सैफवर चाकू हल्ला करणाऱ्याला अटक, मारेकरी बांगलादेशी असल्याचा संशय

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर १६ जानेवारी रोजी मध्यरात्री चाकूहल्ला झाला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी मोहम्मद शरीफुल इस्लाम शेहजाद (Mohammad Shariful Islam Shehzad) या ३० वर्षीय तरुणाला अटक केली आहे. आरोपीकडे भारतीय असल्याचे ठोस पुरावे नाहीत. यामुळे तो बांगलादेशी असल्याचा असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केली. आरोपी बांगलादेशी असावा असा संशय निर्माण करणारे काही पुरावे जप्त केले आहेत. पण तपास सुरू असल्यामुळे या विषयावर अधिक माहिती देणे योग्य होणार नाही; असे मुंबई पोलिसांनी सांगितले. आरोपी भारतात विजय दास (बिजॉय दास) या नावाने वावरत होता. काही दिवस मुंबईत आणि नंतर मुंबई जवळच्या भागात तो वास्तव्यास होता. तो एका हाऊसकिपिंग कंपनीत बनावट कागदपत्रे दाखवून नोकरी करत होता.





आरोपीला पोलिसांनी ठाण्यातून पकडले. त्याने सैफवर हल्ला केल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी आरोपीला मुंबईत आणले असून त्याची चौकशी सुरू आहे. पुढील काही तासांत आरोपीला न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे हजर करुन पोलीस कोठडीची मागणी केली जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. आरोपीने चोरीच्या उद्देशानेच सैफच्या घरात घुसखोरी केली होती. पण घरात विरोध झाला आणि आरोपीने चाकूने हल्ला केला; असे प्राथमिक चौकशीतून लक्षात आल्याचे पोलिसांनी सांगितले.



मुंबई पोलिसांनी ठाणे पोलिसांच्या सहकार्याने कासारवडवली येथील हिरानंदानी इस्टेटच्या मागे असलेल्या झुडपातून आरोपीला पकडले. आरोपी हिरानंदानी इस्टेटमधील टीसीएस कॉल सेंटरच्या मागे असलेल्या मेट्रो बांधकाम स्थळाजवळील कामगार छावणीनजीकच्या झुडुपांमध्ये लपला होता. मोहम्मद ठाण्यातील 'रिकीज' बारमध्ये हाऊसकीपिंग कामगार म्हणून काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याआधी तो एका पबमध्ये काम करत होता.
Comments
Add Comment

आचार्य देवव्रत यांचे मुंबईत आगमन, सोमवारी घेणार राज्यपालपदाची शपथ

मुंबई : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे पत्नी दर्शना देवी यांच्यासह रविवारी मुंबई

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत