Samrudhhi Highway : पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या बसचा भीषण अपघात; बसचालक जागीच ठार

पुणे : समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुण्याहून नागपूरकडे जाणाऱ्या लक्झरी बसची ट्रकला जोरदार धडक झाली आहे. या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला असून १५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना आज पहाटेच्या सुमारास अमरावतीच्या जवळ असणाऱ्या धामणगाव येथील मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशन हद्दीत आष्टा नजीक हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या बसमधून ३० पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते.



दरम्यान, समृद्धी महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकला लक्झरी बसची जोरदार धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात लक्झरी बसचालक जागीच ठार झाला असून बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच दत्तापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी तसेच मंगरूळ दस्तगीर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व वाहतूक पोलीस आणि एमएसआरडीची रेस्क्यू टीम त्याठिकाणी दाखल झाले. जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू आहेत. समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी काळ ठरत असून सातत्याने होणाऱ्या भीषण अपघातांच्या घटनांनी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला