Jyotiba Temple : ज्योतिबाचं दर्शन २४ जानेवारीपर्यंत बंद रहाणार

दख्खनचा राजाची उद्यापासून संवर्धन प्रक्रिया सुरु


कोल्हापूर : लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार असल्याने भाविकांना श्री ज्योतिबा देवस्थानाचे दर्शन घेता येणार नाही.मिळालेल्या माहितीनुसार पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांकडून उद्या ( दि २१ ) पासून रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे. हे काम २४ जानेवारीपर्यंत चालू राहणार असल्याने या कालावधीत मूर्तीचे दर्शन भाविकांना मिळणार नाही.



मौजे वाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग देवस्थान मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी सहाय्यक संचालक,पुरातत्व विभाग,पुणे यांच्यावतीने श्री केदारलिंग देवाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. देवस्थान व्यवस्थापन समितीने ३ जानेवारी रोजी भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना मूर्तीच्या संवर्धनासाठी पत्र लिहिले होते. भारतीय पुरातत्व विभागाने मूर्तीची पाहणी करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करायचे ठरवले असल्याने मंगळवार ( दि. २१ ) ते शुक्रवार दि .२४ ) पर्यंत भाविकांना ज्योतिबा देवस्थानाचे दर्शन घेता येणार नाही. दरम्यान भाविकांना फक्त उत्सव मूर्ती आणि कळसाचे दर्शन खुले ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे