संसदेचे अधिवेशन आणि विदेशी शक्तींवर काय म्हणाले मोदी ?

नवी दिल्ली : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेशी शक्तींबाबत एक वक्तव्य केले. या वक्तव्यावरुन चर्चेला उधाण आले आहे.



देशात २०१४ पासून संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाआधी विदेशी शक्तींकडून मिळालेला मुद्दा घेऊन विरोधक सरकार विरोधात बोलायचे. पण यावेळी हा प्रकार घडलेला नाही. विदेशी शक्तींकडून विरोधकांना मुद्दा मिळालेला नाही. विरोधकांनीही कोणताही मुद्दा घेऊन सरकार विरोधात बोलायला सुरुवात केलेली नाही. यावेळी हे पहिल्यांदाच घडले असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी हे वक्तव्य करुन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना टोमणा मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.



प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना पंतप्रधान मोदींनी एक संस्कृत श्लोक म्हणून दाखवला. भारतीयांवर कृपा होवो, अशी प्रार्थना पंतप्रधान मोदींनी माता लक्ष्मीला केली.



'भारत प्रजासत्ताक झाला त्याला ७५ वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधान म्हणून मला सलग तिसऱ्यांदा जनतेने देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. तिसऱ्या कार्यकाळातील सरकारचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे. भारताला २०२४७ पर्यंत विकसित राष्ट्र करण्याच्यादृष्टीनेच अर्थसंकल्पाच्या माध्यमातून नियोजन सुरू आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही या नियोजनाची झलक दिसेल', असे संकेत पंतप्रधान मोदींनी दिले. देश स्वातंत्र्याचा शतक महोत्सव साजरा करेल त्यावेळी एक विकसित राष्ट्र म्हणून जगापुढे येईल, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भारताची प्रगती व्हावी; देशातील सर्व नागरिकांपर्यंत प्रगतीचे लाभ पोहोचावेत यासाठी केंद्र सरकार अविश्रांत मेहनत करत आहे. देशातील महिलांचे सबलीकरण करम्यासाठीही सरकार प्रयत्न करत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
Comments
Add Comment

Ramdas Athawale: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभा खासदार पदाची केली हॅट्ट्रिक

मुंबई: रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची तिस-यांदा

Delhi: हातात पुष्पगुच्छ घेऊन थेट शिरला विधानसभेत, अध्यक्षांच्या गाडीजवळ फुलांचा गुच्छ ठेवला अन्...

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभेत सुरक्षेचा मोठा भंग झाल्याचे वृत्त आहे. एका वाहनाने बॅरियर तोडून गेट क्रमांक २ मधून

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

Crime News : पाटण्यात माणुसकीला काळीमा; सख्ख्या काकाकडूनच ३ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार

पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार

Ladakh: लिलावात २५ हजार रुपयांना विकले गेले १० रुपये किमतीचे अंडे; इराणी पीडितांसाठीचा अनोखा उपक्रम चर्चेत

नवी दिल्ली: लडाखमधील लेह जिल्ह्यातील लोक इराणच्या लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले आहेत. युद्धाच्या काळात

Delhi: पार्किंगवरून महिला उपनिरीक्षक आणि वृद्ध व्यक्तीमध्ये वाद, पोलिसांनी काय कारवाई केली?

दिल्ली: दिल्लीतील उत्तर रोहिणी परिसरात पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या