Santosh Deshmukh Death Case : संतोष देशमुख घटनेच्या निषेधार्थ सर्वधर्मीय मूक मोर्चा !

  77


बीड : बीड येथील संतोष देशमुख (Santosh Deshmukh) आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना फाशी द्यावी यासाठी आज वाशीम येथे सर्व पक्षीय-सर्व धर्मीय संघटना, सेवाभावी संस्था, आणि संवेदनशील नागरिकांच्यावतीने महामूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोर्चाला संतोष देशमुख यांचे बंधू व इतर राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



न्यायासाठी लढत राहू


बीड हत्याकांडातील ७ आरोपीवर मोक्का लावण्यात आला मात्र घटनेतील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड यांच्यावर जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करीत नाहीत आणि कराडसह सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही न्यायासाठी लढत राहू अशी माहिती धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.



जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन


हा मोर्चा भव्य असून वाशीम छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली होती. नंतर पाटणी चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत काढण्यात आला होता. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांद्वारे आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करा, असे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. (Santosh Deshmukh)

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली