जामखेड पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार?

  65

कार्यालयात खासगी एजंटचा सुळसुळाट


जामखेड : जामखेड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले असून कार्यालयात खाजगी एजंटचा सुळसुळाट असून आर्थिक मलिंदा खाण्यासाठी काही तलाठीही या विभागाचा बेकायदेशीररित्या कारभार हाकलताना दिसत आहे रेशनकार्डासाठी वारंवार इतर कामधंदे सोडून कार्यालयात हेलपाटे मारावे लागत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत असून पुरवठा विभागाच्या कारभारात लवकरात लवकर सुधारणा करावी अशी मागणी होत आहे.


जामखेड तहसीलदार कार्यालया अंतर्गत पुरवठा शाखा असून या शाखेमार्फत विविध कामे केली जातात. नविन रेशनकार्ड काढणे, रेशनकार्डात विवाहित महिलांची व लहान मुलांची नावे समाविष्ट करणे, लग्न झालेल्या मुलींची नावे कमी करणे, नावात दुरूस्ती करणे आदी स्वरुपाची कामे या कार्यालयामार्फत केली जातात. मात्र या कामासाठी कर्मचारी वेळेत काम करत नसल्याने नागरिकांना यासाठी वारंवार हेलपाटे मारावे लागत आहे.



तालुक्यातील नागरिक ग्रामीण भागातून येथे इतर कामे सोडून आपल्या कामासाठी वारंवार हेलपाटे मारत असून त्यांना या कामासाठी महिनोंमहिने लागत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.काही कामासाठी पैशांचीही मागणी होते याकडे सफशेल दुर्लक्ष करण्यात येते,काही कामासाठी सात ते पंधरा दिवसांचा कालावधी अपेक्षित असताना दीड ते दोन महिने लागत असल्याने पुरवठा विभागाच्या कासवगती कामाबद्दल नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने आथिर्क व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.


रेशनकार्ड संदर्भातील विविध कामे करताना मुळ रेशनकार्ड घेतले जाते. त्यामुळे इतर कामासाठी रेशनकार्डची गरज भासल्यास ते मिळत नसल्याने नागरिकांची इतरही कामे खोळंबतात.तसेच कामे करण्यासाठी काही एजंट कार्यालयात बसून असतात तसेच काही तलाठी बेकायदेशीररीत्या पुरवठा विभागाचा कारभार हाकलताना दिसते तसेच कामासाठी आलेल्या नागरिकांना कर्मचार्‍याकडून उर्मट उत्तरे दिली जातात, अशी तक्रार नागरिक करत आहे. दरम्यान, या कार्यालयात कर्मचारी वाढवून नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.


पुरवठा विभागाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आशीर्वाद


येथील पुरवठा विभागाचा कारभार बेशिस्तपणे चालेल असून अनेक वेळा तक्रारी करून फक्त कर्मचाऱ्यांना समज देऊन सोडले जाते,त्यामुळे कर्मचाऱ्यांना धाक नसल्याने मनमानी करभार केला जात आहे,पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतर विभागातील अधिकारी या विभागात जास्त लक्ष घालताना दिसत आहे.


Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या