झोपडपट्टीमुक्त वसई, विरारसाठी विकासकांची कार्यशाळा

  46

विरार : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात झोपडीत राहणाऱ्यांना हक्काच्या घरात आणण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि महापालिकेच्या वतीने शुक्रवारी महापालिकेच्या सभागृहात वास्तु विशारद व विकासकांची कार्यशाळा घेण्यात आली.


वसई विरार महानगरपालिकेच्या विविध परिसरात झोपडपट्ट्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना तातडीने राबविण्याकरिता २८ फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आ. राजन नाईक, आ.स्नेहा दुबे पंडित, आ.विलास तरे यांच्यासह विरार महानगरपालिका आयुक्त अनिल कुमार पवार तसेच मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित होते.



ही योजना यशस्वी करण्यासाठी वास्तू विशारद व विकासक यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या योजनेबाबत असलेल्या शंकांचे निराकरण करण्यासोबतच संपूर्ण योजना व योजनेची अंमलबजावणी याची माहिती देखील या कार्यशाळातून वास्तू विशारद व विकासाकांना देण्यात आली. वसई विरार महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना अधिकृत आवाज देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे तिन्ही आमदारांनी सांगितले.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता