विरार : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात झोपडीत राहणाऱ्यांना हक्काच्या घरात आणण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि महापालिकेच्या वतीने शुक्रवारी महापालिकेच्या सभागृहात वास्तु विशारद व विकासकांची कार्यशाळा घेण्यात आली.
वसई विरार महानगरपालिकेच्या विविध परिसरात झोपडपट्ट्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना तातडीने राबविण्याकरिता २८ फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आ. राजन नाईक, आ.स्नेहा दुबे पंडित, आ.विलास तरे यांच्यासह विरार महानगरपालिका आयुक्त अनिल कुमार पवार तसेच मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित होते.
ही योजना यशस्वी करण्यासाठी वास्तू विशारद व विकासक यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या योजनेबाबत असलेल्या शंकांचे निराकरण करण्यासोबतच संपूर्ण योजना व योजनेची अंमलबजावणी याची माहिती देखील या कार्यशाळातून वास्तू विशारद व विकासाकांना देण्यात आली. वसई विरार महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना अधिकृत आवाज देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे तिन्ही आमदारांनी सांगितले.
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…
मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…