उबाठा शिवसेनेमध्ये फूट पडणार? बैठकीला दोन माजी नगरसेवकांची दांडी

नाशिक : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामध्ये फुट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शुक्रवारी पक्षाच्या मुंबई कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये नाशिक मधील दोन माजी नगरसेवक उपस्थित राहिले नाही. त्यामुळे ते दुसऱ्या पक्षामध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.


नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र आगामी महापालिका निवडणुकीसाठी पूर्ण ताकतीनिशी उभे राहण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीला दोन माजी नगरसेवकांनी दांडी मारल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.


आगामी मनपा निवडणुकीच्या अनुशंगाने शुक्रवारी माजी नगरसेवकांना बैठकीसाठी मातोश्रीवर बोलावले होते. मात्र या बैठकीला नवीन नाशिक भागातील काही माजी नगरसेवकांनी दांडी मारल्याचे बोलले जात आहे. हे नगरसेवक पक्षाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची ही चर्चा होत आहे. महापालिका निवडणुकीत यश प्राप्त करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून बैठका घेण्यात येत आहे. यात नाशिकच्या माजी नगरसेवकांच्या बैठकीत बहुतांश माजी नगरसेवक उपस्थित राहिले असले तरी काहींनी याबैठकीला दांडी मारल्याने ते दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होत आहे.

Comments
Add Comment

जालन्यात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला

जालना : जालना शहरात मतदानासाठी बाहेर पडलेल्या मतदारांवर एका पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक

मतदानानंतर सुबोध भावेंची स्पष्ट भूमिका अन् पुण्यात रंगली 'ती' एकच चर्चा

पुणे: पुणे महापालिका निवडणुकीसाठी शहरात मतदानाचा उत्साह पाहायला मिळत असताना, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता

Latur : महिन्याभरापूर्वी निवडणूक जिंकली आणि उपचारांअभावी गेली

लातूर : लातूर जिल्ह्यात मन हेलावणारी घटना घडली आहे. अहमदपूर शहरातून ही घटना समोर आली आहे. नुकत्याच झालेल्या

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

पैशांच्या वादातून मित्रानेच केली मित्राची हत्या ...आरोपीला ट्रेनमध्ये पकडलं..!

पुणे/रायगड : रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाट परिसरात पैशाच्या वादातून घडलेली मित्रामधील हत्येची घटना समाजात