Weather Update : नागरिकांना दिलासा! उन्हाचे चटके होणार कमी

अमरावती : फेब्रुवारी महिन्यात दिवस व रात्रीच्या तापमानात कमालीचा फरक होता. दिवसा उन्हाचे चटके व रात्री गारवा, असे वातावरण अनुभवायला मिळाले. मात्र, मार्च महिन्याच्या प्रारंभीच पश्चिमी विक्षोभामुळे पुढील चार ते पाच दिवसांत दिवस व रात्रीच्या तापमानात १ ते ३ अंशांची घट येण्याची शक्यता असल्याची माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रा. अनिल बंड यांनी दिली. (Weather Update)



पाकिस्तानवर पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे. त्यामुळे वायव्य भारत राजस्थान तसेच गुजरात, मध्य प्रदेशमध्ये तापमान घसरले आहे. परिणामी विदर्भात पुढील चार, पाच दिवस कमाल आणि किमान तापमानात १ ते ३ अंशाचीही घट येण्याची शक्यता आहे.


कमाल तापमान ३४ ते ३५, तर किमान तापमान १५ ते १८ सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसा उन्हाच्या चटक्यांपासून अमरावतीकरांना काही अंशी दिलासा मिळणार आहे, तर रात्रीचा गारवा व पहाटे आल्हाददायक वातावरण अनुभवता येईल. काल दिवसाचे तापमान ३७ अंश सेल्सियस, तर रात्रीचे तापमान १९.४ अंश होते. रविवारच्या तुलनेत तापमानात एक अंशाने घट आली. (Weather Update)



तापमानात घट होण्याची शक्यता


पाकिस्तानवर पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे. त्यामुळे वायव्य भारत राजस्थान तसेच गुजरात, मध्य प्रदेशात तापमान घसरले आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस कमाल व किमान तापमान १ ते ३ अंशांनी घट येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

यंदा कधी आहे कोजागिरी पौर्णिमा ? जाणून घ्या या तिथीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

कोजागिरी पौर्णिमा हा आश्विन पौर्णिमेला येणार भारतीय हिंदू संस्कृतीमधील महत्वाचा दिवस आहे. आणि इंग्रजी

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे चिपळूणमध्ये पुराचा धोका

चिपळूण (वार्ताहर) : चिपळूण शहराला असलेल्या पुराच्या धोक्याबाबत उपाययोजना सूचविण्यासाठी राज्य सरकारने जलसंपदा

मंत्री नितेश राणेंचा वैभववाडीत उबाठावर मोठा घाव!

मंगेश लोकेंसह शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश ओरोस (वार्ताहर) : वैभववाडी तालुक्यात उद्धव

गोरेगाव-मुलुंड जोड मार्गाच्या जुळ्या बोगद्याचे काम नवीन वर्षापासून

मुंबई (खास प्रतिनिधी) :गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग प्रकल्पातंर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात

रायगड जिल्हा परिषदेत २ हजार ६०९ पदे रिक्त

अलिबाग (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विकासाला गती देण्याचे काम रायगड जिल्हा परिषदेचे असले, तरी जिल्हा परिषदेत

सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे

शब्दापलीकडे कृती’ची महायुतीकडून वचनपूर्ती युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध : राणे म्हणाले की, राज्यातील