुद्रकिनाऱ्यासाठी १५८ कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे समुद्रकिनारी वात्सव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होईल. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार तसेच महायुती सरकारचा मनपूर्वक आभारी आहे, अशी प्रतिक्रिया आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment

साळीस्ते खून प्रकरणात नवा ट्विस्ट! मृतदेह डॉक्टर पेशातील व्यक्तीचा असल्याची चर्चा ?

कणकवली: साळीस्ते येथे गुरुवारी दुपारी १२:३० एका पुरुषाचा मृतदेह काहीसा कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खळबळ माजली

Rain Alert : दिवाळीच्या उत्साहात पावसाचं विघ्न? मुंबई-कोकण किनारपट्टीवरील हवामान बदलणार, कसा असेल अंदाज?

मुंबई : महाराष्ट्रासह देशातील बहुतांश राज्यांतून मान्सूनने आता माघार घेतली असली तरीही, अनेक ठिकाणी अद्याप

दिवाळीच्या सुट्टीत मुंबई-गोवा महामार्ग ठप्प! प्रवाशांचा खोळंबा; 'खड्ड्यांतील प्रवास कधी थांबणार?'

मुंबई/महाड: दिवाळीच्या सुट्ट्या तोंडावर आल्या असतानाच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (NH-66) आज, १७ ऑक्टोबर रोजी

IRCTC Website Crash : ऐन दिवाळीच्या तोंडावर रेल्वे प्रवाशांना मोठा फटका! तिकीट बुक होता होईना, IRCTC वेबसाइट आणि ॲप अचानक ठप्प

दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची मोठी गैरसोय दिवाळीच्या काळात गावी जाणाऱ्या लाखो प्रवाशांना आज एक मोठी तांत्रिक

सिंधुदुर्गात एसटी बसच्या संख्या वाढवा

मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या पायाभूत सुविधांचे

सिंधुदुर्गात वाड्या, रस्त्यांच्या जातीवाचक नावांऐवजी आता महापुरुषांची नावे

नावे बदलणारा राज्यातील पहिला जिल्हा कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९२ वस्त्यांची आणि २५ रस्त्यांची जातीवाचक