उबाठा शिवसेनेमध्ये फूट पडणार? बैठकीला दोन माजी नगरसेवकांची दांडी

नाशिक : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये फुट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी पक्षाच्या मुंबई कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये नाशिक मधील दोन माजी नगरसेवक उपस्थित राहिले नाही. त्यामुळे ते दुसऱ्या पक्षामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.


नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र आगामी महापालिका निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीनिशी उभे राहण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला दोन माजी नगरसेवकांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.


आगामी मनपा निवडणुकीच्या अनुशंगाने शुक्रवारी माजी नगरसेवकांना बैठकीसाठी मातोश्रीवर बोलावले होते. मात्र या बैठकीला नवीन नाशिक भागातील काही माजी नगरसेवकांनी दांडी मारल्याचे बोलले जात आहे. हे नगरसेवक पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची ही चर्चा होत आहे. महापालिका निवडणुकीत यश प्राप्त करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बैठका घेण्यात येत आहे. यात नाशिकच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत बहुतांश माजी नगरसेवक उपस्थित राहिले असले तरी काहींनी याबैठकीला दांडी मारल्याने ते दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होत आहे.

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार