IND vs END : किंग कोहलीने मोडला सचिन तेंडुलकरचा महान विक्रम!

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड (IND vs END) यांच्यातील वनडे मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची (Team India) सुरुवात खराब झाली. कर्णधार रोहित शर्माच्या रूपात पहिला धक्का बसला. दुसऱ्या षटकात १ धाव करून तो बाद झाला.



यानंतर, विराट कोहली (Virat Kohli) क्रीजवर आला आणि शुभमन गिलसह जबाबदारी स्वीकारली. या जोडीने १० षटकांत संघाची धावसंख्या ५० धावांच्या पुढे नेली. ११ व्या षटकापर्यंत गिल आणि कोहलीमध्ये ५०धावांची भागीदारी झाली. यानंतर, दोघांनीही जलद धावा केल्या. भारताला १३ षटकांत ७९ धावांपर्यंत पोहोचवले. या काळात विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला.


अहमदाबाद वनडेत १६ धावांचा टप्पा गाठताच, कोहलीने इंग्लंड संघाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण केल्या. इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. यादरम्यान विराटने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. याआधी, तेंडुलकर हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज होता. मास्टर ब्लास्टरने इंग्लंडविरुद्ध ३९९० धावा केल्या आहेत. तसेच कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या संघाविरुद्ध ४०००धावा पूर्ण केल्या. अशाप्रकारे, तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ वेगवेगळ्या संघांविरुद्ध ४००० धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. इंग्लंडपूर्वी त्याने ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्ध अशी कामगिरी केली आहे.

Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र