‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ‘जेएनयू’पेक्षाही डावे…’

Share

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) जेएनयूपेक्षाही डाव्या विचारांचे असल्याचे जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या. वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी हे वक्तव्य केले.

‘मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) काम केले आहे. तिथे शिकल्यावर तर कुठेही राजकारण करता येईल. त्या जोरावरच मी ‘जेएनयू’मध्ये चांगले काम करू शकत आहे; असेही डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या.

‘जेएनयू’मध्ये आतापर्यंत एकही महिला कुलगुरू झाली नव्हती. ही परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने बदलली आहे. ते नारीशक्तीविषयी जे बोलले ते त्यांनी करुन दाखवले. ‘जेएनयू’ने आयआयटी आणि आयआयएमला मागे टाकले आहे; असेही डॉ. शांतिश्री पंडीत यांनी सांगितले.

डाव्या विचारांच्या अभ्यासकांनी भारतात प्रामुख्याने डाव्या विचारांचे स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीकारक होते असेच सांगितले. डाव्यांनी वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा थोरांचे कतृत्व झळाळून लोकांपुढे येऊ नये याची जास्त खबरदारी घेतली. आता या महान व्यक्तिमत्वांची महती आपल्याला जनतेला सांगावीच लागेल, असे डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या.

काँग्रेस ज्या सावरकरांचा अपमान करते त्या सावरकरांसारखे आयुष्य काँग्रेसचे किती नेते आजवर जगले आहेत ? इंग्रजांच्या काळातही काँग्रेसच्या ठराविक नेत्यांना कायम व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली आहे, असे डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या. हिंदू बहुसंख्यांक असतील तरच या देशात धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही व्यवस्था राहील; असा विश्वास डॉ. शांतिश्री पंडीत यांनी व्यक्त केला.

Recent Posts

साहित्यभूषण पुरस्कारासाठी आता दहा लाख रुपये देणार : उदय सामंत

रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…

16 minutes ago

मुख्यमंत्री सचिवालयात लवकरच पीजीआरएस प्रणाली

नागपूर:  विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…

55 minutes ago

नॅशनल पार्कमधील मिनी ट्रेन सुरू होणार

बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…

1 hour ago

मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात ६२६ अर्ज

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…

2 hours ago

‘प्रधानमंत्री जनधन योजना’चे अभूतपूर्व जागतिक यश!

प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…

8 hours ago

ट्रम्प टॅरिफ अनर्थ…

उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…

8 hours ago