EPFO 3.0 : नोकरदारांसाठी मोठी बातमी : आता पीएफचे पैसे मिळतील एका क्लिकवर, 'ही' आहे महत्त्वाची तारीख!

नवी दिल्ली : देशातील सुमारे ८ कोटी नोकरदार कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कार्यप्रणालीत ऐतिहासिक बदल करण्याच्या तयारीत असून, एप्रिल २०२६ पासून 'EPFO 3.0' हे नवीन तंत्रज्ञान लाँच केले जाणार आहे. या अंतर्गत पीएफचे पैसे काढण्याची प्रक्रिया आता थेट UPI (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) शी जोडली जाणार आहे. नव्या नियमांनुसार, कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी आता क्लेम फॉर्म भरून कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याची किंवा दिवसेंदिवस वाट पाहण्याची गरज उरणार नाही. सदस्य त्यांच्या UPI पिनचा वापर करून थेट आपल्या लिंक केलेल्या बँक खात्यात पैसे वळवू शकतील. आजारपण, शिक्षण, लग्न किंवा घराच्या कामासाठी लागणारा निधी आता कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय अवघ्या ३ दिवसांत बँक खात्यात जमा होईल. पीएफ काढण्याची ही पद्धत एखाद्या साध्या बँक ट्रान्सफर इतकीच सोपी होणार असल्याने नोकरदार वर्गातून या निर्णयाचे मोठे स्वागत केले जात आहे.



पीएफमधून पैसे काढण्यावर मर्यादा ?


EPFO द्वारे एप्रिल २०२६ पासून सुरू होणाऱ्या UPI सुविधेचे नेमके स्वरूप कसे असेल, याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे. नव्या 'डिजिटल सेटलमेंट' प्रणालीनुसार, कर्मचाऱ्यांना तातडीच्या गरजांसाठी एका व्यवहाराद्वारे २५,००० रुपयांपर्यंतची रक्कम काढता येण्याची शक्यता आहे. केवळ गरजा पूर्ण करणे हाच उद्देश नसून, निवृत्तीनंतरचे आर्थिक सुरक्षा कवच जपण्यालाही प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळेच, तुमच्या एकूण पीएफ शिल्लक रकमेपैकी किमान २५% हिस्सा कायमस्वरूपी 'लॉक' ठेवला जाईल, जेणेकरून भविष्यातील सुरक्षिततेशी तडजोड होणार नाही. उर्वरित ७५% रक्कम तुम्ही गरजेनुसार सहजपणे काढू शकाल. लांबलचक क्लेम प्रक्रिया रद्द करून, आता पूर्णपणे स्वयंचलित डिजिटल प्रणालीवर भर दिला जाणार असून, यामुळे कर्मचाऱ्यांचा वेळ वाचणार आहे.

Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१