'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 'जेएनयू'पेक्षाही डावे...'

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) जेएनयूपेक्षाही डाव्या विचारांचे असल्याचे जेएनयूच्या कुलगुरू डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या. वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यानमालेत त्यांनी हे वक्तव्य केले.



'मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) काम केले आहे. तिथे शिकल्यावर तर कुठेही राजकारण करता येईल. त्या जोरावरच मी 'जेएनयू'मध्ये चांगले काम करू शकत आहे; असेही डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या.



'जेएनयू'मध्ये आतापर्यंत एकही महिला कुलगुरू झाली नव्हती. ही परंपरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने बदलली आहे. ते नारीशक्तीविषयी जे बोलले ते त्यांनी करुन दाखवले. 'जेएनयू'ने आयआयटी आणि आयआयएमला मागे टाकले आहे; असेही डॉ. शांतिश्री पंडीत यांनी सांगितले.



डाव्या विचारांच्या अभ्यासकांनी भारतात प्रामुख्याने डाव्या विचारांचे स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतीकारक होते असेच सांगितले. डाव्यांनी वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर अशा थोरांचे कतृत्व झळाळून लोकांपुढे येऊ नये याची जास्त खबरदारी घेतली. आता या महान व्यक्तिमत्वांची महती आपल्याला जनतेला सांगावीच लागेल, असे डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या.



काँग्रेस ज्या सावरकरांचा अपमान करते त्या सावरकरांसारखे आयुष्य काँग्रेसचे किती नेते आजवर जगले आहेत ? इंग्रजांच्या काळातही काँग्रेसच्या ठराविक नेत्यांना कायम व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाली आहे, असे डॉ. शांतिश्री पंडीत म्हणाल्या. हिंदू बहुसंख्यांक असतील तरच या देशात धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही व्यवस्था राहील; असा विश्वास डॉ. शांतिश्री पंडीत यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

निवडणुकीच्या धामधुमीत जळगावात गोळीबार!

निवडणुकीशी संबंध नसल्याचे पोलिसांचे स्पष्टीकरण जळगाव : जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात असलेल्या आनंद मंगल

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह