Kerla Story : अंगणवाडीत उपमा नको बिर्याणी किंवा चिकन फ्राय पाहिजे, चिमुकल्याची निरागस मागणी

केरळ : अंगणवाडीत पोषण आहार देण्याचा उद्देश बालकांची भूक आणि कुपोषणाचा सामना करणे हा आहे. अंगणवाडीमध्ये मुलांना पोषण आहार देण्यासोबतच, आरोग्य तपासणी, लसीकरण, आरोग्य संदर्भ सेवा, पोषण आरोग्य विषयक शिक्षण या सेवाही दिल्या जातात.


मुलांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी वेगवेगळे पदार्थ मुलांसाठी नियोजित केले जातात. अशातच केरळातील एका चिमुकल्याने मला उपमा नको मला बिर्याणी किंवा चिकन फ्राय द्या असं म्हटलं आहे. त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे अंगणवाडी आहारात बदल करण्याचा निर्णय केरळ या राज्याने घेतला आहे.




?feature=share


व्हिडीओमध्ये काय म्हणाला चिमुकला ?


व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील मुलाच नाव थरजूल शंकर आहे. तो त्याच्या आईकडे बिर्याणीसाठी हट्ट करत आहे. त्याचबरोबर तो म्हणाला,"मला अंगणवाडीतला उपमा नको मला बिर्याणी आणि फ्राय चिकन हवं आहे." या निरागस मागणीची दखल केरळच्या महिला बालकल्याण मंत्री वीणा जॉर्ज यांनी घेतली आहे.


वीणा जॉर्ज म्हणाल्या सरकारी नियमाप्रमाणे सकस आहार म्हणून मुलांना अंडी आणि दूध देण्यात येते. आता आम्ही आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या पदार्थांमध्ये वैविध्य आणण्याचा प्रयत्न करु, असं त्यांनी म्हटलं आहे. चिमुकल्याची ही मागणी भविष्यात पूर्ण होईल अशी चिन्ह दिसत आहेत.

Comments
Add Comment

Massive fire in Bengaluru : बेंगळुरूमध्ये भीषण आग! नंदिनी लेआउटमध्ये PG इमारतीत अडकलेल्या ५० तरुणींचा थरारक बचाव

बेंगळुरू शहरातील नंदिनी लेआउट परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी उशिरा रात्री लागलेल्या भीषण

गुड न्यूज ! सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण, सोन्याचे आजचे दर किती ?

नवी दिल्ली : सध्या लग्नसराई सुरु आहे, पण सोन्याचे वाढते दर पाहता एन लग्नसराईत सोने खरेदी करावी की नाही असा प्रश्न

Fire News : ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात भीषण अग्नितांडव

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील हापूर जिल्ह्यात ( Hapur district of Uttar Pradesh ) भीषण अग्नितांडवाची घटना घडली आहे. आतापर्यंत या

भारतासाठी आनंदाची बातमी ! चीन, पाकिस्तानची झोपच उडणार ; भारत आणि रशियामध्ये मोठा करार

Big deal between India and Russia : भारत आणि रशिया या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध संपूर्ण जगाला माहित आहे. जगाचा विरोध धुडकावत कधी

Heat Wave: पुढील तीन दिवस जरा जपूनच ! राज्यातील 'हे' शहर जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत; नाशिकची स्थिती काय ?

Maharashtra Weather Update : राज्यभरात तपमानानं कहर केल्याचे चित्र आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने वर्तविलेल्या

West Bengal Election 2026 : विक्रमी मतदानामुळे ममता बॅनर्जींचे सरकार संपुष्टात येईल - अमित शाह

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जिल्ह्यातील राणाघाट येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह