वाशिमचा पालकमंत्री बदलणार ? राष्ट्रवादीचे मुश्रीफ राजीनामा देणार ?

मुंबई : धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. या राजीनाम्याला २४ तास होत नाहीत तोच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याची तयारी सुरू केली आहे. राज्याचे कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्याही राजीनाम्यासाठी विरोधकांचा दबाव वाढत आहे. यामुळे ऐन अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय अडचणी वाढल्या आहेत.



हसन मुश्रीफ मंत्री असल्यामुळे वास्तव्यासाठी अमेकदा मुंबईत शासकीय निवासस्थानी अथवा कोल्हापूरमध्ये स्वतःच्या घरी असतात. पण त्यांना पालकमंत्री म्हणून वाशिम जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे हसन मुश्रीफ यांचा वारंवार कोल्हापूर - मुंबई - वाशिम असा सुमारे ८०० किमी. प्रवास होत आहे. वय आणि तब्येतीमुळे वारंवार हा प्रवास करणे झेपत नसल्याची तक्रार करत हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याची तयारी केली आहे. या संदर्भात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. अजित पवार हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री हे पद सोडू नये यासाठी विनंती करत असल्याचेही वृत्त आहे. पण मुश्रीफ यांनी पद सोडले तर लवकरच वाशिम जिल्ह्याला नवा पालकमंत्री मिळणार आहे.

याआधी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात सुरू झालेल्या वादानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिला. हा राजीनामा राज्यपालांनी मंजूर केला आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराडचा सहभाग निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती.
Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील