Kashmir Fire : काश्मीरमध्ये लॉस एंजेलिस आगीची पुनरावृत्ती; दोन गावे जळून खाक

काश्मीर : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिस मधील आगीची घटना ताजी असतानाच आता काश्मीर मध्ये सुद्धा या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. लॉस एंजेलिसमध्ये लागलेली आग आंतरराष्ट्रीय चिंतेचा विषय ठरली आहे. काश्मीरमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडत असतानाही लागलेल्या या भीषण वणव्यात किश्तवाड येथील दोन गाव जळून खाक झाले आहेत. सुदैवाने इथे कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे.



काश्मीरच्या किश्तवाड येथे सध्या कडाक्याच्या थंडीमुळे तापमान थंड झालेले आहे. या परिसरात सातत्याने हिमवृष्टी होत आहे. मात्र एवढ्या थंडीतही ही भीषण आग लागली आहे. किश्तवाडमधील दुर्गम भागात वसलेल्या बाडवन येथील मार्गी आणि मालवन गावांमध्ये ही आग लागली आहे. या भीषण वणव्यात अनेक घरं जळून खाक झाली आहेत. तर शेकडो लोकांना या आगीचा फटका बसला आहे. लोकांनी स्थानिक पातळीवर बचावकार्य करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत.स्थानिकांकडून या आगिवर नियंत्रण ठेवण्याचं काम अजूनही सुरूच आहे. असे असले तरी या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण अस्पष्टच आहे.

Comments
Add Comment

Gujarat News : गुजरात एटीएसची मोठी कारवाई! घातक विष 'रायसिन' तयार करणाऱ्या डॉक्टरसह तिघांना अटक

अहमदाबाद : गुजरात दहशतवादविरोधी पथकाने (ATS) राज्यात मोठे दहशतवादी हल्ले घडवण्याचा कट उधळून लावत, चिनी एमबीबीएस

चंद्रयान-२ पुन्हा चर्चेत; इस्राोने शेअर केली मोठी माहिती !

नवी दिल्ली : सहा वर्षांपूर्वी प्रक्षेपित झालेल्या चंद्रयान-२ बद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो)

डिजिटल सोन्यात गुंतवणूक करत असाल तर सावधान !

आम्ही जबाबदार नाही; सेबीचा सतर्कतेचा इशारा नवी दिल्ली  : बदलत्या काळानुसार सोन्यातील गुंतवणुकीच्या

बिहार निवडणुकीचा प्रचार संपला

दुसऱ्या टप्प्यासाठी १२२ जागांवर मंगळवारी मतदान पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा उडालेला धुरळा आता बसला आहे.

असीम मुनीर यांना विशेष अधिकार देण्यावरून पाकिस्तानात विरोधकांचे देशव्यापी आंदोलन

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये २७ व्या संविधान सुधारणा विधेयकामुळे तणाव निर्माण झाला आहे. संविधान सुधारण्यानंतर

भारताच्या मुलीची ऐतिहासिक कामगिरी! तिरंदाजी स्पर्धेत भारतीय एबल-बॉडी ज्युनियर संघात निवड

मुंबई: देणाऱ्याने देताना काहीतरी विचार केलाच असेल, असं आपण नेहमीच म्हणतो. मग ते सुख असो किंवा दु:ख... आणि याचा अनुभव