झोपडपट्टीमुक्त वसई, विरारसाठी विकासकांची कार्यशाळा

विरार : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात झोपडीत राहणाऱ्यांना हक्काच्या घरात आणण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि महापालिकेच्या वतीने शुक्रवारी महापालिकेच्या सभागृहात वास्तु विशारद व विकासकांची कार्यशाळा घेण्यात आली.


वसई विरार महानगरपालिकेच्या विविध परिसरात झोपडपट्ट्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना तातडीने राबविण्याकरिता २८ फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आ. राजन नाईक, आ.स्नेहा दुबे पंडित, आ.विलास तरे यांच्यासह विरार महानगरपालिका आयुक्त अनिल कुमार पवार तसेच मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित होते.



ही योजना यशस्वी करण्यासाठी वास्तू विशारद व विकासक यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या योजनेबाबत असलेल्या शंकांचे निराकरण करण्यासोबतच संपूर्ण योजना व योजनेची अंमलबजावणी याची माहिती देखील या कार्यशाळातून वास्तू विशारद व विकासाकांना देण्यात आली. वसई विरार महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना अधिकृत आवाज देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे तिन्ही आमदारांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबई वॉटर मेट्रो जलवाहतूक प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुंबई : "मुंबई महानगर प्रदेशात जलप्रवासी वाहतुकीसाठी वॉटर मेट्रो प्रकल्प तीन टप्प्यात कार्यान्वित करण्यात

आमदार हेमंत पाटील यांनी मांडली 'लव्ह जिहाद' आणि 'लोकसंख्या नियंत्रणाची' आग्रही भूमिका

विधान परिषदेत धर्मांतर विरोधी विधेयकावर चर्चा मुंबई : विधान परिषदेत आज धर्मांतर विरोधी विधेयकावर अत्यंत

धर्मांतर हा श्रद्धेचा विषय, व्यवहाराचा नाही!"; विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकरांची ठाम भूमिका

मुंबई: "धर्म हा केवळ मानवी श्रद्धेचा भाग असून त्याचा व्यवहारासाठी किंवा स्वार्थासाठी वापर करणे चुकीचे आहे.

राज्यातील कालबाह्य ८० कायदे रद्द

विधेयक मंजूर; मुंबई फटक्यांची शिक्षा रद्द करण्याचा अधिनियम रद्द मुंबई : महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले ८०

नायजेरियन नागरिकांविरोधात लवकरच धडक मोहीम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वैध कागदपत्रे नसलेल्यांना हद्दपार करणार मुंबई : राज्यात विशेषतः मुंबईनजीकच्या उपनगरांमध्ये बेकायदेशीरपणे

ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी कारवाईची वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षे करणार

मुंबई : अमली पदार्थांच्या तस्करीसाठी मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुलांचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे याला पायबंद