Jyotiba Temple : ज्योतिबाचं दर्शन २४ जानेवारीपर्यंत बंद रहाणार

दख्खनचा राजाची उद्यापासून संवर्धन प्रक्रिया सुरु


कोल्हापूर : लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार असल्याने भाविकांना श्री ज्योतिबा देवस्थानाचे दर्शन घेता येणार नाही.मिळालेल्या माहितीनुसार पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांकडून उद्या ( दि २१ ) पासून रासायनिक प्रक्रिया केली जाणार आहे. हे काम २४ जानेवारीपर्यंत चालू राहणार असल्याने या कालावधीत मूर्तीचे दर्शन भाविकांना मिळणार नाही.



मौजे वाडी रत्नागिरी येथील श्री केदारलिंग देवस्थान मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी सहाय्यक संचालक,पुरातत्व विभाग,पुणे यांच्यावतीने श्री केदारलिंग देवाच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे. देवस्थान व्यवस्थापन समितीने ३ जानेवारी रोजी भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालकांना मूर्तीच्या संवर्धनासाठी पत्र लिहिले होते. भारतीय पुरातत्व विभागाने मूर्तीची पाहणी करून त्यावर रासायनिक प्रक्रिया करायचे ठरवले असल्याने मंगळवार ( दि. २१ ) ते शुक्रवार दि .२४ ) पर्यंत भाविकांना ज्योतिबा देवस्थानाचे दर्शन घेता येणार नाही. दरम्यान भाविकांना फक्त उत्सव मूर्ती आणि कळसाचे दर्शन खुले ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने दिली आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये