सर्वाधिक परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात

मुंबई : केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर २०२४ अखेरचा अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार मागील दहा वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या नऊ महिन्यांत महाराष्ट्राने प्राप्त केली. राज्यात २०२४ - २५ या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत एक लाख ३९ हजार ४३४ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे. ही मागील दहा वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक आहे. ही कामगिरी करत महायुती सरकारने स्वतःचाच २०१६ - १७ या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे. अद्याप २०२४ - २५ या आर्थिक वर्षातील शेवटची तिमाही पूर्ण व्हायची आहे.





अहवालात महाराष्ट्रानंतर दुसऱ्या स्थानी असलेल्या कर्नाटकमध्ये २०२४ - २५ या आर्थिक वर्षातील पहिल्या नऊ महिन्यांत फक्त १६ हजार ६५१ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक आली आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर अहवालात दुसऱ्या स्थानी असलेल्या कर्नाटकपेक्षा महाराष्ट्रात एक लाख २२ हजार ७८३ कोटी रुपये एवढी जास्त परकीय गुंतवणूक आली आहे.



परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. देशातले कोणतेही राज्य महाराष्ट्राच्या आसपास पण नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करुन ही माहिती दिली. देशात सर्वाधिक परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे आणि या यशाचे श्रेय महायुतीतील सर्व घटक पक्षांचे आहे; असेही मुख्यमंत्री म्हणाले.

 
Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत