खो खो विश्वचषकासाठी भारत सज्ज

नवी दिल्ली : खो खो विश्वचषक स्पर्धेला १३ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. भारत – नेपाळ या सामन्याने खो खो विश्वचषकाचा शुभारंभ होणार आहे. याआधी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यंदाच्या खो खो विश्वचषक स्पर्धेत पुरुष गटात २० आणि महिला गटात १९ संघ आहेत.



खो खो विश्वचषक २०२५ – स्पर्धेसाठी संघांची गटवारी

पुरुष
अ गट – भारत, नेपाळ, पेरू, ब्राझील, भूतान
ब गट – दक्षिण आफ्रिका, घाना, अर्जेंटिना, नेदरलँड्स, इराण
क गट – बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया, अमेरिका, पोलंड
ड गट – इंग्लंड, जर्मनी, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, केनिया

महिला
अ गट – भारत, इराण, मलेशिया, दक्षिण कोरिया
ब गट – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, केनिया, युगांडा, नेदरलँड्स
क गट – नेपाळ, भूतान, श्रीलंका, जर्मनी, बांगलादेश
ड गट – दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पोलंड, पेरू, इंडोनेशिया



खो खो विश्वचषक २०२५, भारतीय पुरुष संघ : प्रतिक वायकर(कर्णधार), प्रबाणी साबर, मेहुल, सचिन भार्गो , सुयश गरगटे, रामजी कश्यप, शिवा पोथीर रेड्डी, आदित्य गणपुले, गौथम एमके, निखिल बी, आकाश कुमार, सुब्रमणि व्ही., सुमन बर्मन, अनिकेत पोटे, एस. रोकेसन सिंग. स्टँडबाय (राखीव खेळाडू) : अक्षय बांगरे, राजवर्धन शंकर पाटील, विश्वनाथ जानकीराम.

खो खो विश्वचषक २०२५, भारतीय महिला संघ : प्रियांका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निर्मला भाटी, नीता देवी, चैत्रा आर., सुभाषश्री सिंग, मगाई माझी, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, नसरीन शेख, मीनु, मोनिका, नाझिया बीबी. स्टँडबाय (राखीव खेळाडू) : संपदा मोरे, रितिका सिलोरिया, प्रियांका भोपी.



खो खो विश्वचषक २०२५, भारतीय पुरुष संघाचे सामने

सोमवार १३ जानेवारी २०२४ - भारत विरुद्ध नेपाळ
मंगळवार १४ जानेवारी २०२४ - भारत विरुद्ध ब्राझील
बुधवार १५ जानेवारी २०२४ - भारत विरुद्ध पेरू
गुरुवार १६ जानेवारी २०२४ - भारत विरुद्ध भूतान

भारत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरल्यास १७ जानेवारी रोजी उपांत्यपूर्व फेरीत खेळेल
भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास १८ जानेवारी रोजी उपांत्य फेरीत खेळेल
भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास १९ जानेवारी रोजी अंतिम फेरीत खेळेल

खो खो विश्वचषक २०२५, भारतीय महिला संघाचे सामने

मंगळवार १४ जनेवारी २०२४ - भारत विरुद्ध दक्षिण कोरिया
बुधवार १५ जानेवारी २०२४ - भारत विरुद्ध इराण
गुरुवार १६ जानेवारी २०२४ - भारत विरुद्ध मलेशिया

भारत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरल्यास १७ जानेवारी रोजी उपांत्यपूर्व फेरीत खेळेल
भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास १८ जानेवारी रोजी उपांत्य फेरीत खेळेल
भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास १९ जानेवारी रोजी अंतिम फेरीत खेळेल

पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा कधी आणि कुठे होणार ?

पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा सोमवार १३ जानेवारी २०२५ पासून भारतात सुरू होत आहे. अंतिम सामने १९ जानेवारी रोजी आहेत. दिल्लीचे इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम आणि उत्तर प्रदेशमधील नोएडा इनडोअर स्टेडियममध्ये या स्पर्धेचे सामने खेळवले जातील. पुरुषांची खो खो विश्वचषक स्पर्धा १३ जानेवारीपासून सुरू होईल. या स्पर्धेतील विजेत्या पुरुष संघाला निळ्या रंगाची ट्रॉफी दिली जाईल. तर महिलांची खो खो विश्वचषक स्पर्धा १४ जानेवारीपासून सुरू होईल. या स्पर्धेतील विजेत्या महिला संघाला हिरव्या रंगाची ट्रॉफी दिली जाईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि दूरदर्शन येथे या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण बघता येईल. तसेच डिस्ने+हॉटस्टार अॅपवर पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.
Comments
Add Comment

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

WPL 2026 Final: बंगळूरची विजयी घोडदौड दिल्ली थांबवू शकणार का?

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. रॉयल चॅलेंजर्स

IND vs PAK : "आयसीसीचे मुख्यालय भारतात असते तर बॉम्बने उडवले असते..."; पाकिस्तानी अभिनेत्याचे वादग्रस्त विधान

रविवारी (१ फेब्रुवारी) पाकिस्तान सरकारने जाहीर केले की त्यांचा संघ २०२६ च्या टी२० विश्वचषकासाठी मैदानात उतरेल,

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीची स्थगिती कायम, रोहित पवारांच्या अडचणीत वाढ

नवी दिल्ली  : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांना सर्वोच्च न्यायालयाने जोरदार

IND vs PAK : पाकिस्तान नेहमीप्रमाणे "यू-टर्न" घेईल; सुनील गावस्कर यांची पाकिस्तानवर टीका

मुंबई: टी-२० विश्वचषकापूर्वी पाकिस्तान सरकारने भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.