Jyotiba Temple : ज्योतिबाचं दर्शन २४ जानेवारीपर्यंत बंद रहाणार

दख्खनचा राजाची उद्यापासून संवर्धन प्रक्रिया सुरु


कोल्हापूर : लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार असल्याने भाविकांना श्री ज्योतिबा देवस्थानाचे दर्शन घेता येणार नाही.मिळालेल्या माहितीनुसार पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांकडून उद्या ( दि २१ ) पासून रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे. हे काम २४ जानेवारीपर्यंत चालू राहणार असल्याने या कालावधीत मूर्तीचे दर्शन भाविकांना मिळणार नाही.



मौजे वाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग देवस्थान मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी सहाय्यक संचालक,पुरातत्व विभाग,पुणे यांच्यावतीने श्री केदारलिंग देवाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. देवस्थान व्यवस्थापन समितीने ३ जानेवारी रोजी भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना मूर्तीच्या संवर्धनासाठी पत्र लिहिले होते. भारतीय पुरातत्व विभागाने मूर्तीची पाहणी करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करायचे ठरवले असल्याने मंगळवार ( दि. २१ ) ते शुक्रवार दि .२४ ) पर्यंत भाविकांना ज्योतिबा देवस्थानाचे दर्शन घेता येणार नाही. दरम्यान भाविकांना फक्त उत्सव मूर्ती आणि कळसाचे दर्शन खुले ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी