झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांवर आता पती-पत्नीचं नाव

मुंबई : जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी आहे. या दिवसाच्या पार्श्वभूमीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे. या निर्णयानुसार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांवर आता पती आणि पत्नी अशी दोघांच्याही नावाची नोंद केली जाणार आहे. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात हा नियम झोपडपट्टी पुनर्वसन योजनांसाठी लागू असेल.



झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या नव्या नियमानुसार पुनर्विकासात मिळणारे घर पती-पत्नी यांच्या संयुक्त नावे करणे बंधनकारक आहे. संपत्तीत पती आणि पत्नी या दोघांचाही वाटा असल्याचे समजतात. याच पद्धतीने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांवर आता पती आणि पत्नी या दोघांचाही हक्क असेल.



घरावर पती आणि पत्नीचे हक्क असल्यास कायदेशीर अडचणी येत नाही. मात्र, काही प्रकरणात अशी नावांची नोंद नसल्यास पतीच्या निधनानंतर महिलेस कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागते. ही समस्या सोडवण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घरांवर आता पती आणि पत्नी अशी दोघांच्याही नावाची संयुक्त नोंद करण्याचा निर्णय झाला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या परिशिष्ट-२ मध्ये यासाठी बदल करण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता घरांचे वितरण करताना घरांच्या वाटपपत्रावर पती-पत्नीवर दोघांची नावे नोंद करुन घरे वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Comments
Add Comment

Sejal Pawar : एमबीबीएस विद्यार्थिनीकडून रुग्णालय प्रशासनाकडे लेखी माफीपत्र सादर

मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेच्या सेठ जी. एस. वैद्यकीय महाविद्यालय व के. ई. एम. रुग्णालयातील एमबीबीएस

Sejal Pawar Controversy : मनोरंजनाच्या नावाखाली अश्लीलता खपवून घेतली जाणार नाही, कारवाई होणारच

वैद्यकीय विद्यार्थिनी सेजल पवार प्रकरणावर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रतिक्रिया मुंबई (विशेष

Devendra Fadnavis : अल निनोचा मोठा परिणाम राज्यावर होईल, टास्क फोर्स तयार

मुंबई : अल निनोचा मोठा परिणाम आपल्या राज्यावर होईल. या संदर्भात आपण तयारी करत आहोत. आपण त्याचा टास्क फोर्स तयार

Devendra Fadnavis : गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता मकोका अंतर्गत कठोर कारवाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात दिले होते स्पष्ट संकेत अन्न व औषध प्रशासन मार्फत अत्यंत

Dahanu Love Jihad : डहाणू लव्ह जिहाद प्रकरणी डीसीपी मीना मकवानांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना

एसआयटी स्थापनेसाठी आमदार चित्रा वाघ यांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे

Devendra Fadnavis : ग्रामीण भागातील पाणीपुरवठा १०० टक्के सौर ऊर्जेवर आणणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पाणीपुरवठा योजनेच्या व्यवस्थापनासाठी तालुकास्तरावर युनिटची निर्मिती मुंबई :