Nagpur News : रागवून घर सोडून गेलेल्या चिमुकल्याचा नागपूर पोलिसांनी केला वाढदिवस साजरा


नागपुर : वाढदिवस म्हटलं की सर्वांच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस. वाढदिवस साजरा करायला प्रत्येकाला आवडतोच. लहान मुलांसाठी वाढदिवस साजरा करणं ही एक पर्वणी असते. वाढदिवस साजरा नाही झाला तर लहान मुले रुसून बसतात. नागपुरमध्ये सुद्धा अशाच प्रकारची धक्कादायक घटना घडली आहे. आई वडिलांनी केक कापून वाढदिवस साजरा करायला विरोध केल्याने १० वर्षाच्या मुलाने घर सोडले आहे.




नागपूरात वाठोडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आई वडिलांनी वाढदिवस साजरा करायला नकार दिल्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला. रागाच्या भरात घर सोडल्यानंतर मुलगा घरी दिसत नसल्याने पालकांनी शोधाशोध सुरु केली. मुलाचा थांगपत्ता लागत नसल्याने पालकांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. यावेळी गस्तीवर असणाऱ्या पथकाला मुलगा परिसरातील स्वामी नारायण मंदिरात सापडला. पोलिसांनी तातडीने मुलाला पालकांच्या ताब्यात दिलं. मुलाला पालकांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी स्वतः केक कापून मुलाचा वाढदिवस साजरा केला.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे