औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्या अबू आझमींचे निलंबन

  76

मुंबई : प्रसारमाध्यमांशी बोलताना औरंगजेबाचे भरभरुन कौतुक करणारे आमदार आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमींना निलंबित करण्यात आले आहे. विधानसभेत एकमताने हा ठराव झाला.



राज्य शासनाच्यावतीने चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर केला. औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी अबू आझमी यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले. याआधी 'फक्त अधिवेशन काळापुरते निलंबन नको. त्यांचे सर्व भत्ते बंद करा. आमदार निधी व पगार ही बंद करा. औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही. प्रस्तावात सुधारणा करा. कारवाई अधिक कठोर करा'; अशी मागणी आमदार आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज पूजनीय आहेत. त्यांचा अपमान करणाऱ्याला ,सहजतेने जाऊ देऊ शकत नाहीत. कठोर कारवाई व्हायला हवी; असेही मुनगंटीवार म्हणाले.



मुनगंटीवार यांची मागणी ऐकल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नियमाची माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लोकप्रतिनिधीला एका सत्रापेक्षा जास्त काळासाठी निलंबित करता येत नाही. याच कारणामुळे अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर केल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. सभागृहातील सदस्यांच्या भावना लक्षात घेता विशिष्ट परिस्थितीत अबू आझमींची आमदारकीच निलंबित करता येईल का, याची चाचपणी करण्यासाठी समिती स्थापन करू; असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.