Weather Update : नागरिकांना दिलासा! उन्हाचे चटके होणार कमी

  69

अमरावती : फेब्रुवारी महिन्यात दिवस व रात्रीच्या तापमानात कमालीचा फरक होता. दिवसा उन्हाचे चटके व रात्री गारवा, असे वातावरण अनुभवायला मिळाले. मात्र, मार्च महिन्याच्या प्रारंभीच पश्चिमी विक्षोभामुळे पुढील चार ते पाच दिवसांत दिवस व रात्रीच्या तापमानात १ ते ३ अंशांची घट येण्याची शक्यता असल्याची माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रा. अनिल बंड यांनी दिली. (Weather Update)



पाकिस्तानवर पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे. त्यामुळे वायव्य भारत राजस्थान तसेच गुजरात, मध्य प्रदेशमध्ये तापमान घसरले आहे. परिणामी विदर्भात पुढील चार, पाच दिवस कमाल आणि किमान तापमानात १ ते ३ अंशाचीही घट येण्याची शक्यता आहे.


कमाल तापमान ३४ ते ३५, तर किमान तापमान १५ ते १८ सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसा उन्हाच्या चटक्यांपासून अमरावतीकरांना काही अंशी दिलासा मिळणार आहे, तर रात्रीचा गारवा व पहाटे आल्हाददायक वातावरण अनुभवता येईल. काल दिवसाचे तापमान ३७ अंश सेल्सियस, तर रात्रीचे तापमान १९.४ अंश होते. रविवारच्या तुलनेत तापमानात एक अंशाने घट आली. (Weather Update)



तापमानात घट होण्याची शक्यता


पाकिस्तानवर पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे. त्यामुळे वायव्य भारत राजस्थान तसेच गुजरात, मध्य प्रदेशात तापमान घसरले आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस कमाल व किमान तापमान १ ते ३ अंशांनी घट येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

विवाह नोंदणीसाठी आता रविवारीही महापालिकेची सेवा

जोडप्यांना सुट्टीच्या दिवशीही करता येणार नोंदणी विवाह मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी

गरूड पुराणात सांगितलेली ही ४ कामे माणसाचे झोपलेले नशीब जागे करू शकतात, जाणून घ्या...

मुंबई: हिंदू धर्मातील अठरा महापुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणात केवळ मृत्यू आणि परलोकाचेच नव्हे, तर यशस्वी

बैलपोळाच्या दिवशी नदीमध्ये वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह गवसला

अकोला: मूर्तिजापूर तालुक्यातील एक युवक बैलपोळा सणाच्या दिवशी बैलांना धुण्यासाठी पेढी नदीवर गेला असता, अचानक पाय

ढोल-ताशांच्या गजरात गणेशमूर्तींचे आगमन

मुंबई : गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरले असून मुंबईतील अनेक गणेश मंडळांनी मूर्ती मंडपात नेण्यास सुरुवात केली

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

महाराष्ट्रात गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा मान; घरबसल्या दर्शनासाठी विशेष पोर्टल सुरू

मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव, घरगुती गणेशोत्सव, महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला आता राज्याने प्रथमच महाराष्ट्र