'बाळासाहेबांचे विचार जपले म्हणून विजयी झालो'

  69

मुंबई : विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळाला. कारण बाळासाहेबांच्या प्रेरणेने घडलेले आपण शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांचा विचार आपण जिवापाड जपला. तो विचार आपण कधीच सोडला नाही. त्यामुळे दणदणीत विजय आपल्याला मिळाला. याच विजयाचा विजयोत्सव साजरा करत आहोत; असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आयोजिलेल्या शिवोत्सवात शिवसैनिकांना मार्गदर्शन करत होते.



शिवोत्सवाची सुरुवात उद्धव ठाकरे यांच्यावर व्हिडीओच्या माध्यमातून टीका करत झाली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामांची माहिती देणारा व्हिडीओ दाखवण्यात आला. एकनाथ शिंदे यांचा लाडक्या बहि‍णींनी सत्कार केला. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले.



अडीच वर्षापूर्वी केलेला उठाव आणि त्यानंतरच्या ऐतिहासिक विजयाची जगभरात चर्चा झाली आहे. अनेक पिढ्या या विजयाची नोंद ठेवल्याशिवाय राहणार नाही. हे यश बाळासाहेबांच्या विचाराचे आणि महायुतीच्या एकजुटीचे आहे. अडीच वर्ष रात्रंदिवस केलेल्या कष्टाचं, मेहनतीचं, लाडक्या बहिणींचं, भावांचं, ज्येष्ठांचं, तरुणांचं आणि शेतकऱ्यांचे हे यश आहे. दोन अडीच वर्षात पायाला भिंगरी लावून आपण काम केले आहे. एकही क्षण आपण वाया घालवला नाही. म्हणूनच आपल्याला विजय मिळाला. विकास कामं चौपटीने केली. लोकाभिमुख योजना आणल्या आणि विकास केला. यामुळेच राज्यातील जनतेने आपल्यावर विश्वास दाखवला. म्हणूनच मी जनतेसमोर नतमस्तक होतो. त्यांनाही वंदन करतो, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत मिळालेला विजय हे बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकांनी दिलेले गिफ्ट आहे. बाळासाहेब असते तर आज त्यांनी आपल्याला शाबासकी दिली असती. आपली पाठ थोपटली असती. आज लाडक्या बहिणींनी माझा सत्कार केला आहे. हा घरच्यांनी केलेला कौतुक सोहळा आहे. कितीही आपण झेंडे गाडून आलो असलो तरी घरी आल्यावर आई उंबरठ्यावर आपल्यावरून भाकरी तुकडा ओवाळून टाकते तेव्हा जसा आनंद वाटतो, तसा आनंद माझ्या मनाला झाला आहे. तुम्ही सर्वांनी विश्वास दाखवला, साथ दिली त्यामुळेच सामान्य शेतकऱ्याचा मुलगा राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

शिवोत्सवात आमदार निलेश राणेंचा विशेष सत्कार



शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मुंबईत शिवसैनिकांनी शिवोत्सवाचे आयोजन केले होते. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना आमदार निलेश राणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
Comments
Add Comment

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची