Weather Update : नागरिकांना दिलासा! उन्हाचे चटके होणार कमी

अमरावती : फेब्रुवारी महिन्यात दिवस व रात्रीच्या तापमानात कमालीचा फरक होता. दिवसा उन्हाचे चटके व रात्री गारवा, असे वातावरण अनुभवायला मिळाले. मात्र, मार्च महिन्याच्या प्रारंभीच पश्चिमी विक्षोभामुळे पुढील चार ते पाच दिवसांत दिवस व रात्रीच्या तापमानात १ ते ३ अंशांची घट येण्याची शक्यता असल्याची माहिती श्री शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रा. अनिल बंड यांनी दिली. (Weather Update)



पाकिस्तानवर पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे. त्यामुळे वायव्य भारत राजस्थान तसेच गुजरात, मध्य प्रदेशमध्ये तापमान घसरले आहे. परिणामी विदर्भात पुढील चार, पाच दिवस कमाल आणि किमान तापमानात १ ते ३ अंशाचीही घट येण्याची शक्यता आहे.


कमाल तापमान ३४ ते ३५, तर किमान तापमान १५ ते १८ सेल्सियस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसा उन्हाच्या चटक्यांपासून अमरावतीकरांना काही अंशी दिलासा मिळणार आहे, तर रात्रीचा गारवा व पहाटे आल्हाददायक वातावरण अनुभवता येईल. काल दिवसाचे तापमान ३७ अंश सेल्सियस, तर रात्रीचे तापमान १९.४ अंश होते. रविवारच्या तुलनेत तापमानात एक अंशाने घट आली. (Weather Update)



तापमानात घट होण्याची शक्यता


पाकिस्तानवर पश्चिमी विक्षोभ सक्रिय आहे. त्यामुळे वायव्य भारत राजस्थान तसेच गुजरात, मध्य प्रदेशात तापमान घसरले आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस कमाल व किमान तापमान १ ते ३ अंशांनी घट येण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

विख्यात कंपनी अनंत राजकडून डेटा सेंटर उभारण्यासाठी ४५०० कोटी गुंतवणूकीची घोषणा

प्रतिनिधी: विख्यात रिअल्टी कंपनी अनंत राज लिमिटेडने आपल्या पोर्टफोलिओ विस्तार करण्यासाठी आंध्र प्रदेशात

Utakarsh Small Finance Bank Q2Results: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा तिमाही निकाल जाहीर यंदा तिमाहीत बँकेला ३४८ कोटींचा निव्वळ तोटा

मोहित सोमण: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आपला तिमाही निकाल आज जाहीर केला आहे. या निकालातील माहितीनुसार, बँकेला

सनातन एकता पदयात्रेदरम्यान बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री यांची प्रकृती चिंताजनक

मथुरा : सनातन एकता पदयात्रेच्या आठव्या दिवशी बागेश्वर धामाचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ

उत्पन्ना एकादशीचे महत्त्व आणि पाळा हे नियम! जाणून घ्या सविस्तर...

दर महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास आणि व्रत केले जाते. प्रत्येक एकादशीला विशिष्ट असे