औरंगजेबाचे कौतुक करणाऱ्या अबू आझमींचे निलंबन

मुंबई : प्रसारमाध्यमांशी बोलताना औरंगजेबाचे भरभरुन कौतुक करणारे आमदार आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू असीम आझमी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत अबू आझमींना निलंबित करण्यात आले आहे. विधानसभेत एकमताने हा ठराव झाला.



राज्य शासनाच्यावतीने चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत अबू आझमी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सादर केला. औरंगजेबाचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी अबू आझमी यांचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आले. याआधी 'फक्त अधिवेशन काळापुरते निलंबन नको. त्यांचे सर्व भत्ते बंद करा. आमदार निधी व पगार ही बंद करा. औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही. प्रस्तावात सुधारणा करा. कारवाई अधिक कठोर करा'; अशी मागणी आमदार आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज पूजनीय आहेत. त्यांचा अपमान करणाऱ्याला ,सहजतेने जाऊ देऊ शकत नाहीत. कठोर कारवाई व्हायला हवी; असेही मुनगंटीवार म्हणाले.



मुनगंटीवार यांची मागणी ऐकल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नियमाची माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लोकप्रतिनिधीला एका सत्रापेक्षा जास्त काळासाठी निलंबित करता येत नाही. याच कारणामुळे अबू आझमी यांना अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्याचा प्रस्ताव सादर केल्याचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. सभागृहातील सदस्यांच्या भावना लक्षात घेता विशिष्ट परिस्थितीत अबू आझमींची आमदारकीच निलंबित करता येईल का, याची चाचपणी करण्यासाठी समिती स्थापन करू; असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
Comments
Add Comment

संगीत साधनेच्या २० वर्षांचा उत्सव - १३६ वी प्रातःस्वर मैफल

प्रत्येक मैफलीत नवा कलाकार अशी संकल्पना मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताच्या संवर्धन व प्रचारासाठी गेली दोन

‘इंग्रजी’ भाषेत नामनिर्देशनपत्र, शपथपत्र भरण्याची मुभा

राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्तांना पत्र मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी मराठीबरोबरच इंग्रजी भाषेतही

३०७ वर्षे नाताळ साजरा करणारे मुंबईतील ‘कॅथेड्रल’

चर्च आकर्षक रोषणाई आणि सजावटीने उजळले ‘चर्चगेट’ मुंबई : मुंबईत आणि उपनगरात सध्या नाताळनिमित्त उत्साहाचे

स्वबळाची भाषा करणाऱ्यांकडे उमेदवारांचा दुष्काळ

काँग्रेसकडे मुंबईतील ३० प्रभागांमध्ये एकही इच्छुक नाही उत्तर मुंबईत उमेदवार शोधण्यासाठी करावी लागणार

१६ जानेवारीला मुंबई जिंका; अटलजींना तीच खरी आदरांजली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई : “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा' हे अटलजींचे उद्गार

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.