'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 'जेएनयू'पेक्षाही डावे...'

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) जेएनयूपेक्षाही डाव्या विचारांचे असल्याचे जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या. वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी हे वक्तव्य केले.



'मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) काम केले आहे. तिथे शिकल्यावर तर कुठेही राजकारण करता येईल. त्या जोरावरच मी 'जेएनयू'मध्ये चांगले काम करू शकत आहे; असेही डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या.



'जेएनयू'मध्ये आतापर्यंत एकही महिला कुलगुरू झाली नव्हती. ही परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने बदलली आहे. ते नारीशक्तीविषयी जे बोलले ते त्यांनी करुन दाखवले. 'जेएनयू'ने आयआयटी आणि आयआयएमला मागे टाकले आहे; असेही डॉ. शांतिश्री पंडीत यांनी सांगितले.



डाव्या विचारांच्या अभ्यासकांनी भारतात प्रामुख्याने डाव्या विचारांचे स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीकारक होते असेच सांगितले. डाव्यांनी वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा थोरांचे कतृत्व झळाळून लोकांपुढे येऊ नये याची जास्त खबरदारी घेतली. आता या महान व्यक्तिमत्वांची महती आपल्याला जनतेला सांगावीच लागेल, असे डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या.



काँग्रेस ज्या सावरकरांचा अपमान करते त्या सावरकरांसारखे आयुष्य काँग्रेसचे किती नेते आजवर जगले आहेत ? इंग्रजांच्या काळातही काँग्रेसच्या ठराविक नेत्यांना कायम व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली आहे, असे डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या. हिंदू बहुसंख्यांक असतील तरच या देशात धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही व्यवस्था राहील; असा विश्वास डॉ. शांतिश्री पंडीत यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Weather Alert: विसर्जनाच्या दिवशी मुसळधार पाऊस, आयएमडीचा महाराष्ट्रासाठी मोठा इशारा

नवी दिल्ली: आज महाराष्ट्रात अनंत चतुर्दशी साजरी केली जात असून, आपल्या लाडक्या बाप्पाच्या विसर्जनात सर्व

मोठी भरती! महाराष्ट्रात अनुकंपा आधारावर होणार मेगा भरती!, १०,००० रिक्त पदे भरली जाणार

दिवाळीपूर्वी सरकार देणार सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट मुंबई: दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना शासनाकडून

Pune Crime: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात तरुणाची गोळ्या झाडून हत्या, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आलं समोर

पुणे: गणेश विसर्जनच्या पूर्वसंध्येला पुण्यात धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यातील नाना पेठेत आयुष (गोविंदा) गणेश

राज्याचा परकीय गुंतवणुकीचा आलेख घसरला

कर्नाटकचा पहिला नंबर, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी मुंबई : परकीय थेट गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात नेहमीच

"महाराष्ट्राच्या मानगुटीवर पवारांनी जरांगे नावाचं भूत बसवलं", बारामतीत हाकेंचं पवारांविरुद्ध आक्रमक भाषण,

बारामती: मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न तापत असताना ओबीसी समाजात नाराजीचे वातावरण आहे. सरकारने मनोज जरांगे

त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भातील डॉ.नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समिती सदस्यांची नियुक्ती

मुंबई: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासंदर्भात