PM Surya Ghar Yojana : सौर ऊर्जा प्रकल्प ठरतोय लाभदायक; वीजनिर्मितीमुळे २,४४८ ग्राहक झाले स्वावलंबी!

  66

ठाणे : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला (PM Surya Ghar Yojana) महावितरणच्या (Mahavitran) कल्याण आणि भांडुप परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या लाभासाठी आतापर्यंत १३ हजार ८३१ जणांनी अर्ज केले आहेत. यातील २ हजार ४४८ ग्राहकांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित अर्जदारांच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेत पर्यावरणपूरक वीज निर्मितीसोबतच आपल्या मासिक वीजबिलात बचत करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.



या योजनेत केंद्र सरकारतर्फे तीन किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या प्रकल्पांसाठी ग्राहकांना ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. सौर प्रकल्पातून ग्राहकाच्या गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यामुळे वीजबिल शून्य होते, तर शिल्लक वीज महावितरण विकत घेते. निवासी घरगुती कुटुंबांसाठी प्रति किलोवॅट ३० हजार रुपये अनुदान २ किलोवॅटपर्यंत मिळते. ३ किलोवॅटपर्यंत अतिरिक्त एक किलोवॅट क्षमतेसाठी १८ हजार रुपये अनुदान मिळते. ३ किलोवॅटपेक्षा मोठ्या सिस्टीमसाठी एकूण अनुदान ७८ हजार रुपयांपर्यंत मर्यादित आहे. गृहनिर्माण संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांकरीता इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगसह सामाईक उपयोगासाठी १८ हजार रुपये प्रति किलोवॅट अनुदान मिळते. गृहसंकुलासाठी अनुदानाची एकूण कमाल मर्यादा ५०० किलोवॅट आहे. तसेच या योजनेसाठी सवलतीच्या दरात बँकेकडून कर्ज उपलब्ध होते.


पीएम-सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसविल्यानंतर अनुदान थेट ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाते. वीज ग्राहकांनी <https://www.pmsuryaghar.gov.in/> या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा असून सर्व सुविधा ऑनलाईन व पेपरलेस उपलब्ध आहेत.

Comments
Add Comment

दिवा ते सीएसएमटी जलद लोकल सुरू करा

शिवसेना खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी लोकल १५ डब्ब्यांमध्ये परावर्तित करणे  पाचवी,

Mumbai Local Train Accident : महत्त्वाची अपडेट...अपघातात लोकल ट्रेनमधून खाली पडून 'इतके' जण जखमी, मृतांची ओळख पटली

मुंबई : आज (सोमवार) सकाळी ९.२०च्या वाजताच्या सुमारास कसारा ते सीएसएमटी या धावत्या फास्ट लोकल ट्रेनमधून जवळपास

Mumbai Railway Accident: अपघातानंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; लोकल ट्रेनला ऑटोमॅटिक दरवाजे बसवणार

मुंबई उपनगरीय लोकलच्या डब्यांचे केले जाणार रीडिझाईनिंग ठाणे: मध्य रेल्वेमार्गावर आज सकाळी झालेल्या भीषण

Mumbai Train Accident: मध्य रेल्वे मार्गावर भीषण अपघात! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, ६ जणांचा मृत्यू

दोन लोकलमधील प्रवासी एकमेकांना घासल्याने भयंकर घटना ठाणे: मध्य रेल्वेमार्गावर आज ९ जून रोजी सकाळी एक मोठा अपघात

जिल्हा रुग्णालयात पोषणयुक्त आहाराविषयी जनजागृती

ठाणे : ‘व्यायाम हे शरीरासाठी ज्ञान असेल, तर सकस आहार हे चांगले संस्कार आहेत,’ या विचारातून ठाण्यातील वि.सा. सामान्य

ठाणे-अहिल्यानगरमध्ये उबाठा गटाला खिंडार

शहापुरातील सुमारे ७०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश उच्चशिक्षित तरुण राजकारणात येणं ही काळाची गरज ठाणे  :