Samrudhhi Highway : पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; बसचालक जागीच ठार

पुणे : समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या लक्झरी बसची ट्रकला जोरदार धडक झाली आहे. या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला असून १५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटेच्या सुमारास अमरावतीच्या जवळ असणाऱ्या धामणगाव येथील मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन हद्दीत आष्टा नजीक हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या बसमधून ३० पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते.



दरम्यान, समृद्धी महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकला लक्झरी बसची जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात लक्झरी बसचालक जागीच ठार झाला असून बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व वाहतूक पोलीस आणि एमएसआरडीची रेस्क्यू टीम त्याठिकाणी दाखल झाले. जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी काळ ठरत असून सातत्याने होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.

Comments
Add Comment

नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला इन्क्यूबेशन सेंटर म्हणून मान्यता

मुंबई: विदर्भातील नवउद्योग (स्टार्टअप) परिसंस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत,

नमो शेतकरी महासन्मान निधीचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार; कृषीमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई: राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, नमो

‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक’ विधानपरिषदेत मंजूर

मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून चर्चेत असलेले आणि अत्यंत कडक तरतुदी असलेले ‘महाराष्ट्र

सिंधुदुर्गच्या विकासाला बुस्टर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत १०० टक्के 'व्हिजीएफ'ला मंजुरी

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि अर्थव्यवस्थेला मोठी गती देणारा निर्णय मंगळवारी राज्य

नंदूरबार,छत्रपती संभाजीनगरमधील गैरव्यवहारासाठी 'एसआयटी स्थापन; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेत घोषणा

​मुंबई: नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर येथील भूसंपादन गैरव्यवहार आणि छत्रपती संभाजीनगरमधील ब्रिजवाडी येथील ५४

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी