सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात

  60

मुंबई : केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर २०२४ अखेरचा अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार मागील दहा वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या नऊ महिन्यांत महाराष्ट्राने प्राप्त केली. राज्यात २०२४ - २५ या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत एक लाख ३९ हजार ४३४ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे. ही मागील दहा वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक आहे. ही कामगिरी करत महायुती सरकारने स्वतःचाच २०१६ - १७ या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे. अद्याप २०२४ - २५ या आर्थिक वर्षातील शेवटची तिमाही पूर्ण व्हायची आहे.





अहवालात महाराष्ट्रानंतर दुसऱ्या स्थानी असलेल्या कर्नाटकमध्ये २०२४ - २५ या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत फक्त १६ हजार ६५१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर अहवालात दुसऱ्या स्थानी असलेल्या कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रात एक लाख २२ हजार ७८३ कोटी रुपये एवढी जास्त परकीय गुंतवणूक आली आहे.



परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. देशातले कोणतेही राज्य महाराष्ट्राच्या आसपास पण नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली. देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि या यशाचे श्रेय महायुतीतील सर्व घटक पक्षांचे आहे; असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 
Comments
Add Comment

Bus Strike : 'पालकांनो लक्ष द्या', मुलांच्या शाळेची बस न येण्याची शक्यता! विविध मागण्यांसाठी खाजगी बस चालकांचा १ जुलैपासून बेमुदत संप

स्कूल बस सेवांवरही होणार परिणाम मुंबई : मुंबईतील खाजगी बस चालकांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर

‘१०० मिमीपेक्षा जास्त पावसाच्या पाण्याचा निचरा करणारा आराखडा तयार करा’

केंद्र सरकारकडून मुंबईला स्वतंत्र निधी मिळणार मुंबई : मुंबईची सध्याची पावसाळी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा ५५

अखेर कर्नाक पुलाला आता लोकार्पणाची प्रतीक्षा

बुधवारी रात्री उशिरापर्यंत पूल विभागाने फिरवला शेवटचा हात मुंबई : मशीद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर

मनाने, शरीराने सुदृढ राहिलात, तरच आयुष्याची लढाई जिंकाल

विश्वास नांगरे-पाटील यांनी महापालिका शाळांमधील मुलांच्या पंखात भरले बळ मुंबई  : सध्याच्या विद्यार्थ्यांभोवती,

पवई तलावातील सांडपाण्याचा प्रवेश मार्ग कायमचाच बंद

मुंबई : पवई तलावामध्ये येणारे सांडपाणी आदींवर अखेर बंद केले जाणार असून पवई तलावाच्या सुशोभीकरणाच्या शेवटच्या

भविष्यकाळात वीजदरात आणखी होणार घट

महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांचे प्रतिपादन मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात