Vande Mataram : शाळांपासून संसदेपर्यंत आता संपूर्ण 'वंदे मातरम्' घुमणार! केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय, सर्व ६ कडवी आता अनिवार्य

नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची ठिणगी टाकणाऱ्या 'वंदे मातरम्' या गीताचा सन्मान वाढवण्यासाठी केंद्र सरकारने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. बंकिमचंद्र चटर्जी यांनी या गीताची रचना केल्याला यंदा १५० वर्षे पूर्ण होत आहेत. या दीडशेव्या जयंतीचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालयाने ६ फेब्रुवारी २०२६ रोजी एक नवीन आदेश जारी केला आहे. यानुसार, आता सर्व अधिकृत सरकारी कार्यक्रमांमध्ये आणि विशेष प्रसंगी 'वंदे मातरम्'ची मूळ सहाही कडवी गाणे अनिवार्य करण्यात आले आहे.



३ मिनिटे १० सेकंदांची नवी 'आवृत्ती'


स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारने गाण्याची 'धर्मनिरपेक्ष' प्रतिमा जपण्यासाठी शेवटची चार कडवी वगळली होती. मात्र, गृह मंत्रालयाने आता मूळ रचनेतील सर्व सहा कडव्यांचा समावेश करून नवीन 'अधिकृत आवृत्ती' (Official Version) तयार केली आहे. या संपूर्ण गीताच्या गायनाचा कालावधी ३ मिनिटे १० सेकंद इतका निश्चित करण्यात आला असून, त्याचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत.



शाळा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी नवीन नियमावली


केंद्र सरकारने 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतला असून, आता देशातील सर्व शाळांमध्ये सकाळच्या परिपाठात (Morning Assembly) या गीताचे समूह गायन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवळ शाळाच नव्हे, तर ज्या ज्या सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये राष्ट्रध्वज फडकवला जातो, त्या सर्व ठिकाणी या गीताचे गायन करणे आता आवश्यक असेल. यामुळे विद्यार्थी आणि नागरिक स्तरावर राष्ट्रीय अस्मिता अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.



सादरीकरणाचा शिष्टाचार आणि तांत्रिक नियम


राष्ट्रीय गीताच्या सादरीकरणात एकसूत्रता आणण्यासाठी गृह मंत्रालयाने काही तांत्रिक नियमही निश्चित केले आहेत. यानुसार, गीत सुरू होण्यापूर्वी मृदंग किंवा ट्रम्पेट (कर्णा) यांसारख्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात 'ड्रमरोल' वाजवून सन्मानपूर्वक सुरुवात केली जाईल. तसेच, संचलन किंवा मार्चिंग ड्रिल सुरू असताना, जवानांनी किंवा विद्यार्थ्यांनी सात पावले चालल्यानंतरच गीताला सुरुवात करावी, असा नवा नियम करण्यात आला आहे. या सूक्ष्म नियमांमुळे 'वंदे मातरम्'च्या गायनाला एक शिस्तबद्ध आणि भव्य स्वरूप प्राप्त होणार आहे.



राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या उपस्थितीत विशेष राजशिष्टाचार


अधिकृत राज्य कार्यक्रमांमध्ये राष्ट्रपती, राज्यपाल किंवा नायब राज्यपाल यांच्या आगमनावेळी आणि ते निरोप घेताना 'वंदे मातरम्' वाजवले जाईल. तसेच, आकाशवाणी आणि दूरदर्शनवर राष्ट्रपतींचे देशाला उद्देशून होणारे भाषण सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर हे गीत वाजवणे आता बंधनकारक असेल. मंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या अनौपचारिक कार्यक्रमांतही या गीताचे सामूहिक सादरीकरण होऊ शकते.



उभे राहण्याचे नियम आणि चित्रपटगृहांना सवलत


राष्ट्रीय गीत वाजवले जात असताना उपस्थितांनी 'सावधान' (Attention) स्थितीत उभे राहून आदर व्यक्त करणे आवश्यक आहे. तथापि, चित्रपटगृहांमध्ये चित्रपट किंवा न्यूज रीलचा भाग म्हणून हे गीत आल्यास प्रेक्षकांना उभे राहणे अनिवार्य नसेल. चित्रपट पाहताना उभे राहिल्याने शांततेचा भंग होऊ शकतो आणि इतरांच्या दर्शनात अडथळा येऊ शकतो, हा विचार करून ही विशेष सवलत देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

National Sports Awards 2025 : यंदाचा 'खेळरत्न' पुरस्कार हुकला! दिव्या देशमुख, तेजस्विन शंकरसह १७ खेळाडूंना 'अर्जुन पुरस्कार' घोषित

क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च आणि मानाच्या मानल्या जाणाऱ्या 'राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५' National Sports Awards 2025) ची घोषणा

BSNL 5G Launch : BSNL ५जी कधी लाँच होणार ? सिम बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड ? जाणून घ्या सर्व उत्तरे!

सरकारी टेलिकॉम कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड' (BSNL) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी ५जी (5G) सेवा सुरू करण्याच्या

Twisha Sharma Death Case : ट्विशा शर्मा प्रकरणात CBI चा मोठा खुलासा! वहिनीला शेवटचा मेसेज अन् अवघ्या काही मिनिटांत...

CBI कडून ६३६ पानांचे आरोपपत्र दाखल मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री ट्विशा शर्मा (Twisha

Chrome Security Alert : Google Chrome वापरताय? थांबा...पहिलं हे काम करा, केंद्र सरकारचा हाय-अलर्ट

मुंबई : तुम्हीही रोजच्या कामासाठी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर 'गुगल क्रोम' (Google Chrome) ब्राउझर वापरत असाल, तर ही बातमी

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात