क्वालालंपूर : प्रजासत्ताक दिनी भारताच्या १९ वर्षांखालील महिला क्रिकेट संघाने बांगलादेश विरुद्धचा सामना आठ गडी राखून जिंकला. या विजयासह सलग चार सामने जिंकणाऱ्या भारताने दिमाखात १९ वर्षांखालील टी २० महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.
मागील सामन्यांप्रमाणे या सामन्यातही भारतीय गोलंदाजांनी छान कामगिरी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने वीस षटकांत आठ बाद ६४ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने ७.१ षटकांत दोन गडी गमावून ६६ धावा केल्या आणि दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला.
Semi-final spot ✅
India remain unbeaten at the #U19WorldCup and are through to the next stage 🙌#INDvBAN 📝: https://t.co/BVTSSm4iSo pic.twitter.com/8vssuww9lK
— ICC (@ICC) January 26, 2025
बांगलादेशकडून कर्णधार सुमैया अख्तरने सर्वाधिक २१ धावा केल्या. इतर फलंदाज २० किंवा त्यापेक्षा जास्त वैयक्तिक धावा करू शकले नाही. भारताकडून वैष्णवी शर्माने १५ धावांत ३ बळी घेतले.
For her effective bowling and taking 3️⃣ wickets, Vaishnavi Sharma is the Player of the Match 👏 #TeamIndia win by 8 wickets 👌
Scorecard ▶️ https://t.co/gqvo3PMFUq#INDvBAN | #U19WorldCup pic.twitter.com/U7knONAnrq
— BCCI Women (@BCCIWomen) January 26, 2025
भारताने ६५ धावांचे लक्ष्य लिलया पार केले. गोंगडी ट्रिशाने ३१ चेंडूत ८ चौकारांसह ४० धावा केल्या. तर सानिका चाळकेने बाद ११ आणि निक्की प्रसादने नाबाद ५ धावा काढत भारताला विजय मिळवून दिला. याआधी भारतीय संघाने वेस्ट इंडिज, मलेशिया आणि श्रीलंका या संघांचा पराभव केला. सलग चार विजय मिळवत उपांत्य फेरीत धडक मारणाऱ्या भारताचा पुढील सामना मंगळवार २८ जानेवारी २०२५ रोजी स्कॉटलंड विरोधात आहे.