हिंदू समाजाला एकत्र करणे हेच संघाचे उद्दिष्ट : मोहन भागवत

कोलकाता (वृत्तसंस्था): देशासाठी जबाबदार असलेला समाज हा हिंदू आहे.त्यामुळेच संघाचे उद्दिष्ट फक्त हिंदू समाजाला एकत्र करणे आहे, असे ठाम मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले.



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पश्चिम बंगालमध्ये १० दिवसांचा दौरा केला. त्याच दौऱ्याची रविवारी जाहीर सभेने सांगता झाली आहे. या सभेला संबोधित भागवत पुढे म्हणाले की,देशभरात १ लाख ३० हजारांहून अधिक स्वयंसेवक आहेत. तो कोणाकडूनही पैसे घेत नाही, तो स्वतः काम करतो. म्हणूनच आम्ही म्हणतोय की, आम्ही हे प्रसिद्ध होण्यासाठी करत नाही आहोत, तर भारताच्या प्रगतीत अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी आम्ही हे करत आहोत.
पुढे ते म्हणाले,”भारताला एक निसर्ग आहे आणि ज्यांना वाटले की ते त्या निसर्गासोबत राहू शकत नाहीत. त्यांनी स्वतःचा वेगळा देश निर्माण केला. हिंदू जगाच्या विविधतेचा स्वीकार करून पुढे जातात.आजकाल आपण विविधतेत एकता म्हणतो, हिंदूंचा असा विश्वास आहे की एकतेत विविधता आहे."



रामायणातील दाखले देत संघप्रमुख म्हणाले की,”इथे राजे आणि सम्राटांची आठवण कोणालाच नाही पण तो राजा आठवतो ज्याने आपल्या वडिलांसाठी १४ वर्षे वनवासात घालवला आणि ज्याने आपल्या भावाचे चप्पल ठेवले आणि परतल्यावर आपल्या भावाला राज्य दिले.



मोहन भागवत यांनी पश्चिम बंगालच्या दहा दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी संघाच्या अनेक नेत्यांसोबत अनेक बैठका घेतल्या. यामध्ये त्यांनी संघाचे संघटन बळकट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय, मोहन भागवत यांनी आरजी कार मेडिकल कॉलेज बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या पालकांचीही भेट घेतली. दरम्यान भागवत यांचा हा पश्चिम बंगाल दौरा म्हत्त्वाचा मानला जात आहे, कारण येत्या काळात पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर शेजारील देश बांगलादेशशी संबंध बिघडलेले आहेत.त्यामुळे बंगालच्या सीमावर्ती भागात तणाव आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.
Comments
Add Comment

लाल किल्ला ब्लास्ट : 'आत्मघाती' नव्हे, 'अपघाती' स्फोट; तपास कुठे पोहोचला? १० पॉइंट्समध्ये जाणून घ्या

नवी दिल्ली : भारताची राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटाने केवळ देशातच नव्हे, तर संपूर्ण

एक पोस्टर आणि जम्मू काश्मीर पोलीसांनी केला कट्टरपंथी व्यावसायिकांच्या व्हाईट कॉलर दहशतवादाचा पर्दाफाश! जाणून घ्या सविस्तर घटनाक्रम

नवी दिल्ली: राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या एका मोठ्या दहशतवादी नेटवर्कला उध

धरमशाला येथे २१ महिन्यांनंतर भारत-दक्षिण आफ्रिका टी-२० सामना

नवीन विंटर राई ग्रासने स्टेडियम सजवले धरमशाला : हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनला जवळजवळ २१ महिन्यांनंतर

दिल्ली स्फोटानंतर कोलकातामध्ये सुरक्षा वाढवली

कोलकाता :  दिल्ली बॉम्बस्फोटांनंतर, कोलकाता पोलिसांनी ईडन गार्डन्स स्टेडियमवरील सुरक्षा वाढवली आहे आणि भारतीय

जैश-ए-मोहम्मदचे व्हाईट कॉलर नेटवर्क उद्ध्वस्त, २९२३ किलो स्फोटके आणि शस्त्रे जप्त

नवी दिल्ली : सरकार आणि सुरक्षा संस्थांच्या सतर्कतेमुळे हल्ले करण्यास दीर्घकाळ असमर्थता दर्शविल्याने निराश

दिल्ली स्फोटातील ‘त्या’ आय २० कारने कुठून कसा केला प्रवास?

या घटनाक्रमात ही गाडी ठरतेय महत्वाचा फॅक्टर नवी दिल्ली :  देशाची राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ सोमवारी,