Bollywood Daily Soaps : शूटिंग पूर्ण न करताच निघालेल्या अभिनेत्याला निर्मात्यांकडून मारहाण

मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीमधून माणुसकीला काळिमा फासणारी बातमी समोर आली आहे. अभिनेता शूटिंग पूर्ण न करताच निघाल्याने निर्मात्याने अभिनेत्याला मालिकेच्या सेटवरच मारहाण केल्याची घटना घडली आहे. अभिनेत्यानं मालिकेच्या निर्मात्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.



'जय माँ लक्ष्मी' या लोकप्रिय हिंदी मालिकेच्या सेटवर निर्मात्यांनी सुप्रसिद्ध अभिनेता शान मिश्राला मारहाण केली आहे. शान 'जय माँ लक्ष्मी' या मालिकेत श्री विष्णुंची भूमिका साकारत होता. शानच्या हाताला गंभीर दुखापत असल्याने शानने निर्मात्यांना लवकर पॅकअप करण्याची विनंती केली. शानच्या हाताची दुखापत बघता डॉक्टरांनी त्याला सक्तीचा आराम करायला सांगितला होता मात्र शूटिंग मध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून शानने शूटिंगला जाण्यास तयारी दाखवली.







दरम्यान निर्माता व निर्मात्याच्या पत्नीने शानवर अरेरावीची भाषा करून त्याला मारहाण केली. त्यांच्या या वादाचे शानने त्याच्या फोनमध्ये चित्रीकरण केले. निर्मात्याच्या पत्नीचा उद्धटपणे बोलण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून पोलीस निर्मात्यावर कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Comments
Add Comment

'निवडक प्रकल्पांमुळे पालघर जिल्हा होणार राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन'

वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतूची मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली पाहणी पालघर : राज्याच्या पायाभूत

Mumbai News: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील साठा ७.०८ टक्क्यांवर

मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांतील पाणीसाठा अद्याप चिंताजन

Bhendi Bazaar Fire : दक्षिण मुंबईत मध्यरात्री खळबळ! भेंडी बाजारजवळ बीएमसीच्या भूमिगत केबलला आग; परिसरात भीतीचे वातावरण

मुंबई : दक्षिण मुंबईतील भेंडी बाजार परिसरात रविवारी उशिरा रात्री भूमिगत बीएससी (BSC) केबलला अचानक आग लागल्याने

मढ-वर्सोवा पूलाच्या बांधकाम आता जोरात; विविध पर्यावरणीय परवानगी प्राप्त

कांदळवन विभागाला भरणार साडेबारा कोटींचे शुल्क मुंबई : मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या के/पश्चिम व पी/उत्तर

मुंबईत पाच ठिकाणी स्थापन करणार वायू गुणवत्ता सर्वेक्षण केंद्र

मुंबई : मुंबईतील विविध प्रदूषकाचे नमूने गोळा करून विश्लेषण करणे तसेच प्रत्येक तासाला विविध प्रदूषक घटकांची

नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात; कारच्या धडकेत दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी