'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 'जेएनयू'पेक्षाही डावे...'

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) जेएनयूपेक्षाही डाव्या विचारांचे असल्याचे जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या. वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी हे वक्तव्य केले.



'मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) काम केले आहे. तिथे शिकल्यावर तर कुठेही राजकारण करता येईल. त्या जोरावरच मी 'जेएनयू'मध्ये चांगले काम करू शकत आहे; असेही डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या.



'जेएनयू'मध्ये आतापर्यंत एकही महिला कुलगुरू झाली नव्हती. ही परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने बदलली आहे. ते नारीशक्तीविषयी जे बोलले ते त्यांनी करुन दाखवले. 'जेएनयू'ने आयआयटी आणि आयआयएमला मागे टाकले आहे; असेही डॉ. शांतिश्री पंडीत यांनी सांगितले.



डाव्या विचारांच्या अभ्यासकांनी भारतात प्रामुख्याने डाव्या विचारांचे स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीकारक होते असेच सांगितले. डाव्यांनी वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा थोरांचे कतृत्व झळाळून लोकांपुढे येऊ नये याची जास्त खबरदारी घेतली. आता या महान व्यक्तिमत्वांची महती आपल्याला जनतेला सांगावीच लागेल, असे डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या.



काँग्रेस ज्या सावरकरांचा अपमान करते त्या सावरकरांसारखे आयुष्य काँग्रेसचे किती नेते आजवर जगले आहेत ? इंग्रजांच्या काळातही काँग्रेसच्या ठराविक नेत्यांना कायम व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली आहे, असे डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या. हिंदू बहुसंख्यांक असतील तरच या देशात धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही व्यवस्था राहील; असा विश्वास डॉ. शांतिश्री पंडीत यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

मुंबई-अमरावती विमान पुन्हा रद्द, एअरलाइनने दिला ऑपरेशनल समस्येचा हवाला

अमरावती : अलायन्स मुंबईवरून आणि मुंबईला जाणाऱ्या विमानाचे एअरच्या येणाऱ्या उड्डाण शुक्रवारी (ता. तीन) रद्द

नगराध्यक्ष पदांचे आरक्षण सोमवारी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर राज्यातील २४७ नगर परिषदा व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका

गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ? पोलिसांची बजावली नोटीस

पुणे: महाराष्ट्राची लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या मालकीच्या कारला पुणे-मुंबई-बंगळूरू राष्ट्रीय

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी