झोपडपट्टीमुक्त वसई, विरारसाठी विकासकांची कार्यशाळा

विरार : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात झोपडीत राहणाऱ्यांना हक्काच्या घरात आणण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि महापालिकेच्या वतीने शुक्रवारी महापालिकेच्या सभागृहात वास्तु विशारद व विकासकांची कार्यशाळा घेण्यात आली.


वसई विरार महानगरपालिकेच्या विविध परिसरात झोपडपट्ट्यांचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन योजना तातडीने राबविण्याकरिता २८ फेब्रुवारी रोजी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आ. राजन नाईक, आ.स्नेहा दुबे पंडित, आ.विलास तरे यांच्यासह विरार महानगरपालिका आयुक्त अनिल कुमार पवार तसेच मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित होते.



ही योजना यशस्वी करण्यासाठी वास्तू विशारद व विकासक यांना विश्वासात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे या योजनेबाबत असलेल्या शंकांचे निराकरण करण्यासोबतच संपूर्ण योजना व योजनेची अंमलबजावणी याची माहिती देखील या कार्यशाळातून वास्तू विशारद व विकासाकांना देण्यात आली. वसई विरार महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील झोपडपट्टीधारकांना अधिकृत आवाज देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे तिन्ही आमदारांनी सांगितले.

Comments
Add Comment

रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल

मुंबई : रेल्वे मंत्रालयाने रेल्वेअपघातांबाबत एक महत्त्वाचा दावा केला आहे. मंत्रालयाने त्यांच्या डेटा

मध्य, पश्चिम रेल्वेवर आज मेगाब्लॉक

देखभालीच्या कामांमुळे मार्गात बदल मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल

महापालिकेच्या ४२६ घरांची लॉटरी सोडत जाहीर, आणखी २९६ सदनिकांसाठी काढणार लॉटरी

एकूण ४२६ पैकी ३७३ अर्जदारांना लागली घरांची लॉटरी मुंबई : मुंबई महानगरपालिकेतर्फे विकास नियंत्रण व प्रोत्साहन

अखेर मुलुंड अगरवाल रुग्णालय लोकांसाठी होणार खुले

रविवारी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या लोकार्पण मुंबई : मुंबई महानगरपालिका संचालित मनसादेवी तुलसीराम

मुलुंडमध्ये आता देश विदेशातील पक्ष्यांचे घडणार दर्शन

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पक्षी उद्यानाचे भूमिपुजन मुंबई : मुंबईच्या उपनगरीय भागात

रडार स्थलांतराला केंद्राची संमती; दहिसर-जुहू परिसरातील पुनर्विकासाला मिळणार गती

मुंबई : दहिसर आणि जुहू (डी.एन.नगर) येथील उच्च वारंवारता रडार केंद्रांमुळे रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्यासाठी