Saif Ali Khan : सैफवर हल्ला केला नाही तरी नोकरी गेली, लग्न मोडलं, एका फोटोमुळे आयुष्याची वाट लागली

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर चाकूहल्ला केल्याप्रकरणी संशयित आरोपी म्हणून छत्तीसगडमध्ये एका तरुणाला पकडण्यात आले होते. पण ही कारवाई होऊन २४ तास होण्याआधीच मुंबई पोलिसांनी ठाण्यातून सैफवर हल्ला केल्याप्रकरणी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद (Mohammad Shariful Islam Shehzad) या ३० वर्षीय तरुणाला अटक केली. यानंतर छत्तीसगडमध्ये पकडलेल्या तरुणाला हल्ल्याशी संबंध नाही असे सांगत घरी पाठवण्यात आले. या तरुणाने हल्ला केलाच नव्हता. पण त्याला पकडल्याची माहिती काही तासांपूर्वी माध्यमांना मिळाली आणि तरुणाचा फोटोही मिळाला होता. सैफशी संबंधित विषय असल्यामुळे अनेक प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दाखवताना फोटो दाखवला होता. पोलिसांनी माध्यमांना दिलेला हा फोटोच छत्तीसगडमधील तरुणाच्या आयुष्याची वाट लावण्यास कारणीभूत ठरला. सैफवर हल्ला केला नसूनही फक्त फोटोमुळे तरुणाचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले.



बातमीत तरुणाचा फोटो बघितल्यावर मालकाने त्याला नोकरीवरुन काढले. ज्या मुलीशी लग्न ठरत होते, त्या मुलीच्या घरच्यांनी लग्नासाठी पुढची बोलणी करण्यास नकार दिला आणि परस्पर लग्न मोडल्याचे कळवले. या लागोपाठच्या घटनांमुळे सैफवर हल्ला केला नसूनही तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. तरुणाला आणि त्याच्या घरच्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. मालकाला वारंवार समजावून सांगितले तरी अद्याप तरुणाला त्याची गेलेली नोकरी परत मिळालेली नाही. मोडलेले लग्न आता पुन्हा कसे जुळणार या प्रश्नाचे उत्तर अद्याप तरुणाला सापडलेले नाही. वैतागलेल्या तरुणाने आता मुंबईत सैफच्या इमारतीसमोर जाऊन नोकरी मागणार असल्याची संतप्त प्रतिक्रिया दिली.


अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी हल्ला झाला. या प्रकरणी सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात आले. फूटेजमध्ये एक व्यक्ती अवघ्या काही सेकंदांपुरती दिसली होती. या फूटेजवरुन मिळत्याजुळत्या चेहऱ्याच्या अनेकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. या प्रकारात हल्लेखोर नसूनही संशयित म्हणून छत्तीसगडमधील तरुणाला अटक झाली होती. छत्तीसगडमध्ये पकडलेल्या तरुणाचा फोटो यस झाला आणि त्याचे आयुष्यच उद्ध्वस्त झाले. नाहक मनस्तापाला सामोऱ्या गेलेल्या आकाश कनोजियाचे लग्न मोडले. शिवाय त्याची नोकरीही गेली. या दुहेरी फटक्यातून कसे सावरावे हा प्रश्न आता त्याला आणि त्याच्या घरच्यांना सतावत आहे.

Comments
Add Comment

Thane- Mulund Railway Station : ठाणे-मुलुंड दरम्यान नवे रेल्वे स्थानक केंद्र सरकारची तत्त्वतः मान्यता; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : मुंबई आणि ठाणे या दोन शहरांमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेता, ठाणे आणि मुलुंड

BMC News : रुग्णालयात मॅमोग्राफी उपकरण उपलब्ध; स्तनाचा कर्करोग पिडीत महिलांची धावपळ वाचेल

- शीव आणि केईएम रुग्णालयातील विविध वैद्यकीय सुविधांचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण मुंबई (विशेष

BMC News : दक्षिण मुंबईतील पाणी पुरवठा शनिवारपासून पूर्ववत

- मुख्य जलवाहिनी दुरुस्तीचे काम ४४ तासांच्‍या प्रयत्‍नानंतर पूर्ण मुंबई (विशेष प्रतिनिधी) जी दक्षिण विभागातील

Ravi Pandit Passes Away : पुण्यातील नामांकित उद्योजक रवी पंडित यांचे निधन; आयटी क्षेत्रातील दूरदर्शी नेतृत्व हरपले...

पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक आणि KPIT Technologies चे संस्थापक व अध्यक्ष रवी पंडित यांचे आज (८ मे) पुण्यात निधन झाले. कंपनीने

Central Railway : मुंबई PRS प्रणाली बंद; PNR फाईल कॉम्प्रेशनमुळे काही रेल्वे सेवा तात्पुरत्या ठप्प

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) मध्ये PNR फाईल कॉम्प्रेशनच्या तांत्रिक देखभाल कामासाठी

Chief Minister Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केपीआयटीचे अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक रवी पंडित यांना श्रद्धांजली

देशातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्या पहिल्या फळीतील मार्गदर्शक उद्योजक हरपला मुंबई : माहिती तंत्रज्ञानाच्या