संसदेचे अधिवेशन आणि विदेशी शक्तींवर काय म्हणाले मोदी ?

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी शक्तींबाबत एक वक्तव्य केले. या वक्तव्यावरुन चर्चेला उधाण आले आहे.



देशात २०१४ पासून संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाआधी विदेशी शक्तींकडून मिळालेला मुद्दा घेऊन विरोधक सरकार विरोधात बोलायचे. पण यावेळी हा प्रकार घडलेला नाही. विदेशी शक्तींकडून विरोधकांना मुद्दा मिळालेला नाही. विरोधकांनीही कोणताही मुद्दा घेऊन सरकार विरोधात बोलायला सुरुवात केलेली नाही. यावेळी हे पहिल्यांदाच घडले असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य करुन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना टोमणा मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.



प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पंतप्रधान मोदींनी एक संस्कृत श्लोक म्हणून दाखवला. भारतीयांवर कृपा होवो, अशी प्रार्थना पंतप्रधान मोदींनी माता लक्ष्मीला केली.



'भारत प्रजासत्ताक झाला त्याला ७५ वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधान म्हणून मला सलग तिसऱ्यांदा जनतेने देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. तिसऱ्या कार्यकाळातील सरकारचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे. भारताला २०२४७ पर्यंत विकसित राष्ट्र करण्याच्यादृष्टीनेच अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नियोजन सुरू आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही या नियोजनाची झलक दिसेल', असे संकेत पंतप्रधान मोदींनी दिले. देश स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करेल त्यावेळी एक विकसित राष्ट्र म्हणून जगापुढे येईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भारताची प्रगती व्हावी; देशातील सर्व नागरिकांपर्यंत प्रगतीचे लाभ पोहोचावेत यासाठी केंद्र सरकार अविश्रांत मेहनत करत आहे. देशातील महिलांचे सबलीकरण करम्यासाठीही सरकार प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने