Supreme Court : मोफत योजनांवर सर्वोच्च न्यायालयाची तीव्र नाराजी

नवी दिल्ली : केंद्र आणि राज्य सरकारकडून देशभरात दिल्या जाणाऱ्या मोफत योजनांमुळे लोक काम करण्यास इच्छुक नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे. या योजनांमुळे नागरिकांना मेहनत करण्याची गरज वाटत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने (Supreme Court) सरकारला फटकारले.


बुधवारी (१२ फेब्रुवारी) सर्वोच्च न्यायालयात शहरी भागातील बेघरांसाठी घराच्या अधिकारासंबंधी एक प्रकरण सुनावणीसाठी आले होते. या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने सरकारच्या मोफत योजना आणि त्याचा समाजावर होणारा परिणाम यावर नाराजी व्यक्त केली.


लोकांना मेहनतीची सवय राहिली नाही – न्यायालय


न्यायमूर्ती गवई यांनी सुनावणीदरम्यान स्पष्टपणे नमूद केले की, "मोफत योजनांमुळे लोक आता काम करण्यास इच्छुक राहिलेले नाहीत. त्यांना मोफत रेशन मिळते, कोणतेही काम न करता पैसे मिळतात. त्यामुळे मेहनत करून कमावण्याची प्रवृत्ती कमी होत चालली आहे."



मोफत योजनांमुळे विकासाला धक्का?


सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की, सरकारच्या या योजनांमुळे काही लोकं मुख्य प्रवाहात सहभागी होत नाहीत. "त्यांनाही देशाच्या प्रगतीत हातभार लावण्याची संधी मिळायला हवी. समाजाच्या विकासासाठी प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे," असे मत खंडपीठाने मांडले.


केंद्र सरकारच्या नव्या योजनांबाबतही सवाल


यावेळी अ‍ॅटर्नी जनरल आर. व्यंकटरमणी यांनी सरकारच्या नवीन शहरी गरिबी उन्मूलन मिशनबद्दल माहिती दिली. या अंतर्गत शहरी भागातील बेघरांसाठी निवारा उपलब्ध करून देण्याच्या उपाययोजना केल्या जातील. मात्र, यावर सर्वोच्च न्यायालयाने सरकारला स्पष्ट विचारणा केली की, हे मिशन नेमके कधीपासून लागू होणार?


सध्या या प्रकरणी पुढील सुनावणी सहा आठवड्यांनी होणार असून, केंद्र सरकारला या मुद्द्यावर स्पष्ट उत्तर द्यावे लागणार आहे.

Comments
Add Comment

Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी

Sunetra Pawar : दिल्लीत राजकीय खलबतं! उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोदी-शाहांच्या भेटीला, तर रोहित पवारही राजधानीत

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र आज मुंबईहून देशाची राजधानी दिल्लीत सरकले आहे. राज्याच्या

Rohit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नव्हे घातपात!

- रोहित पवार यांनी व्यक्त केला संशय; पूर्व विदर्भातील नेत्याच्या फाईलवर सही करण्यास उशीर झाल्याने करावा लागला

EPFO 3.0 : नोकरदारांसाठी मोठी बातमी : आता पीएफचे पैसे मिळतील एका क्लिकवर, 'ही' आहे महत्त्वाची तारीख!

नवी दिल्ली : देशातील सुमारे ८ कोटी नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचारी

Thanya Nathan C: अभिमानस्पद! देशाला मिळाल्या पहिल्या दृष्टिहीन महिला न्यायाधीश

देशाला लवकरच पहिल्या महिला दृष्टिहीन न्यायाधीश मिळणार आहेत. ही देशासाठी अभिमानस्पद गोष्ट आहे. केरळच्या

Delhi Crime: पलंगाखाली सापडला खजिना, मोलकरीण ३० लाखांचे दागिने घेऊन फरार

नवी दिल्ली: द्वारका येथे एका मोलकरणीने केलेल्या मोठ्या चोरीचा उलगडा दिल्ली पोलिसांनी केला आहे. जलदगतीने कारवाई