HSC Exam Hall Ticket Online : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! १२ वी परीक्षेचं हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध

मुंबई : फेब्रुवारी-मार्च दरम्यान होणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अत्यंत महत्वाच्या १२ वी परीक्षेचं हॉल तिकीट ऑनलाईन उपलब्ध झालं आहे. हे हॉल तिकीट कनिष्ठ महाविद्यालयांना ऑनलाइन पद्धतीने शुक्रवारपासून (दि १०) उपलब्ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांनी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून हॉल तिकीट पाहावे. यासंदर्भात विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचण आल्यास उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.



उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावी परीक्षेची ऑनलाइन हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क महाविद्यालय व उच्च माध्यमिक शाळा आकारू शकत नाही. हॉल तिकिटाच्या प्रिंटवर मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी स्वाक्षरी असणे गरजेचे आहे. ज्या आवेदनपत्रांना ‘पेड’ असे स्टेटस प्राप्त झाले आहे त्यांचेच हॉल तिकीट ‘पेड स्टेटस एडमिट कार्ड’ या पर्यायाद्वारे उपलब्ध होतील. तसेच हॉलतिकिटावरच्या फोटोमध्ये काही अडचणी असल्यास विद्यार्थ्याचा फोटो चिटकवून त्यावर प्राचार्यांचा शिक्का, स्वाक्षरी असणे गरजेचे आहे अन्यथा ते हॉलतिकीट ग्राह्य धरण्यात येणार नाही असे राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी परिपत्रकाद्वारे सांगितले आहे.

Comments
Add Comment

नाशिकचा हर्षवर्धन सदगीर ठरला महाराष्ट्र केसरीचा मानकरी; मुख्यमंत्र्यांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके जिंकण्याचा संकल्प करण्याचे आवाहन

पुणे: राज्यातील विद्यार्थ्यांना लहान वयापासूनच क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात

दातृत्वाचा धनी हरपला! दत्ता मेघे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून श्रद्धांजली

मुंबई: ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे

काळाराम मंदिरात सामुहिक रामरक्षा पठण

नाशिक : नाशिकच्या श्री काळाराम संस्थानतर्फे सुरू असलेल्या वासंतिक नवरात्र महोत्सव २०२६ मध्ये रविवारची सकाळ

नाशिक - जिल्हाधिका-यांनी घेतला सप्तशृंग गड येथे तयारीचा आढावा

नाशिक : वणी गडावरील चैत्र यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज सकाळी सप्तशृंग गड

कोल्हापूरचा धान्य महोत्सव; ‘मिलेट रॅली’ ला उदंड प्रतिसाद

कोल्हापूर : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने कृषी विभागाच्या

‘विकसित भारता’च्या दिशेने वाटचाल करताना ‘स्वस्थ भारत’ घडवणेही तितकेच महत्त्वाचे - उपराष्ट्रपती

- उरुळी कांचन, पुणे येथे निसर्गोपचार आश्रम ८१ वा वर्धापनदिन पुणे : आजच्या वेगवान जीवनशैलीत लोक अनेकदा भौतिक