Indian Railway : वेटिंग तिकीटावर प्रवास केल्यास दंड! ट्रेन तिकीट बुकिंगचे नवे नियम लागू

मुंबई : भारतीय रेल्वे (Indian Railway) ही देशातील सर्वांत मोठी परिवहन व्यवस्था असून, दररोज लाखो प्रवासी या माध्यमातून प्रवास करतात. नुकतेच भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग (Railway Ticket Booking) प्रक्रियेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. याबाबत नवी नियमावली जारी केली असून आजपासून नवे नियम लागू करण्यात आले आहेत. जाणून घ्या काय आहेत ते नियम.



अ‍ॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड (ARP) मध्ये बदल


भारतीय रेल्वेच्या नवीन नियमांमध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे अ‍ॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड (ARP) १२० दिवसांवरून ६० दिवसांपर्यंत कमी केले आहे. यामुळे प्रवाशांना त्यांच्या यात्रेचे अधिक अचूक नियोजन करण्यास मदत करेल. बहुतेक प्रवासी त्यांच्या प्रवासाचे नियोजन दोन महिन्यांपेक्षा जास्त आधी करत नाहीत, त्यामुळे हा कालावधी व्यावहारिक दृष्टिकोनातून अधिक योग्य ठरणार आहे.



वेटिंग तिकीटसाठी नवे नियम


आतापर्यंत अनेक प्रवासी वेटिंग तिकीटवर रिझर्व्हेशन डब्यात प्रवास करत होते.. यामुळे कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांना गर्दीचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. यामुळे प्रशासनाने आता वेटिंग तिकीट केवळ जनरल डब्यात मान्य असेल, असा निर्णय घेतला आहे.


दरम्यान, वेटिंग तिकीट असलेले प्रवासी केवळ जनरल डब्यात प्रवास करू शकणार आहेत. परंतु जर कोणी वेटिंग तिकीटवर रिझर्व्हेशन डब्यात प्रवास करताना आढळल्यास त्यांना AC कोचसाठी ४४० रुपये तर स्लीपर कोचसाठी २५० रुपये दंड भरावा लागणार आहे.



तत्काल तिकीट बुकिंगमध्ये सुधारणा


प्रवाशांना अंतिम क्षणी तिकीट मिळवून देणाऱ्या तत्काल तिकीट बुकिंग सुविधेतही भारतीय रेल्वेने बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार तत्काल बुकिंगसाठी वेळ विभागणी करण्यात आली आहे. याआधी सर्व प्रकारच्या तत्काल तिकिटांसाठी एकाच वेळी बुकिंग सुरू होते. मात्र आता AC क्लाससाठी सकाळी १० वाजता तर नॉन-AC क्लाससाठी सकाळी ११ वाजता तत्काल बुकिंग सुरू होईल.


दरम्यान, तत्काल तिकिटांच्या किंमतींमध्येही बदल करण्यात आले आहेत. आता प्रवासाच्या अंतरावर तिकीट किंमत लागू असणार आहे. तथापि, तत्काल तिकिटांवर किमान आणि कमाल मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे.



रिफंड पॉलिसीमध्ये बदल


भारतीय रेल्वेने रिफंड पॉलिसीमध्ये देखील लक्षणीय बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार प्रवाशांना ट्रेन रद्द झाल्यास संपूर्ण तिकीट रक्कम परत मिळेल. तसेच ट्रेन तीन तासांपेक्षा जास्त उशीरा धावल्यास प्रवाशांना पूर्ण रिफंड मिळू शकेल.


तसेच यापूर्वी प्रवासी त्यांचे प्रवासाचे नियोजन बदलल्यास रिफंड मिळवू शकत होते, परंतु आता ही सुविधा मर्यादित केली गेली आहे. नवीन नियमांनुसार प्रवासापूर्वी २४ तासांपेक्षा जास्त काळात रद्द केल्यास ५० टक्के रिफंड मिळू शकणार आहे. प्रवासापूर्वी १२-२४ तासांच्या दरम्यान रद्द केल्यास २५ टक्के रिफंड मिळणार आहे. तर प्रवासापूर्वी १२ तासांपेक्षा कमी वेळेत रद्द केल्यास रिफंड मिळणार नाही.



परदेशी पर्यटकांसाठी विशेष सुविधा


परदेशी पर्यटकांसाठी भारतीय रेल्वेने विशेष सुविधा उपलब्ध केली आहे. त्यांच्यासाठी अ‍ॅडव्हान्स रिझर्वेशन पीरियड (ARP) ३६५ दिवस कायम ठेवण्यात आला आहे. तसेच परदेशी पर्यटकांना विशेष पर्यटक कोटा देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्रत्येक ट्रेनमध्ये काही निवडक सीट्स राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या सुविधेमुळे पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल आणि देशात अधिक परदेशी पर्यटक येतील.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात