EPFO 3.0 : नोकरदारांसाठी मोठी बातमी : आता पीएफचे पैसे मिळतील एका क्लिकवर, 'ही' आहे महत्त्वाची तारीख!

नवी दिल्ली : देशातील सुमारे ८ कोटी नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कार्यप्रणालीत ऐतिहासिक बदल करण्याच्या तयारीत असून, एप्रिल २०२६ पासून 'EPFO 3.0' हे नवीन तंत्रज्ञान लाँच केले जाणार आहे. या अंतर्गत पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया आता थेट UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) शी जोडली जाणार आहे. नव्या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी आता क्लेम फॉर्म भरून कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची किंवा दिवसेंदिवस वाट पाहण्याची गरज उरणार नाही. सदस्य त्यांच्या UPI पिनचा वापर करून थेट आपल्या लिंक केलेल्या बँक खात्यात पैसे वळवू शकतील. आजारपण, शिक्षण, लग्न किंवा घराच्या कामासाठी लागणारा निधी आता कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय अवघ्या ३ दिवसांत बँक खात्यात जमा होईल. पीएफ काढण्याची ही पद्धत एखाद्या साध्या बँक ट्रान्सफर इतकीच सोपी होणार असल्याने नोकरदार वर्गातून या निर्णयाचे मोठे स्वागत केले जात आहे.



पीएफमधून पैसे काढण्यावर मर्यादा ?


EPFO द्वारे एप्रिल २०२६ पासून सुरू होणाऱ्या UPI सुविधेचे नेमके स्वरूप कसे असेल, याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे. नव्या 'डिजिटल सेटलमेंट' प्रणालीनुसार, कर्मचाऱ्यांना तातडीच्या गरजांसाठी एका व्यवहाराद्वारे २५,००० रुपयांपर्यंतची रक्कम काढता येण्याची शक्यता आहे. केवळ गरजा पूर्ण करणे हाच उद्देश नसून, निवृत्तीनंतरचे आर्थिक सुरक्षा कवच जपण्यालाही प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळेच, तुमच्या एकूण पीएफ शिल्लक रकमेपैकी किमान २५% हिस्सा कायमस्वरूपी 'लॉक' ठेवला जाईल, जेणेकरून भविष्यातील सुरक्षिततेशी तडजोड होणार नाही. उर्वरित ७५% रक्कम तुम्ही गरजेनुसार सहजपणे काढू शकाल. लांबलचक क्लेम प्रक्रिया रद्द करून, आता पूर्णपणे स्वयंचलित डिजिटल प्रणालीवर भर दिला जाणार असून, यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार आहे.

Comments
Add Comment

Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला.

Hydrogen Train : भारताच्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला आज हिरवा झेंडा; जाणून घ्या काय आहेत खास वैशिष्ट्ये

जिंद : तब्बल ११० वर्षांपूर्वी, म्हणजेच १९१६ मध्ये ईस्ट इंडिया रेल्वेने (East India Railway) जिंद–पानीपत रेल्वेमार्ग (Railway Line)

India's energy storage : भारताची ऊर्जा साठवणूक क्षमता २०३५-३६ पर्यंत दहा पटींनी वाढणार

नवी दिल्ली : भारताच्या विकासाच्या प्रवासात ऊर्जा क्षेत्राचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशाची वाढती वीज गरज आणि

CUTS International : बाईक टॅक्सींसाठी देशव्यापी सुसंगत धोरणाची गरज, 'कट्स इंटरनॅशनल'चा अहवाल

नवी दिल्ली : देशातील बाईक टॅक्सी सेवांसाठी सध्या असलेल्या विसंगत राज्यनिहाय नियमांऐवजी, एक सुसंगत आणि

Jagannath Rath Yatra Stampede : जगन्नाथ रथयात्रेदरम्यान प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

भुवनेशवर : ओडिसातील पुरी येथे गुरुवारी जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती

Strait of Hormuz : होर्मुज सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर भारतीय नाविकांच्या तैनातीला मनाई

अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीएमएचा मोठा निर्णय नवी दिल्ली : अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या