Disha Salian death case : आदित्य ठाकरेंची दिशा सालियन मृत्यू प्रकरणात अटक माझ्यामुळे टळली!

आता कोणत्याही क्षणी होणार आदित्य ठाकरेंना अटक; ठाकरे गटातील माजी नेत्याच्या दाव्याने राज्यात खळबळ


मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणात (Disha Salian death case) आदित्य ठाकरेंची (Aditya Thackeray) अटक होऊ नये म्हणून मी त्यावेळी माझ्या सर्व स्रोतांचा वापर केला होता. त्यामुळेच आदित्य ठाकरेंची अटक टळली, अन्यथा त्यांना आधीच अटक झाली असती, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे माजी नेते किशोर तिवारी (Kishor Tiwari) यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


किशोर तिवारी यांनी यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख करत सांगितले की, "पंतप्रधान मोदींना जेव्हा वाटेल, तेव्हा आदित्य ठाकरे यांना अटक होईल." तसेच, आदित्य ठाकरे हे कॅबिनेट मंत्री असताना दिशा सालियन हिच्या घरी जाऊन पार्टी केल्याचा आणि त्यानंतर दिशा सालियनने आत्महत्या केल्याचा गंभीर आरोप तिवारी यांनी केला आहे.



तिवारी यांनी पुढे सांगितले की, आदित्य ठाकरेंची अटक होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या सर्व स्रोतांचा वापर केला होता. त्यामुळेच त्यांची अटक टळली. तिवारी हे पूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते, मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.



दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केल्यापासून या प्रकरणावर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. काहींनी तिच्या आत्महत्येमागे कट असल्याचा आरोप केला होता. आता किशोर तिवारी यांच्या वक्तव्यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Comments
Add Comment

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला

मृणालताई गोरे विस्तारित उड्डाणपूलाच्या वाढीव खर्चावरून शंका; स्थायी समितीचे सदस्य करणार प्रत्यक्ष जागेची पाहणी

मुंबई: मृणालताई गोरे रेल्वे उड्डाणपुलाला जोडणाऱ्या राम मंदिर रोड ते गोरेगाव पश्चिम पर्यंतच्या रिलीफ रोड

सहली आडून कंत्राटदारांचे खिसे भरण्याचा घाट भाजपने उधळला

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमधील मुलांची राणीबाग आणि बोरीवली नॅशनल पार्कमध्ये सहल आयोजित करण्याचा

अखेर महापौर चषक स्पर्धा होणार; सन २०२६-२७ मध्ये होणाऱ्या महापौर चषक क्रीडा स्पर्धांसाठी पाच कोटी रुपये निधीची तरतूद

मुंबई: डिजिटल युगात मुले भ्रमणध्वनीभोवती गुरफटली आहेत. मुले मैदानी खेळ विसरली आहेत. मुलांचा ‘स्क्रीन टाईम’ कमी

मुंबई अखंडपणे धावण्यामागे महिलांचे योगदान मोठे; 'सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी महापौरांचे वक्तव्य

मुंबई: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजातील अन्यायाविरोधात उभे राहत मुलींसाठी शिक्षणाचा मार्ग खुला

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :