Tadoba : उपासमारीमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ मृत्यूशी झुंज देतायत

चंद्रपूर : महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात १५ दिवसांत सहा वाघांचा उपासमारीमुळे मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अभयारण्य वाघांसाठी प्रसिद्ध आहे. पण चंद्रपूरमध्येच उपासमारीमुळे वाघांचे मृत्यू होऊ लागले आहेत. ताजी घटना पेंच येथील आहे. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पालगत प्रादेशिक वन विभागात वाघिणीच्या बछड्याचा मृतदेह आढळला. या बछड्याला पुरेसं अन्न न मिळाल्याने त्याची उपासमार होऊन मृत्यू झाला.



उपासमारीमुळे वाघांचे मृत्यू होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. विकास कामांकरिता मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. जंगलतोड करुन शहरीकरण करण्याचे काम झपाट्याने सुरू आहे. यामुळे जंगलात राहणाऱ्या प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न गंभीर झाला आहे. शिकार करण्यासाठी वन्यजीव उपलब्ध होत नसल्यामुळे वाघ जंगलातून बाहेर पडत आहेत. जंगलाबाहेरच्या वातावरणात टिकाव धरणे कठीण झाल्यामुळे पेंचमध्ये वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू झाला. ताज्या घटनेमुळे पर्यावरणप्रेमी आणि प्राणीप्रेमी यांनी दुःख व्यक्त केले आहे. वाघांच्या संरक्षणासाठी तातडीने आवश्यक ते उपाय करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


वाघांचे मृत्यू होण्याची कारणे पुढीलप्रमाणे :


१. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यामध्ये आपसात झालेल्या झुंजीत दोन वाघ जखमी झाले आहेत.


२. नागपूर जिल्ह्यातील पेंच व्याघ्रप्रकल्पालगत प्रादेशिक वनविभागात वाघिणीच्या बछड्याचा उपासमार होऊन मृत्यू झाला.


३. भंडारा जिल्ह्यात एका वाघाची अत्यंत निर्घृणपणे शिकार करण्यात आली.


४. एक वाघ वाहनाच्या धडकेत ठार झाला


५. चंद्रपूर जिल्ह्यात वृद्धापकाळाने एका वाघाचा मृत्यू झाला.


६. गोंदिया जिल्ह्यात एका पट्टेदार वाघाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला.

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी