Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरपंच संघटनेचे राज्यात ३ दिवस काम बंद आंदोलन

बीड : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वी हत्या (Santosh Deshmukh murder case) झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. हे हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहेत. या घटनेतील काही आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड हे मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. शनिवारी (२८) बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता. आता राज्यभरातील ग्रामपंचायतीचे कामकाज आजपासून तीन दिवस बंद राहणार आहे.


मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि लोकप्रतिनिधींवर होणाऱ्या हल्ल्यांना आळा बसावा, यासाठी कडक निर्बंध बसवावेत, या मागणीला घेऊन आजपासून सरपंच संघटनेने राज्यभरात काम बंद आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनात महाराष्ट्रात एकूण २७,९५१ ग्रामपंचायती सहभागी होत आहेत.



महाराष्ट्रात ३५१ पंचायत समित्या किंवा ब्लॉक पंचायती आहेत. भंडारा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात एकूण ७ पंचायत समित्या असून ५४१ ग्रामपंचायती आणि ८६६ गावे आहेत. ग्रामपंचायत हा पंचायत राजमधील सर्वात खालचा पण महत्त्वाचा भाग आहे. ग्रामपंचायतीचे कामकाज पुढील तीन दिवस ठप्प होणार असून याचा फटका नागरिकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments
Add Comment

Rajgad Accident : राजगडाच्या वाटेवर भीषण अपघात! पाबे घाटात मिनी बस २५ फूट दरीत कोसळली; दोन पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण जखमी

पुणे : किल्ले राजगड (Rajgad Fort) येथे पर्यटनासाठी (Tourism) निघालेल्या मुंबईतील अंधेरी येथील पर्यटकांच्या मिनी बसचा (Mini Bus) पुणे

Nitesh Rane : छत्रपती शिवाजी महाराज समान नागरी कायद्याचे जनक - मंत्री नितेश राणे

विशाळगडाला अतिक्रमण मुक्त करण्याबाबत केले आश्वस्त मुंबई : "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने समान नागरी

Maharashtra Weather : महाराष्ट्रातील २७ जिल्ह्यांना यलो अलर्ट; लवकरच पावसाच्या सरी बरसणार

मुंबई : वाढत्या उष्णते मध्ये दिलासादायक गोष्ट समोर आली आहे. 28 जून रोजीही राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा येलो

NCMC Card : वृद्ध असो की विद्यार्थी; सवलतीसाठी आता १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक

एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक  मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या

Maharashtra Farmers : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

प्रशासकीय पातळीवर तयारी पूर्ण; प्रत्येक गावात लाभार्थ्यांची यादी पाठवणार मुंबई : गेल्या काही वर्षांतील

Bharat Gogawale : राज्यातील ४८ ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार

मंत्री भरत गोगावले यांची कबुली; हस्तलिखित आणि संगणकीय हजेरीपटात तफावत दाखवून गैरव्यवहार मुंबई : गरिबांच्या