Mumbai Breaking News : RBI कडून मुंबईतील बँकेला मोठा धक्का!

मुंबई : मुंबईतल्या बँकेला RBI ने मोठा धक्का दिल्याची बातमी समोर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. RBI ने न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले आहे. आरबीआयच्या या निर्बंधानंतर, बँक ठेवीदारांना त्यांच्या खात्यात जमा केलेले त्यांचे कष्टाचे पैसे काढता येणार नाहीत. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक आता कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही किंवा कोणतीही ठेव घेऊ शकणार नाही.



मिळालेल्या माहितीनुसार, या बँकेत अनियमितता वाढल्याने पुढील सहा महिन्यांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया को ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले आहे. गुरुवार दि १३ फेब्रुवारीपासून आरबीआयच्या या कडक कारवाईनंतर, न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक ग्राहकांना कोणतेही कर्ज देऊ शकणार नाही किंवा ग्राहकांकडून ठेवी स्वीकारू शकणार नाही. आरबीआयच्या या निर्णयानंतर बँक ठेवीदारांच्या अडचणी वाढल्या आहेत. बँक खातेधारकांना त्यांच्या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. या सहा महिन्यांच्या कालावधीत बँकेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील. सहा महिन्यांनंतर, आरबीआय बंदीच्या निर्णयाचा आढावा घेईल.


?feature=share

RBI काय म्हणाली ?


बँकेची सध्याची रोख स्थिती पाहता, ठेवीदाराच्या बचत बँक किंवा चालू खात्यातून किंवा इतर कोणत्याही खात्यातून कोणतीही रक्कम काढण्याची परवानगी न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तथापि, बँकेला बँक कर्मचाऱ्यांचे पगार, भाडे आणि वीज बिल यासारख्या काही आवश्यक गोष्टींवर खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

heatstroke in Maharashtra : महाराष्ट्रात उष्माघातामुळे दोन जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात सुर्याने रौद्ररूप धारण केले असून मार्च महिन्यातच पारा प्रचंड वाढल्याचे दिसत आहे. वाढत्या

Cab Drivers Strike : शनिवारपासून कॅब चालकांचा संप

मुंबई : कॅब व रिक्षा चालकांच्या प्रलंबित मागण्यांवर गुरूवारी परिवहन आयुक्त राजेश नार्वेकरांशी होणाऱ्या बैठकीत

Mumbai : मुंबईत झाडांच्या फांद्यांची होणार शास्त्रोक्त छाटणी

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : धोकेदायक ठरू शकणाऱ्या झाडांची पावसाळा सुरू होण्यापूर्वी शास्रोक्त पद्धतीने छाटणी कशी

BMC CBSE 10th Class Result : महानगरपालिका सीबीएसई मंडळाच्या दहावीचा निकाल ९२.८९ टक्के

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण

Dharavi Koliwada : धारावी कोळीवाड्याच्या सीमांकनाचा तीढा सुटणार

 उच्चस्तरीय समिती गठीत; बाह्य सीमा निश्चित करून सरकारला शिफारशी करणार मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या

Adv. Ashish Shelar : आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा - माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार

 क्वांटम तंत्रज्ञानात महाराष्ट्र जागतिक नेतृत्वाकडे मुंबई : प्रधानमंत्री नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2023