प्रवासवर्णनकार डॉ. मीना प्रभू यांचे निधन

मुंबई : प्रवासवर्णनकार, कादंबरीकार, लेखिका, कवयित्री डॉ. मीना प्रभू यांचे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या.



डॉ. मीना प्रभू या मूळच्या पुण्याच्या होत्या. लग्नानंतर डॉ. मीना प्रभू लंडनमध्ये स्थायिक झाल्या होत्या. भूलतज्ज्ञ असलेल्या डॉ. मीना प्रभू यांनी लिहिलेल्या प्रवासवर्णनांनी त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. 'माझं लंडन' हे त्यांचे पहिले प्रवासवर्णन. डॉ. मीना प्रभू यांनी १२ पेक्षा जास्त प्रवासवर्णने लिहिली आहेत. 'माझं लंडन', 'इजिप्तायन', 'तुर्कनामा', 'ग्रीकांजली', 'चिनी माती' अशी अनेक प्रवासवर्णनांची पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. आयुष्यात डॉ. मीना प्रभू यांनी अनेक देशांचा प्रवास केला. या देशांविषयी त्यांनी प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांचे प्रवासवर्णनांवरील लेख विविध वृत्तपत्रे, मासिके यामध्ये प्रकाशित झाले होते.



गोव्यात झालेल्या महिला साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. मीना प्रभू यांनी भूषविले होते. त्यांना २०१० चा दि. बा. मोकाशी पुरस्कार, २०११ चा गो. नी. दांडेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मृण्मयी पुरस्कार, २०१२ चा न. चिं. केळकर पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या अनेक पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले. त्यांनी २०१७ मध्ये पुण्यात 'प्रभू ज्ञानमंदिर' नावाची किंडल लायब्ररी सुरू केली.
Comments
Add Comment

शिवसेना आमदार कुडाळकर यांच्याविरोधात म्हाडाच्या जमिनीवर कब्जा केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश

मुंबई : भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत असलेल्या विशेष न्यायालयाने बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला

Ashish Shelar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा बरी, विचारांवर नेहमीच खरी!' आशिष शेलारांची कवितेतून संजय राऊतांवर जहरी टीका

राऊतांच्या पुनरागमनावर मंत्री शेलारांची उपरोधिक टोलेबाजी मुंबई : महाराष्ट्र राज्याचे राजकारण सध्या

महापालिका म्हणतेय, गेल्यावर्षीच्या तुलनेत मुंबईच्या हवेतील गुणवत्तेत सुधारणा

समीर ऍप आणि संकेतस्थळाच्या आकडेवारीच्या आधारे केला महापालिकेला दावा मुंबई : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण

सोने तस्करीसाठी मुंबई विमानतळ मुख्य केंद्र! काय सांगतो डीआरआयचा अहवाल? जाणून घ्या सविस्तर

मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाने आपल्या अहवालात म्हटले आहे की, २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात आणि

Cabinet decisions : गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारक परिसरातील अतिक्रमणे रोखण्यासाठी समिती

मुंबई : राज्यातील गड-किल्ल्यांप्रमाणेच राज्य संरक्षित स्मारकांच्या ठिकाणांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी

राष्ट्रवादीच्या माणिकराव कोकाटेंना अटक होणार ?

मुंबई : नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने अटक वॉरंट काढल्यानंतर मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जामिनासाठी मुंबई उच्च