Share

नवी दिल्ली : खो खो विश्वचषक स्पर्धेला १३ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. भारत – नेपाळ या सामन्याने खो खो विश्वचषकाचा शुभारंभ होणार आहे. याआधी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यंदाच्या खो खो विश्वचषक स्पर्धेत पुरुष गटात २० आणि महिला गटात १९ संघ आहेत.

खो खो विश्वचषक २०२५ – स्पर्धेसाठी संघांची गटवारी

पुरुष
अ गट – भारत, नेपाळ, पेरू, ब्राझील, भूतान
ब गट – दक्षिण आफ्रिका, घाना, अर्जेंटिना, नेदरलँड्स, इराण
क गट – बांगलादेश, श्रीलंका, दक्षिण कोरिया, अमेरिका, पोलंड
ड गट – इंग्लंड, जर्मनी, मलेशिया, ऑस्ट्रेलिया, केनिया

महिला
अ गट – भारत, इराण, मलेशिया, दक्षिण कोरिया
ब गट – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, केनिया, युगांडा, नेदरलँड्स
क गट – नेपाळ, भूतान, श्रीलंका, जर्मनी, बांगलादेश
ड गट – दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पोलंड, पेरू, इंडोनेशिया

खो खो विश्वचषक २०२५, भारतीय पुरुष संघ : प्रतिक वायकर(कर्णधार), प्रबाणी साबर, मेहुल, सचिन भार्गो , सुयश गरगटे, रामजी कश्यप, शिवा पोथीर रेड्डी, आदित्य गणपुले, गौथम एमके, निखिल बी, आकाश कुमार, सुब्रमणि व्ही., सुमन बर्मन, अनिकेत पोटे, एस. रोकेसन सिंग. स्टँडबाय (राखीव खेळाडू) : अक्षय बांगरे, राजवर्धन शंकर पाटील, विश्वनाथ जानकीराम.

खो खो विश्वचषक २०२५, भारतीय महिला संघ : प्रियांका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निर्मला भाटी, नीता देवी, चैत्रा आर., सुभाषश्री सिंग, मगाई माझी, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, नसरीन शेख, मीनु, मोनिका, नाझिया बीबी. स्टँडबाय (राखीव खेळाडू) : संपदा मोरे, रितिका सिलोरिया, प्रियांका भोपी.

खो खो विश्वचषक २०२५, भारतीय पुरुष संघाचे सामने

सोमवार १३ जानेवारी २०२४ – भारत विरुद्ध नेपाळ
मंगळवार १४ जानेवारी २०२४ – भारत विरुद्ध ब्राझील
बुधवार १५ जानेवारी २०२४ – भारत विरुद्ध पेरू
गुरुवार १६ जानेवारी २०२४ – भारत विरुद्ध भूतान

भारत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरल्यास १७ जानेवारी रोजी उपांत्यपूर्व फेरीत खेळेल
भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास १८ जानेवारी रोजी उपांत्य फेरीत खेळेल
भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास १९ जानेवारी रोजी अंतिम फेरीत खेळेल

खो खो विश्वचषक २०२५, भारतीय महिला संघाचे सामने

मंगळवार १४ जनेवारी २०२४ – भारत विरुद्ध दक्षिण कोरिया
बुधवार १५ जानेवारी २०२४ – भारत विरुद्ध इराण
गुरुवार १६ जानेवारी २०२४ – भारत विरुद्ध मलेशिया

भारत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरल्यास १७ जानेवारी रोजी उपांत्यपूर्व फेरीत खेळेल
भारत उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास १८ जानेवारी रोजी उपांत्य फेरीत खेळेल
भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरल्यास १९ जानेवारी रोजी अंतिम फेरीत खेळेल

पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा कधी आणि कुठे होणार ?

पहिली खो खो विश्वचषक स्पर्धा सोमवार १३ जानेवारी २०२५ पासून भारतात सुरू होत आहे. अंतिम सामने १९ जानेवारी रोजी आहेत. दिल्लीचे इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम आणि उत्तर प्रदेशमधील नोएडा इनडोअर स्टेडियममध्ये या स्पर्धेचे सामने खेळवले जातील. पुरुषांची खो खो विश्वचषक स्पर्धा १३ जानेवारीपासून सुरू होईल. या स्पर्धेतील विजेत्या पुरुष संघाला निळ्या रंगाची ट्रॉफी दिली जाईल. तर महिलांची खो खो विश्वचषक स्पर्धा १४ जानेवारीपासून सुरू होईल. या स्पर्धेतील विजेत्या महिला संघाला हिरव्या रंगाची ट्रॉफी दिली जाईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि दूरदर्शन येथे या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण बघता येईल. तसेच डिस्ने+हॉटस्टार अॅपवर पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे.

Recent Posts

वानखेडेवर धक्कादायक घटना, चोरांनी मारला डल्ला आणि न्यायदंडाधिकाऱ्यांना बसला फटका

मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली…

18 minutes ago

Shah Rukh Khan Wife Troll : शाहरूख खानच्या पत्नीच्या कपड्यांना बघून भडकले चाहते

मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…

2 hours ago

Gaurav More: ‘फिल्टरपाड्याचा बच्चन’ गौरव मोरेचं स्वप्न पूर्ण; ही महागडी गाडी घेतली

मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…

2 hours ago

Breaking News : मुख्यमंत्र्यांना जायचं होतं दिल्लीला पण उतरले…

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…

3 hours ago

आईस्क्रीम कारखान्यातील धक्कादायक घटना, कामगारांना दिली अशी वागणूक की प्राणीही घाबरावेत !

छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…

3 hours ago

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

4 hours ago