Rohit Pawar : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अपघात नव्हे घातपात!

- रोहित पवार यांनी व्यक्त केला संशय; पूर्व विदर्भातील नेत्याच्या फाईलवर सही करण्यास उशीर झाल्याने करावा लागला विमान प्रवास



मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत दररोज नवनवे तर्कवितर्क लावले जात असताना त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी देखील हा अपघात नव्हे, तर घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत रोहित यांनी अपघाताच्या आधी घडलेल्या घटनांचा क्रमवार उल्लेख करत, वेळापत्रकातील बदल, अचानक विमान प्रवासाची गरज आणि काही महत्त्वाच्या निर्णयांशी संबंधित बाबी संशय अधिक गडद करणाऱ्या असल्याचा दावा केला आहे.


यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले, “२७ जानेवारी रोजी अजित पवार हे कॅबिनेट बैठकीनंतर नियोजनाप्रमाणे संध्याकाळी मुंबईहून गाडीने पुण्याला जाणार होते. त्यासाठी ताफाही तयार ठेवण्यात आला होता. मात्र, ते प्रत्यक्षात पुण्याला का निघाले नाहीत? कॅबिनेट बैठक संपल्यानंतर अजित पवार यांनी पुढील चार-पाच तास आपली कामे, पक्षातील नेते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भेटींसाठी राखीव असल्याचे सांगितले होते. त्यानंतर संध्याकाळी पुण्याला जाण्याचा त्यांचा निर्णय होता. त्याच दिवशी पूर्व विदर्भातील एक अत्यंत मोठे नेते अजित पवार यांच्या भेटीसाठी येणार होते. मात्र, ते अपेक्षेपेक्षा उशिरा पोहोचले. ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा दीर्घकाळ सुरू राहिल्याने अजित पवार यांचा वेळ त्यातच गेला. परिणामी, संध्याकाळी पाच-साडेपाच वाजता गाडीने निघण्याचा नियोजित कार्यक्रम रद्द झाला. वेळ निघून गेल्याने त्यांच्यासमोर दुसरा पर्याय उरला नाही आणि त्यांना विमान प्रवासाचा निर्णय घ्यावा लागला”, असे रोहित पवार यांनी सांगितले.



पूर्व विदर्भातील नेत्याशी संबंधित अत्यंत महत्त्वाची फाईल सहीसाठी येणार होती. कुणाचा फोन आला होता, हे स्पष्ट नसले, तरी त्या फाईलवर तातडीने सही करणे गरजेचे असल्याचे त्यांना सांगण्यात आले. ही फाईल अजित पवार यांच्या बंगल्यावर नसून मंत्रालयातील कार्यालयात असल्याचे लक्षात आल्यानंतर ती मागवण्यात आली. अजित पवार सहसा प्रलंबित कामे ठेवत नसत, मात्र या वेळी अचानक ती फाईल कार्यालयातच राहिली होती. फाईल पोहोचेपर्यंत वेळ गेला आणि सही होईपर्यंत अजित पवार यांना अधिक विलंब झाला, असा दावा रोहित यांनी केला.



रोहित पवार यांनी पुढे सांगितले की, आपल्या संपर्कातील लोक आणि अजित पवार यांच्यासोबत काम करणारे अधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चांमधून काही संवेदनशील बाबी समोर आल्या. अजित पवार यांच्या शेवटच्या तीन-चार महिन्यांत काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह अतिशय महत्त्वाच्या चर्चा होत होत्या. त्या चर्चांमध्ये काही राजकीय कन्सल्टंट्सचे शेकडो कोटींचे करार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात येत होता, कारण त्यातून कोणताही फायदा होत नसल्याचे मत अजित पवार यांचे होते. अपघाताच्या अवघ्या सात दिवस आधी बारामती हॉस्टेल येथे झालेल्या भेटीतही अजित पवार यांनी काही लोकांना स्पष्ट शब्दांत ‘राजकारण शिकवू नका, आम्हाला काय करायचे ते आम्हाला माहीत आहे’, असे सुनावल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.



रोहित पवारांना संशय कशावर?


पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी घातपाताची शक्यता व्यक्त करणारी काही कारणेही मांडली. त्यामध्ये अजित पवार यांचा दौरा अचानक बदलणे, विमानाची वेळ आणि पायलट बदलणे, केंद्रीय विमान मंत्रालयाच्या अहवालात आणि एटीसी ट्रान्सक्रिप्टमधील वेळेतील विसंगती, फ्लाइट रडारचा डेटा अपघाताच्या एक मिनिट आधी बंद पडणे, कमी दृश्यता असताना लँडिंगचा निर्णय, रनवे २९ ऐवजी ११ वर उतरवण्याचा आग्रह, शेवटच्या काही मिनिटांत पायलटने एकही शब्द न बोलणे, या मुद्द्यांचा त्यांनी उल्लेख केला. या सर्व बाबी एकत्रितपणे पाहिल्यास, हा केवळ अपघात नसून त्यामागे काहीतरी वेगळे कारण असू शकते, असा संशय व्यक्त करत रोहित पवार यांनी सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे.

Comments
Add Comment

Fire News : ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात भीषण अग्नितांडव

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात ( Hapur district of Uttar Pradesh ) भीषण अग्नितांडवाची घटना घडली आहे. आतापर्यंत या

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Karnataka : पादचारी पूल कोसळला, आठ जखमी

मंगळुरू : कर्नाटकमध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूडबिद्री तालुक्यात एक अरुंद पादचारी पूल कोसळला. या

West Bengal : पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी ईडीच्या धाडी

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) राजधानी कोलकात्यात