Shreyas Talpade : अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात फसवणुकीप्रकरणी एफआयआर दाखल

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतुन एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता श्रेयस तळपदे याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हरीयाणामधील सोनीपत येथे श्रेयस आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आलोकनाथ या दोघांविरोधात एका घोटाळ्यात एफआयआर दाखल केला गेला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, इंदोरमधील एका कंपनीचे मार्केटिंग प्रमोशन श्रेयस तळपदेने केलं होतं. तसेच या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी श्रेयस आणि आलोकनाथ यांनी जाहिरात केली होती. त्यामुळे अनेक लोकांनी डोळे बंद करून या कंपनीवर विश्वास ठेवत गुंतवणूक केली. मात्र कंपनीने ५० लाखांहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेत पळ काढला आहे. त्यामुळे याप्रकरणी श्रेयस आणि आलोकनाथ यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांच्यासह ११ जणांची नावे आहेत.



इंदोरमधील या कंपनीमध्ये जवळपास ६ वर्षांपासून लोकांनी गुंतवणूक केली होती. चांगला परतावा मिळेल असं आमिष दाखवून लोकांना गुंतवणूक करण्यास सांगितल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. अनेक मोठ्या हॉटेलमध्ये सेमिनार ठेवून या कंपनीत लोकांना एजेंट बनवून घेतलं गेलं. सुरुवातीला काही लोकांना कंपनीने पैसेदेखील दिले. मात्र त्यानंतर पैसे देण्यास कंपनीने टाळाटाळ केली. त्यामुळे लोकांनी थेट कंपनीच्या ऑफिसात धाव घेतली. मात्र ऑफिसला टाळं असल्याचं दिसून आलं. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दखल करण्यात आला.या मार्केटिंग कंपनीचं प्रमोशन श्रेयस तळपदेनेही केलं होतं. या प्रकरणी पंजाब आणि हरीयाणा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. २५ जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे

“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन