हिंदू समाजाला एकत्र करणे हेच संघाचे उद्दिष्ट : मोहन भागवत

कोलकाता (वृत्तसंस्था): देशासाठी जबाबदार असलेला समाज हा हिंदू आहे.त्यामुळेच संघाचे उद्दिष्ट फक्त हिंदू समाजाला एकत्र करणे आहे, असे ठाम मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले.



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पश्चिम बंगालमध्ये १० दिवसांचा दौरा केला. त्याच दौऱ्याची रविवारी जाहीर सभेने सांगता झाली आहे. या सभेला संबोधित भागवत पुढे म्हणाले की,देशभरात १ लाख ३० हजारांहून अधिक स्वयंसेवक आहेत. तो कोणाकडूनही पैसे घेत नाही, तो स्वतः काम करतो. म्हणूनच आम्ही म्हणतोय की, आम्ही हे प्रसिद्ध होण्यासाठी करत नाही आहोत, तर भारताच्या प्रगतीत अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी आम्ही हे करत आहोत.
पुढे ते म्हणाले,”भारताला एक निसर्ग आहे आणि ज्यांना वाटले की ते त्या निसर्गासोबत राहू शकत नाहीत. त्यांनी स्वतःचा वेगळा देश निर्माण केला. हिंदू जगाच्या विविधतेचा स्वीकार करून पुढे जातात.आजकाल आपण विविधतेत एकता म्हणतो, हिंदूंचा असा विश्वास आहे की एकतेत विविधता आहे."



रामायणातील दाखले देत संघप्रमुख म्हणाले की,”इथे राजे आणि सम्राटांची आठवण कोणालाच नाही पण तो राजा आठवतो ज्याने आपल्या वडिलांसाठी १४ वर्षे वनवासात घालवला आणि ज्याने आपल्या भावाचे चप्पल ठेवले आणि परतल्यावर आपल्या भावाला राज्य दिले.



मोहन भागवत यांनी पश्चिम बंगालच्या दहा दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी संघाच्या अनेक नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. यामध्ये त्यांनी संघाचे संघटन बळकट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय, मोहन भागवत यांनी आरजी कार मेडिकल कॉलेज बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या पालकांचीही भेट घेतली. दरम्यान भागवत यांचा हा पश्चिम बंगाल दौरा म्हत्त्वाचा मानला जात आहे, कारण येत्या काळात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर शेजारील देश बांगलादेशशी संबंध बिघडलेले आहेत.त्यामुळे बंगालच्या सीमावर्ती भागात तणाव आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.
Comments
Add Comment

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात महाराष्ट्र खाद्य महोत्सव

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या खमंग खाद्य पदार्थांचा आस्वाद दिल्लीकरांना मिळावा या उद्देशाने राजधानी दिल्ली

मोदी सरकारचा मोठा निर्णय, पीएमओ आता ‘सेवा तीर्थ’, राजभवन होणार ‘लोक भवन’

नवी दिल्ली : केंद्र सरकार प्रशासकीय रचनेत मोठा बदल करण्याच्या तयारीत असून, सत्ता आणि अधिकार यांची पारंपरिक

भारतीय नौदलप्रमुखांच्या 'त्या' वक्तव्याने पाकिस्तानला भरली धडकी

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर आजही सुरू आहे. सुरक्षेच्या कारणास्तव काही बाबी सार्वजनिक करता येत नाही. पण योग्य ती

Bomb Threat : 'बॉम्ब'च्या धमकीने इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मुंबई : हैदराबादहून कुवैतकडे जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सच्या एका विमानाला धमकीचा ई-मेल आल्यानंतर मंगळवारी

डिजिटल अरेस्ट घोटाळ्यांची चौकशी सीबीआयकडे द्या: सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वोच्च न्यायालयाने सायबर गुन्ह्यांशी संबंधित 'डिजिटल अरेस्ट' प्रकरणांच्या

केरळच्या मुख्यमंत्र्यांना ईडीची नोटीस

तिरुवनंतपुरम (वृत्तसंस्था): तिरुवनंतपुरममध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्यावर नव्या आरोपांची