HSC Exam Hall Ticket Online : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! १२ वी परीक्षेचं हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध

मुंबई : फेब्रुवारी-मार्च दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अत्यंत महत्वाच्या १२ वी परीक्षेचं हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध झालं आहे. हे हॉल तिकीट कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन पद्धतीने शुक्रवारपासून (दि १०) उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून हॉल तिकीट पाहावे. यासंदर्भात विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचण आल्यास उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.



उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावी परीक्षेची ऑनलाइन हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क महाविद्यालय व उच्च माध्यमिक शाळा आकारू शकत नाही. हॉल तिकिटाच्या प्रिंटवर मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. ज्या आवेदनपत्रांना ‘पेड’ असे स्टेटस प्राप्त झाले आहे त्यांचेच हॉल तिकीट ‘पेड स्टेटस एडमिट कार्ड’ या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील. तसेच हॉलतिकिटावरच्या फोटोमध्ये काही अडचणी असल्यास विद्यार्थ्याचा फोटो चिटकवून त्यावर प्राचार्यांचा शिक्का, स्वाक्षरी असणे गरजेचे आहे अन्यथा ते हॉलतिकीट ग्राह्य धरण्यात येणार नाही असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी परिपत्रकाद्वारे सांगितले आहे.

Comments
Add Comment

युद्धामुळे वाढली शेणाच्या गोवऱ्यांची किंमत

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षाचे परिणाम आता इंधन पुरवठ्यावरही दिसू लागले आहेत. इराण,

उन्हाळी सुट्टीत प्रवाशांना दिलासा: मुंबई, पुणे, सोलापूरसह अनेक मार्गांवर उन्हाळी धावणार स्पेशल ट्रेन

पुणे : उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच सुट्टीचे दिवस, वर्षभर अभ्यास करून दमलेल्या मुलांच्या उन्हाळ्यात परीक्षा संपतात

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली