Maharashtra Kusti 2025 : शिवराज राक्षेच्या वादात चंद्रहार पाटीलची उडी; दोन्ही गदा परत करण्याचा घेतला निर्णय

सांगली : यावर्षीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली. उपांत्य सामन्यामध्ये शिवराज राक्षेवर अन्याय झाल्याचं बोललं जात आहे. या लढतीदरम्यान झालेल्या राड्यावेळी शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारली. या कृत्यामुळे डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे याला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.


या व्यतिरिक्त पंचांच्या निर्णयाला डावलून मैदान सोडल्याने कुस्तीपटू महेंद्र गायकवाडवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली. अशातच चंद्रहार पाटील याने त्याला मिळालेल्या दोन्ही गदा परत करण्याचा निर्णय घेतला आहे.



काय म्हणाला चंद्रहार पाटील ?


एका व्हिडिओमध्ये बोलताना चंद्रहार पाटील म्हणाला, एका डिबेट कार्यक्रमामध्ये काका पवार, संदीप भोंडवे आणि शिवराज राक्षे होते, यावेळी २००९ ला माझा महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सर्व पंच कमिटीने पराभव केला याबद्दल काका पवारांना विचारल्यावर त्यांनी मान्य केलं की चंद्रहारवर अन्याय झाला. शिवराज राक्षे हा त्यांचा पठ्ठा, त्याच्यावर अन्याय झाला की ते माध्यमांना सांगत आहेत. पण जेव्हा माझ्या बाबतीत हे घडत असताना तुम्ही तिथं हजर होते. शरद पवार साहेब हे कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. मला हरवल्यानंतर मी आत्महत्येच्या विचारत होतो. आजही मी कोणत्या कुस्तीच्या मैदानामध्ये जात नाही, कारण माझ्या मनामध्ये भीती बसली आहे.



एखाद्या पैलवानाची अशी परिस्थिती का होते? शिवराज राक्षेवर ही परिस्थिती आल्यावर काका पवारांना यांचं दु:ख कळालं. आज त्यांनी मान्य केलं की माझ्यावर अन्याय झाला होता. तशाच पद्धतीने त्यावेळच्या कुस्तीगीर परिषदेने मान्य करावं की चंद्रहारवर अन्याय झाला आणि त्यावेळेस त्याला हरवण्यात आलं. म्हणजे माझ्या मनाला कुठेतरी समाधान होईल नाहीतर मला या दोन्ही महाराष्ट्र केसरीच्या गदांची गरज नाही. मी जे आजपर्यंत केलं ते प्रामाणिकपणे करून माताची सेवा करून या पदापर्यंत पोहोचलो होतो. अन्याय होऊन मी एखाद्या विशिष्ट विचारापर्यंत गेलो होतो. आयुष्यभर जिवंत आहे तोपर्यंत कुस्तीची सेवा करणार.


दरम्यान महाराष्ट्र केसरी स्पर्धा वादाच्या भोवऱ्यातून कसा बाहेर पडणार आणि शिवराज राक्षेला न्याय मिळणार का याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

Comments
Add Comment

LPG Cylinder: गॅस सिलिंडर बुक होत नसेल तर कुठे तक्रार कराल? 'या' हेल्पलाईन नंबरवर तात्काळ मिळेल मदत

मुंबई: मागील काही दिवसांपासून अनेक लोकांना एलपीजी सिलिंडर बुक करताना काही समस्यांना सामोरं जावं लागत आहे.

हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायासाठी केंद्र सरकारचा मोठा दिलासा; गॅस टंचाईवर सरकारचा तोडगा पण...

मुंबई: हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायासाठी केंद्र सरकारने एक मोठा दिलासा दिला आहे. व्यावसायिक एलपीजी गॅसच्या

Yavatmal Bus Fire : यवतमाळ-भारी विमानतळ मार्गावर मिनी ट्रॅव्हल्स जळून खाक; जळत्या ट्रॅव्हल्समधून...

यवतमाळ : वर्धा येथून नांदेडच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एका मिनी ट्रॅव्हल्सला यवतमाळ शहराजवळील भारी

दीर्घ काळापासून प्रलंबित शिक्षक भरतीचा मार्ग अखेर मोकळा

-‘पवित्र’ पोर्टलद्वारेच होणार नियुक्त्या; खासगी संस्थांना ‘रोस्टर’चे बंधन, राज्यातील हजारो उमेदवारांना

पुण्यात ईदनिमित्त वाहतुकीत बदल; लष्कर परिसरातील काही रस्ते बंद

पुणे : रमजान ईदनिमित्त लष्कर भागातील इदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर

ST Bus : उत्पन्नाच्या तुलनेत 'एसटी'ला दररोज २ कोटींचा तोटा

- महसूल वाढीसाठी इंधन विक्री क्षेत्रात उतरणार; परिवहन मंत्री सरनाईक यांनी आखली विशेष योजना मुंबई : राज्याची