५ वर्षीय बालिकेवर नराधमाचा अत्याचार

अकोले तालुक्यातील घटना; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल


अकोले : तालुक्यात वारंवार मुलींवर आत्याचाराच्या घटना समोर येत असल्याने पालक वर्गात चिंता व्यक्त होत असतानाच तालुक्यातील ग्रामीण भागातून खळबळजनक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. एका नराधमाने केवळ पाच वर्षाचे वय असलेल्या चिमुकलीवर अत्याचार केला. पोलिसांनी या नराधमावर पोस्को अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पीडित चिमुकलीच्या आईने अकोले पोलिसात फिर्याद दिल्यावरून पोलिसांनी आरोपी नराधम आकाश संतु कासार (रा. शेरणखेल, तालुका अकोले) याच्यावर पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते ११.३० वाजेच्या सुमारास आरोपी कासार याने ५ वर्षीय बालिकेला आईने घरी बोलवले आहे, असे सांगुन आरोपी कासार याने तिला स्वतःच्या घरी नेले.तेथे पिडीत बालिकेवर लैंगिक अत्याचार केला.



याप्रकरणी अकोले पोलिस ठाण्यात आरोपी आकाश कासार याच्याविरुद्ध पोस्को कायदा कलम ४,८,१२,०९ ( एम ), सहकलम अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ३(२ ) (व्ही) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे व पोलीस निरीक्षक मोहन बोरसे करत आहेत.
Comments
Add Comment

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी

अपहरण प्रकरण, निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पुणे: निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर संबंधित एक विवादीत प्रकरण समोर येत आहे.  पोलिस

OBC Reservation: ओबीसी आरक्षण बचावासाठी बीडमध्ये दुसरी आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर: ओबीसी समाजाच्या आरक्षणामधली घुसखोरी थांबविली पाहीजे या साठी बीड मध्ये दुसरी आत्महत्या

९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर ‘पानिपत’कार विश्वास पाटलांची निवड

पुणे: साताऱ्यात होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार

अचानक येऊन पाहणी करा, पुणेकर महिलेची अजित पवारांकडे मागणी

पुणे : वाहनांची वाढती संख्या विचारात घेता रस्ते रुंद करण्यावर शासनाचा भर आहे, वाढत्या वाहनामुळे वाहतूक कोंडी